शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

धुळे बाजार समितीत ‘सीसीटीव्ही’ची नजर!

By admin | Updated: July 4, 2017 15:28 IST

45 एकर क्षेत्रात 26 कॅमे:यांद्वारे लक्ष. शेतकरी, व्यापा:यांची सुविधा; वार्षिक साडेचारशे कोटींची उलाढाल

सुरेश विसपुते /ऑनलाईन लोकमत 
धुळे,दि.4 - बाजार समितीत होणा:या चोरीच्या घटना टाळण्यासाठी संपूर्ण आवारात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमे:यांमुळे परिणामकारक यश मिळाले आहे. 45 एकर क्षेत्रात असलेल्या बाजार समितीतील घटना घडामोडींवर 26 कॅमे:यांद्वारे लक्ष ठेवले जात आहे. अशी व्यवस्था करणारी जिल्ह्यातील ही पहिलीच बाजार समिती ठरली आहे. 
धुळे बाजार समितीने वर्षभरापूर्वी चोरीच्या छोटय़ा-मोठय़ा घटनांना प्रतिबंध बसावा तसेच बाजार समितीच्या भव्य आवारातील संपूर्ण घटना, घडामोडींवर नियंत्रण व लक्ष ठेवता यावे यासाठी स्वनिधीतून मोक्याच्या जागांवर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचा निर्णय घेतला. संपूर्ण आवार सीसीटीव्हीच्या नियंत्रणात आणण्यासाठी वर्षभराचा कालावधी लागला. एकूण 26 कॅमेरे लावण्यात आले आहेत. 
विद्यमान सभापती सुभाष देवरे व संचालक मंडळाने हा निर्णय घेत पूर्ण केला. या कामाकरीता बाजार समितीला सुमारे 3 लाख रुपये खर्च आला. मात्र यामुळे आता बाजार समितीच्या 45 एकर क्षेत्रावर एकाचवेळी लक्ष ठेवून नियंत्रण राखण्याचे काम सोपे झाले आहे. मंगळवारी बाजाराच्या दिवशी होणा:या भुरटय़ा चो:यांना यामुळे पूर्णपणे आळा बसला आहे. या शिवाय शेतक:यांनी विक्रीसाठी आणलेला माल अनवधानाने कोणी घेऊन गेला, इकडे-तिकडे ठेवला गेला तर त्यासाठी सीसीटीव्ही फुटेजची मोठी मदत होते. बाजार समितीत व्यापा:यांचा त्यांनी खरेदी केलेला माल मोठय़ा प्रमाणात असतो. चुकून त्यातील काही कट्टे दुस:या गाडीत भरले गेले असतील, तर तेही लक्षात येण्यास यामुळे मदत होते. त्यामुळे नुकसान व  परिणामी होणारा मनस्ताप टाळण्यास मोठीच मदत झाल्याचे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले. 
राज्यात स्थापन झालेली दुसरीच बाजार समिती! 
ब्रिटीश राजवटीत 1 सप्टेंबर 1930  रोजी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीची स्थापना झाली. ब्रिटीश सरकारने नेमलेल्या रॉयल कमिशनने शेतमाल खरेदी-विक्रीसाठी एक स्वतंत्र संस्था असावी, अशी शिफारस अहवालाद्वारे सरकारला केली होती. त्यानंतर राज्यात वाशिम जिल्ह्यात लाडकारंजा येथे 1885 साली पहिल्या कृषी उत्पन्न बाजार समितीची स्थापना झाली. त्यानंतर धुळे येथे दुस:या बाजार समितीची स्थापना करण्यात आली होती. 
फळ-भाजीपाला खरेदी-विक्री नियमनाचा पहिला मान!
1974 साली फळ व भाजीपाला खरेदी-विक्रीचे नियमन करणारी राज्यातील पहिली बाजार समिती ठरण्याचा मान या बाजार समितीला मिळाला. तत्पूर्वी बाजार समितीत केवळ धान्याचीच खरेदी-विक्री होत असे. आता या बाजार समितीत गुरांच्या बाजारासह 62 कम्युनिटी निर्माण झाल्या आहेत, असे सूत्रांनी सांगितले.