शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे ब्रँडला शह देण्यासाठी रणनीती, मुंबईत एकत्र लढेल महायुती! 'प्लॅन बी'चीही तयारी...
2
बांगलादेशच्या मोहम्मद युनूस यांचे सूर बदलले, म्हणाले, 'भारताचे मनापासून आभार...', नेमकं कारण काय?
3
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
4
आणखी एका चीनसाठी जागा नाही, भारतानं 'पुढचा ड्रॅगन' बनण्याचं स्वप्न सोडावं; रघुराम राजन यांचा इशारा
5
देशातील सर्वात स्वस्त ईलेक्ट्रीक कार १५००० रुपयांनी महागली; वर्षात तिसऱ्यांदा वाढ...
6
भारतीय सैन्यापेक्षा ISI वर जास्त विश्वास; चिदंबरम यांच्या पहलगामबाबत केलेल्या वक्तव्यावर भाजपचा संताप
7
राज्यात तिसरी ते दहावीचा सुधारित अभ्यासक्रम जाहीर; हिंदी सक्तीला लागला ब्रेक? 'हे' विषय शिकवणार
8
Nag Panchami 2025: नागपंचमीला 'या' घरगुती उपायांनीदेखील दूर होईल कालसर्पदोष!
9
गरोदरपणात सुचली कल्पना! फक्त ६० हजारांच्या गुंतवणुकीतून 'या' जोडप्याने कमावले ५ कोटी!
10
Uorfi Javed : बारीक दिसण्यासाठी जेवणं सोडलं, उपाशी राहिली अन्...; उर्फी जावेदने 'या' आजाराचा केला सामना
11
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा तामिळनाडू दौरा; महान चोल साम्राज्याचा उल्लेख करत म्हणाले...
12
Rohini Khadse-Khewalkar : "प्रत्येक गोष्टीला वेळ..."; रेव्ह पार्टीमध्ये पतीला अटक झाल्यावर रोहिणी खडसेंची पहिली प्रतिक्रिया
13
Nag Panchami 2025: नागपंचमीला तळणे, चिरणे, कापणे निषिद्ध; वाचा शास्त्रीय आणि धार्मिक कारण!
14
मुलांच्या शिक्षणाचं टेन्शन? पोस्ट ऑफिसची 'ही' योजना देणार हमखास परतावा आणि टॅक्समध्ये सूट!
15
"...तर मी त्यांना १०० रुपये देतो", सचिन पिळगावकर आजही आवर्जुन करतात 'ही' गोष्ट, म्हणाले- "ते पैसे लोक फ्रेम करून..."
16
१३ हजारांत १०८ MP कॅमेरा, ६५००mAh बॅटरी आणि सुपरफास्ट चार्जिंग; नोकियाच्या नव्या फोनची चर्चा!
17
सगळेच बीएसएनएलमध्ये पोर्ट करतील! ९०० रुपयांच्या आत आणले सहा महिन्यांचे रिचार्ज, Jio-Airtel तर...
18
श्रीमंत बनण्याचा फॅार्म्युला, फक्त बदला या ५ सवयी; महिन्याला वाचवा १० हजार, लोकंही विचारतील कशी झाली 'ही' जादू
19
Barabanki Awshaneshwar Temple Stampede : माकडांनी उड्या मारल्या, तार तुटली अन्...; अवसानेश्वर महादेव मंदिरात कशी झाली चेंगराचेंगरी?

पांझरेचा रूद्ररूपी तांडव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2019 13:49 IST

जनजीवन विस्कळीत : राहतं घर सोडून नागरिकांना करावे लागले स्थालांतर, अनेक घरांची पडझड

ठळक मुद्दे पुरग्रस्त ! मदतीसाठी प्रशासनाचे आवाहनशाळांना दोन दिवस सुटीपांझरा नदी पुराबाबत अलर्टप्रशासनाचे आवाहनस्थलातंराच्या दिल्यात सुचनापुलावरून वाहतूक बंद

धुळे : पश्चिम पट्यातील पांझरा नदीच्या उगमस्थळावर पावसामुळे अक्कलपाडा धरणातील १७ पैकी ७ दरवाजे उघडण्यात आले आहेत. या धरणातून प्रतिसेकंद ५८ हजार ५०० क्युसेस पाण्याचा विसर्ग होत आहे़ पांझरा नदीला शुक्रवारी दुपारी आलेल्या महापूर पुराने नदीकाठावरील नागरिकांचे जनजीवन विस्कटीत झाले आहे़ प्रशासनाकडून नागरिकांना सर्तकतेचे आवाहन करण्यात आले आहे़जिल्ह्याभरात मुळसधार पाऊसाने नदी नाल्याना पुर आला आहे़ अक्कलपाडा धरणात पाण्याचा साठा अधिक झाल्याने गेल्या रविवारी पासुन पांझरा नदीत पाणी सोडण्यात आले आहे़ मध्यतरी पाऊसाने दांडी मारल्याने नदीचा प्रवाह कमी झाला होता़ महापूर बंद करण्यात आलेले पुल पुन्हा सुरू करण्यात आले होते़ मात्र बुधवारी पासुन पाऊसाची सतत रिपरिप सुरू असल्याने अक्कलपाडा धरणात पुन्हा पाणीसाठा संग्रहित झाला़ त्यामुळे शुक्रवारी पाझरा नदीत पाणी सोडण्यात आले होते़ पहिल्यांदा पाहण्यासाठी धुळेकरांनी रात्रीही नदी किनारी गर्दी केली होती. दरम्यान कुठलीही अप्रिय घटना होऊ नये म्हणून याठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शुक्र्रवारी दुपारी पांझरा नदीला मोठा पूर येणार असल्याचे माहिती प्रशासनाकडून प्राप्त झाल्यानंतर सकाळी मनपाच्या अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेऊन पांझरा नदीकिनारी नियुक्त करण्यात आले़पुलावर वाहतुकीची कोंडी- पाण्याची पातळी वाढल्याने पांझरा नदीवर असलेले सिद्धेश्वर गणपती, सावरकर पुतळ्याजवळील आणि एकविरा देवी मंदिराजवळील पूल तसेच कालिका माता मंदिराजवळील बंधारा कम फरशीसुद्धा पाण्याखाली गेले. तसेच नदीच्या दोन्ही बाजुला तयार करण्यात येत असलेले समांतर रस्ते देखील पाण्याखाली आले. दुपारी शाळांना सुटी जाहीर करण्यात आल्यामुळे मोठ्या पुलावर मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोडी झाली होती़ त्यामुळे वाहतूक सुरूळीत करण्यासाठी पोलिसांना अडचणीला सामोरे जावे लागले होत़सेल्फीसाठी केली गर्दी- पांझरा नदीला महापूर आल्याने चारही पुलावरील वाहतूक बंद करण्यात आले होते़ तर पुर पाहण्यासाठी नदी काठावर अनेकांनी दुपारी गर्दी केली होती़ पांझरा नदीला पूर आल्याचे फोटो अनेकांनी आपल्या मोबाईलमध्ये काढून ते व्हायरल केल्याने, अनेकांना पुराची स्थिती समजू शकली.पुरग्रस्तांना मदतीचा हात- पांझरा नदीला पुर आल्याने नदीकाठावरील नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे़ अनेकांचे घरात पाणी शिरल्याने घरातील साहित्याचे नुकसान झाले आहे़ पुरग्रस्ताना सुरक्षितस्थळी हलविण्याचे खासदार डॉ़ सुभाष भामरे, महापौर चंद्रकांत सोनार, जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल, कल्याणी अंपळकर, युवराज पाटील, शितल नवले, अमोल मासुळे, अजय नाशिककर, पारस देवपुरकर, सुनिल आहिरराव आदींनी आवाहन केले़पोलिसांनी गर्दीला पांगविली- पाण्याचा प्रवाह वाढल्याने, नदीचे पाणी गणपती मंदिरालगत आले. त्यामुळे पोलिसांनी पुलाजवळ जमलेल्या सर्वांना त्याठिकाणाहून पांगवून लावले. सुरक्षिततेचे उपाय म्हणून बॅरिकेटस लावले होते. शिवाजीरोड पर्यत पाणी दुपारी २ वाजता पांझरा नदीतील तिन्ही पुल पाण्याखाली गेले होते़ त्यामुळे नदी पात्रातील पाण्याचा प्रवाह शिवाजीरोड, ज्योती टॉकीज, अंजानशाह बाबा दर्गाच्या पायºयापर्यत पोहचले होते़ तर मोगलाई, आंबेडकर नगर, साईबाबा नगर परिसरातील घरे पाण्याखाली गेले होते़ देवपूर पश्चिम पोलीस स्टेशन व एकविरा देवी मंदिराच्या पायºया तसेच अमरधामपर्यंत पुराचे पाणी पोहचले होते़ 

टॅग्स :Dhuleधुळे