शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

पाण्याअभावी कारल्याची बाग अखेर उद्ध्वस्तच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2019 12:09 IST

विदारकता। धुळे तालुक्यातील दयनीय स्थिती, भाजीपाला टिकविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड

प्रदीप पाटील ।तिसगाव : धुळे तालुक्यात पाण्याअभावी भाजीपाला पिकांची बाग करपली जात असून कारले पिकांना फटका बसत आहे़ तालुक्यातील तिसगाव येथील मारोती विठोबा ठेलारी या शेतकऱ्याने कारल्याची लागवड केली होती़ परंतु पाण्याअभावी ती करपल्याने परिणामी लाखो रूपयांचे नुकसान झाले़ संपूर्ण शेतच ओसाड झाले आहे़निसर्गाचा लहरीपणाचा फटका शेतकºयाला नेहमी सोसावा लागतो़ यावर्षी अत्यल्प पाऊस पडला आणि उत्पादनात प्रचंड घट झाली़ परिणामी बळीराजाची दयनीय अवस्था झाली आहे़ कमी पावसामुळे विहिरींनी तळ गाठला असून भाजीपाला पिकात मोठ्या प्रमाणावर घट झाली़ खर्च सुद्धा निघेणासा झाला आहे़ या कारले रोपांसाठी महागडे बियाणे आणून ते तळ हातावरच्या फोडासारखे जपून बेड पद्धतीची मल्चिंग लागवड करून एक बिघे क्षेत्राकरीता मल्चिंग पेपर अठरा हजार रुपये, दोन ट्रॅक्टर खत दहा हजार रुपये, बियाणे, लागवड, फवारणी, ड्रीप यासाठी सुमारे पंचवीस हजार रुपये आणि वेल उगवण क्षमता उत्तम असावी म्हणून उभा करण्याच्या मजुरीसकट चाळीस हजार रुपये असे एकूण ९३ हजार रुपये खर्च करून पाण्याअभावी संपूर्ण बाग जळून खाक झाली़ जी विहीर जानेवारी, फेब्रुवारीपर्यंत विहीर तळ गाठत नव्हती, त्या विहिरीत आत्ता चमचाभर सुध्दा पाणी दिसत नाही़ अशी विदारक परिस्थिती या वर्षी निर्माण झाली आहे़ आणि या शेतकºयाच्या आजूबाजूच्या विहिरींना तळ ठोकला असून आज या शेतकऱ्यांना या भिषण संकटाला सामोरे जावे लागत आहे़ मोठ्या आशेने खर्च झालेल्या या कारले पिकाच्या बागेवर आपला काहीतरी उदरनिर्वाह होईल अशा आशेने जगणारा शेतकरी, आज संपूर्ण बागेसह उध्वस्त झाल्याचे चित्र डोळ्यादेखत समोर आहे़ एखाद दोन लहान मोठ्या कारल्याची तोडणी करून २० ते २५ रुपये की संपूर्ण शेतातून ४ ते ५ क्विंटल विकून तुटपुंजी रक्कम घेऊन हताश आणि निराश झालेला हा बळीराजा शेतात लाखो रुपये खर्च करणारा शेतकरी आज आपल्या कुटुंबाचे पालन-पोषण करु शकत नाही़ अशी या शेतकºयांची दयनिय अवस्था आहे़ शेतानजीक एखादं दोन बंधारे झाले असते तर ही परिस्थिती शेतकºयांवर आज आलीच नसती़ लाखो रुपये खर्च केले, मला कल्पनाही नव्हती की माझ्या विहिरीचे पाणी एवढ्या लवकर आटून जाईल असे मारुती माने यांचे म्हणणे आहे़अन्यथा, प्रश्न होऊ शकतो बिकट४शासनाने धुळे तालुक्यातील तिसगाव व या आजुबाजुच्या परिसरात पाणी अडवण्यासाठी कायम स्वरूपाची सोय करून द्यायला हवी़ त्याची आज गरज आहे़ वेळीच दखल घेतल्यास पाणी अडविण्याची सोय होऊ शकते, नाहीतर शेतकºयांसमोर बिकट प्रश्न निर्माण होऊ शकतो़

टॅग्स :Dhuleधुळे