शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

२ ते ९ एप्रिलदरम्यान दाखल करता येणार उमेदवारी अर्ज, १२ पर्यंत घेता येईल माघार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2019 22:09 IST

जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल रेखावार यांनी पत्रकार परिषदेत दिली

धुळे : लोकसभा निवडणुकीत धुळे मतदार संघासाठी २ ते ९ एप्रिल दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. १० रोजी छाननी आणि १२ एप्रिलपर्यंत माघार घेता येणार आहे. निवडणुकीत प्रथमच व्हीव्हीपॅटचा वापर होणार आहे. निवडणुकीसाठी ९ एप्रिलपर्यंत मतदार नोंदणी करता येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल रेखावार यांनी सोमवारी संध्याकाळी पत्रकार परिषदेत दिली. २९ एप्रिल रोजी मतदान घेतले जाणार असल्याचेही ते म्हणाले.पत्रकार परिषदेला पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड, उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रमोद भामरे, उपजिल्हाधिकारी गणेश मिसाळ (नाशिक), उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे, सुरेखा चव्हाण, धुळे उपविभागीय अधिकारी भिमराज दराडे, शिरपूर उपविभागीय अधिकारी विक्रम बांदल, तहसीलदार सुचिता भामरे, चंद्रजित राजपूत (मालेगाव) आदी अधिकारीही उपस्थित होते.मतदारसंघात आचारसंहितेचा अंमल सुरू झाला असून तिचा भंग होऊ नये यासाठी ‘सी व्हिजिल’ अ‍ॅप यावेळी खास तयार करण्यात आला आहे. तो प्रत्येकजण मोबाईलवर डाऊनलोड करू शकतो. कुठे आचारसंहितेचा भंग होत असेल तर कोणीही त्याचा फोटो अथवा व्हीडीयो काढून या अ‍ॅपवर डाऊनलोड करू शकतो. तक्रारही करता येईल. तसेच त्या तक्रारीचे कसे निराकरण केले जात आहे, याची माहितीही तक्रारकर्त्यास मिळेल, असे जिल्हाधिकारी रेखावार यांनी सांगितले.जिल्ह्यात मतदारांची एकूण संख्या १६ लाख ३६ हजार २३४ एवढी आहे. त्यात ८ लाख ४५ हजार ४१८ पुरूष मतदार तर ७ लाख ९० हजार ७९२ स्त्री मतदार तसेच २४ इतर मतदारांचा समावेश आहे. अनिवासी मतदार (एनआरआय) एकही नाही. मागील दोन निवडणुकींचा आढावा घेतला तर मतदानाचे प्रमाण वाढत असल्याचे दिसते, असे जिल्हाधिकारी म्हणाले.व्हीव्हीपॅटचा प्रथमच वापरयावेळी निवडणुकीत व्हीव्हीपॅट यंत्राचा वापर प्रथमच केला जाणार आहे. त्यामुळे मतदारांमध्ये जनजागृती होण्यासाठी यापूर्वी इव्हीएम व व्हीव्हीपॅट यंत्रांचे प्रात्यक्षिक गावोगावी दाखविण्यात आले आहे. अजून याबाबत जनजागृती केली जाईल.धुळे लोकसभा मतदारसंघासाठी ३ हजार ६३२ बॅलेट युनिट आणि प्रत्येकी २ हजार ११२ कंट्रोल युनिट व व्हीव्हीपॅट यंत्रे तसेच त्यांच्यासाठी पुरेशा प्रमाणात बॅटऱ्याही प्राप्त झाल्या असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.जिल्ह्यात १६४५ मतदान केंद्रेया निवडणुकीसाठी जिल्ह्यात १६४५ मतदान केंद्रे असून १ हजार ४०० पेक्षा जास्त मतदार असलेल्या मतदान केंद्रांसाठी निवडणूक आयोगाच्या नियमानुसार त्या केंद्रांवरच सहाय्यकारी मतदान केंद्र तयार केले जाणार आहेत. सध्या अशा मतदान केंद्रांची संख्या ६९ एवढी आहे. ९ एप्रिलनंतर कदाचित या संख्येत वाढ होऊ शकेल. त्यासाठी जनजागृती करण्यात येणार आहे. १ जानेवारी रोजी १८ वर्ष पूर्ण केलेल्या युवक, युवतींना नोंदणी करता येणार आहे.९ एप्रिलपर्यंत मतदार नोंदणीची संधीयुवक तसेच यापूर्वी नोंदणीपासून वंचित राहिलेले नागरिक येत्या ९ एप्रिलपर्यंत मतदार म्हणून नोंदणी करू शकतील. तसेच या मुदतीत नोंदणी करणाºया मतदारांना या लोकसभा निवडणुकीत मतदान करता येईल, अशी माहितीही जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. विशेष नोंदणी मोहिमांदरम्यान झालेल्या नोंदणीत २५ टक्के युवा मतदारांचा समावेश आहे. त्यामुळे यावेळी मतदानाचा टक्का निश्चितपणे वाढेल, असा विश्वास व्यक्त झाला.बंदोबस्ताचेही नियोजनही निवडणूक सुरक्षित व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी सर्व मतदान केंद्रांवर आवश्यक बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी बाहेरून जेवढा स्टाफ मागवावा लागेल, त्याची माहितीही देण्यात आली आहे. निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी जेवढी आवश्यकता आहे तसेच राखीव मनुष्यबळही उपलब्ध असल्याचे रेखावार यांनी सांगितले.पदाधिकाºयांची वाहने जमास्थानिक स्वराज्य संस्थांच्या पदाधिकाºयांची वाहने जमा करण्यात आली आहेत. त्यांची फोन सुविधाही थांबविण्याची सूचना केली आहे. मात्र अगदी गरजेवेळी वाहन उपलब्ध करण्याची सूचनाही केली असल्याचे जिल्हाधिकाºयांनी यावेळी स्पष्ट केले. कायदा सुव्यवस्थेसाठी उपाययोजना केल्या जात असल्याचेही ते म्हणाले.

टॅग्स :Dhuleधुळे