शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
2
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
3
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
4
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
5
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
6
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
7
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
8
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
9
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
10
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
11
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
12
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
13
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
14
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
15
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
16
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
17
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
18
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
19
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
20
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7 लाख कोटींची कमाई

धुळे बाजार समितीत ‘सीसीटीव्ही’ची नजर!

By admin | Updated: July 4, 2017 15:28 IST

45 एकर क्षेत्रात 26 कॅमे:यांद्वारे लक्ष. शेतकरी, व्यापा:यांची सुविधा; वार्षिक साडेचारशे कोटींची उलाढाल

सुरेश विसपुते /ऑनलाईन लोकमत 
धुळे,दि.4 - बाजार समितीत होणा:या चोरीच्या घटना टाळण्यासाठी संपूर्ण आवारात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमे:यांमुळे परिणामकारक यश मिळाले आहे. 45 एकर क्षेत्रात असलेल्या बाजार समितीतील घटना घडामोडींवर 26 कॅमे:यांद्वारे लक्ष ठेवले जात आहे. अशी व्यवस्था करणारी जिल्ह्यातील ही पहिलीच बाजार समिती ठरली आहे. 
धुळे बाजार समितीने वर्षभरापूर्वी चोरीच्या छोटय़ा-मोठय़ा घटनांना प्रतिबंध बसावा तसेच बाजार समितीच्या भव्य आवारातील संपूर्ण घटना, घडामोडींवर नियंत्रण व लक्ष ठेवता यावे यासाठी स्वनिधीतून मोक्याच्या जागांवर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचा निर्णय घेतला. संपूर्ण आवार सीसीटीव्हीच्या नियंत्रणात आणण्यासाठी वर्षभराचा कालावधी लागला. एकूण 26 कॅमेरे लावण्यात आले आहेत. 
विद्यमान सभापती सुभाष देवरे व संचालक मंडळाने हा निर्णय घेत पूर्ण केला. या कामाकरीता बाजार समितीला सुमारे 3 लाख रुपये खर्च आला. मात्र यामुळे आता बाजार समितीच्या 45 एकर क्षेत्रावर एकाचवेळी लक्ष ठेवून नियंत्रण राखण्याचे काम सोपे झाले आहे. मंगळवारी बाजाराच्या दिवशी होणा:या भुरटय़ा चो:यांना यामुळे पूर्णपणे आळा बसला आहे. या शिवाय शेतक:यांनी विक्रीसाठी आणलेला माल अनवधानाने कोणी घेऊन गेला, इकडे-तिकडे ठेवला गेला तर त्यासाठी सीसीटीव्ही फुटेजची मोठी मदत होते. बाजार समितीत व्यापा:यांचा त्यांनी खरेदी केलेला माल मोठय़ा प्रमाणात असतो. चुकून त्यातील काही कट्टे दुस:या गाडीत भरले गेले असतील, तर तेही लक्षात येण्यास यामुळे मदत होते. त्यामुळे नुकसान व  परिणामी होणारा मनस्ताप टाळण्यास मोठीच मदत झाल्याचे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले. 
राज्यात स्थापन झालेली दुसरीच बाजार समिती! 
ब्रिटीश राजवटीत 1 सप्टेंबर 1930  रोजी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीची स्थापना झाली. ब्रिटीश सरकारने नेमलेल्या रॉयल कमिशनने शेतमाल खरेदी-विक्रीसाठी एक स्वतंत्र संस्था असावी, अशी शिफारस अहवालाद्वारे सरकारला केली होती. त्यानंतर राज्यात वाशिम जिल्ह्यात लाडकारंजा येथे 1885 साली पहिल्या कृषी उत्पन्न बाजार समितीची स्थापना झाली. त्यानंतर धुळे येथे दुस:या बाजार समितीची स्थापना करण्यात आली होती. 
फळ-भाजीपाला खरेदी-विक्री नियमनाचा पहिला मान!
1974 साली फळ व भाजीपाला खरेदी-विक्रीचे नियमन करणारी राज्यातील पहिली बाजार समिती ठरण्याचा मान या बाजार समितीला मिळाला. तत्पूर्वी बाजार समितीत केवळ धान्याचीच खरेदी-विक्री होत असे. आता या बाजार समितीत गुरांच्या बाजारासह 62 कम्युनिटी निर्माण झाल्या आहेत, असे सूत्रांनी सांगितले.