शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
3
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
4
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
5
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
6
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
7
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
8
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
9
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
10
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
11
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
12
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
13
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
14
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
15
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
16
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
17
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
18
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
19
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
20
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर

काँग्रेस -राष्ट्रवादीत उरलेल्या कार्यकर्त्यांना भाजपमध्ये आणा; चंद्रशेखर बावनकुळे यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

By भुषण चिंचोरे | Updated: September 12, 2022 16:27 IST

सोमवारी दुपारी अग्रवाल भवन येथे आयोजित संघटनात्मक बैठकीत ते बोलत होते.

धुळे : भारतीय जनता पक्षात नेत्यांची संख्या खूप आहे. आता आपल्याला नेत्यांची आवश्यकता नाही. कॉंग्रेस - राष्ट्रवादी व उद्धव ठाकरे गटात उरलेल्या कार्यकर्त्यांना भाजपात आणा, असे आवाहन भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी कार्यकर्त्यांना केले. सोमवारी दुपारी अग्रवाल भवन येथे आयोजित संघटनात्मक बैठकीत ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री खासदार डॉ. सुभाष भामरे, आमदार अमरीशभाई पटेल, आमदार जयकुमार रावल, भाजयुमोचे प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटील, आमदार काशीराम पावरा, जिल्हा बँकेचे अध्यक्ष राजवर्धन कदमबांडे, महापौर प्रदीप कर्पे, जिल्हा परिषद अध्यक्ष तुषार रंधे, भाजप महानगराध्यक्ष अनुप अग्रवाल, ग्रामीण जिल्हाध्यक्ष नारायण पाटील, भूपेशभाई पटेल, जयश्री अहिरराव आदी उपस्थित होते.

बैठकीच्या सुरुवातीला भाजप नेत्यांनी प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांचा सामूहिक सत्कार केला. नारायण पाटील यांनी प्रास्ताविक केले. पुढे बोलताना बावनकुळे म्हणाले की, कोरोनाच्या काळात सत्ताधारी घरात बसलेले असताना भाजपचे कार्यकर्ते सामान्यांची मदत करत होते. आगामी काळ निवडणुकीचा आहे, राज्यात ४५ पेक्षा जास्त खासदार व २०० पेक्षा जास्त आमदार निवडून आणायचे आहेत, त्यासाठी कार्यकर्त्यांनी आतापासून कामाला लागावे असे आवाहन त्यांनी केले.

जिल्ह्यातील प्रकल्पांसाठी भरघोस निधी : सुभाष भामरे

केंद्र शासनाच्या माध्यमातून जिल्ह्यातील प्रकल्पांसाठी भरघोस निधी आणल्याचे खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी सांगितले. सुलवाडे - जामफळ योजनेसाठी २३०० कोटी रुपयांचा निधी आणला असून ६० टक्के काम पूर्ण झाल्याचे त्यांनी सांगितले.

पाचही आमदार निवडून आणू : अमरीशभाई पटेल

आगामी विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील पाचही जागा भाजपच्या निवडून आणू, असा विश्वास आमदार अमरीशभाई पटेल यांनी व्यक्त केला. तसेच लोकसभेच्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराला शिरपूर तालुक्यातून एक लाखांचे मताधिक्य मिळवून देण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

हाऊसफुलचा बोर्ड लावा :

भाजपमध्ये नेत्यांची संख्या वाढली आहे, त्यामुळे आता हाऊसफुलचा बोर्ड लावण्याची वेळ आली असल्याचे वक्तव्य आमदार जयकुमार रावल यांनी केले. सर्वसामान्य कार्यकर्त्यांना न्याय देणारा पक्ष असल्याने भाजपची लोकप्रियता वाढली असल्याचे त्यांनी सांगितले. 

लाभार्थ्यांकडून अभिनंदनाचे पत्र घ्या : 

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी गरीबांच्या उत्थानासाठी अनेक गरीब कल्याण योजना राबवत आहेत. गरीब कल्याण योजनेचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांच्या घरी जाऊन नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन करणारे पत्र लिहून घ्यावे असे आवाहन बावनकुळे यानी कार्यकर्त्यांना केले.

टॅग्स :DhuleधुळेChandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळे