शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
3
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
4
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
5
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
6
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
7
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
8
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
9
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
10
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
11
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
12
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
13
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
14
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
15
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
16
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
17
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
18
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
19
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
20
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू

धुळे बाजार समितीत ‘सीसीटीव्ही’ची नजर!

By admin | Updated: July 4, 2017 15:28 IST

45 एकर क्षेत्रात 26 कॅमे:यांद्वारे लक्ष. शेतकरी, व्यापा:यांची सुविधा; वार्षिक साडेचारशे कोटींची उलाढाल

सुरेश विसपुते /ऑनलाईन लोकमत 
धुळे,दि.4 - बाजार समितीत होणा:या चोरीच्या घटना टाळण्यासाठी संपूर्ण आवारात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमे:यांमुळे परिणामकारक यश मिळाले आहे. 45 एकर क्षेत्रात असलेल्या बाजार समितीतील घटना घडामोडींवर 26 कॅमे:यांद्वारे लक्ष ठेवले जात आहे. अशी व्यवस्था करणारी जिल्ह्यातील ही पहिलीच बाजार समिती ठरली आहे. 
धुळे बाजार समितीने वर्षभरापूर्वी चोरीच्या छोटय़ा-मोठय़ा घटनांना प्रतिबंध बसावा तसेच बाजार समितीच्या भव्य आवारातील संपूर्ण घटना, घडामोडींवर नियंत्रण व लक्ष ठेवता यावे यासाठी स्वनिधीतून मोक्याच्या जागांवर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचा निर्णय घेतला. संपूर्ण आवार सीसीटीव्हीच्या नियंत्रणात आणण्यासाठी वर्षभराचा कालावधी लागला. एकूण 26 कॅमेरे लावण्यात आले आहेत. 
विद्यमान सभापती सुभाष देवरे व संचालक मंडळाने हा निर्णय घेत पूर्ण केला. या कामाकरीता बाजार समितीला सुमारे 3 लाख रुपये खर्च आला. मात्र यामुळे आता बाजार समितीच्या 45 एकर क्षेत्रावर एकाचवेळी लक्ष ठेवून नियंत्रण राखण्याचे काम सोपे झाले आहे. मंगळवारी बाजाराच्या दिवशी होणा:या भुरटय़ा चो:यांना यामुळे पूर्णपणे आळा बसला आहे. या शिवाय शेतक:यांनी विक्रीसाठी आणलेला माल अनवधानाने कोणी घेऊन गेला, इकडे-तिकडे ठेवला गेला तर त्यासाठी सीसीटीव्ही फुटेजची मोठी मदत होते. बाजार समितीत व्यापा:यांचा त्यांनी खरेदी केलेला माल मोठय़ा प्रमाणात असतो. चुकून त्यातील काही कट्टे दुस:या गाडीत भरले गेले असतील, तर तेही लक्षात येण्यास यामुळे मदत होते. त्यामुळे नुकसान व  परिणामी होणारा मनस्ताप टाळण्यास मोठीच मदत झाल्याचे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले. 
राज्यात स्थापन झालेली दुसरीच बाजार समिती! 
ब्रिटीश राजवटीत 1 सप्टेंबर 1930  रोजी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीची स्थापना झाली. ब्रिटीश सरकारने नेमलेल्या रॉयल कमिशनने शेतमाल खरेदी-विक्रीसाठी एक स्वतंत्र संस्था असावी, अशी शिफारस अहवालाद्वारे सरकारला केली होती. त्यानंतर राज्यात वाशिम जिल्ह्यात लाडकारंजा येथे 1885 साली पहिल्या कृषी उत्पन्न बाजार समितीची स्थापना झाली. त्यानंतर धुळे येथे दुस:या बाजार समितीची स्थापना करण्यात आली होती. 
फळ-भाजीपाला खरेदी-विक्री नियमनाचा पहिला मान!
1974 साली फळ व भाजीपाला खरेदी-विक्रीचे नियमन करणारी राज्यातील पहिली बाजार समिती ठरण्याचा मान या बाजार समितीला मिळाला. तत्पूर्वी बाजार समितीत केवळ धान्याचीच खरेदी-विक्री होत असे. आता या बाजार समितीत गुरांच्या बाजारासह 62 कम्युनिटी निर्माण झाल्या आहेत, असे सूत्रांनी सांगितले.