शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

मुख्यमंत्र्यांनी टोचले नगरसेवकांचे कान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2018 22:01 IST

मुंबईत विजयोत्सव : विकास न केल्यास मनपा बरखास्त करू

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : महापालिका निवडणूकीत जनतेने भाजपला विजयाचा कौल दिला़ त्यामुळे जनतेचा विश्वास सार्थ ठरविण्यासाठीस सर्व नगरसेवकांनी विकासावर भर द्यावा़ कामे होत नसल्याच्या तक्रारी आल्या तर मनपा बरखास्त करायलाही मागे-पुढे पाहणार नाही, असा इशारा देत मुख्यमंत्र्यांनी नवनियुक्त नगरसेवकांचे कान टोचले़मनपा निवडणूकीत भाजपने ५० जागा मिळवत प्रथमच स्पष्ट बहूमत मिळवले़ या ऐतिहासिक विजयानंतर सर्व नवनियुक्त नगरसेवकांनी मंगळवारी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली़ यावेळी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ़ सुभाष भामरे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, रोहयो व पर्यटन विकास मंत्री जयकुमार रावल, महानगरप्रमुख अनुप अग्रवाल उपस्थित होते़ यावेळी मुख्यमंत्र्यांनी नवनियुक्त नगरसेवकांशी संवाद साधला़ ते म्हणाले की, आतापर्यंत अनेक नगरसेवक अनेकदा निवडून आले परंतु त्यांनी शहराचा कधीच विचार केला नाही, त्यामुळे शहर विकासात बरेच मागे राहिले़ परंतु आता विकासाची संधी सर्व सदस्यांना भाजपच्या माध्यमातून मिळाली आहे़ पण यापूर्वी चालले तसे पुढे चालणार नाही, तर प्रत्येक नगरसेवकाला प्रभागाचा विकास हा एकमेव अजेंडा ठेवावा लागेल़ शहर विकासात निधी कमी पडू देणार नाही़ पण निधी जर वाया गेला व तक्रारी आल्या तर प्रसंगी महापालिका बरखास्त करायलाही मागे-पुढे पाहणार नाही, असा स्पष्ट इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला़ शहर हद्दवाढीमुळे नगरसेवकांची जबाबदारी वाढली असुन शहरातील कोणताच भाग अविकसित राहणार नाही, याकडे लक्ष ठेवावे़ कोणीही गुंडगिरीला थारा देऊ नये, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या व सर्व नगरसेवकांचे अभिनंदन केले़ केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ़ सुभाष भामरे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी देखील नवनियुक्त नगरसेवकांचे अभिनंदन केले़ मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या इशाºयाची नंतर नगरसेवकांमध्ये चर्चा होती़ पहिल्या आठवड्यात १०० कोटी़़़शहर विकासासाठी पहिल्याच आठवड्यात १०० कोटी रूपयांचा निधी देणार आहे़ शहरातील सर्व प्राथमिक सुविधांचे प्रश्न त्यातून सोडविण्यात यावेत़ त्याचप्रमाणे शहराला पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या असून त्यासाठी प्रस्तावित योजनेसाठी आवश्यक निधी तातडीने देणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले़ 

टॅग्स :Dhuleधुळे