शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

राईनपाडा येथील घटनेतील मृतदेह ताब्यात घेणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2018 13:48 IST

नातेवाईकांचा पवित्रा : मृतांच्या कुटुंबास प्रत्येकी २५ लाख व एकास शासकीय नोकरीची मागणी, पिंपळनेरजवळील वस्तीत ठिय्या, मंगळवेढा परिसरातील गावांचे सरपंच, ग्रामस्थ दाखल  

ठळक मुद्देप्रत्येकी २५ लाख, एकास शासकीय नोकरीची मागणी, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाईकांचा नकार मंगळवेढा परिसरातील काही गावांचे सरपंच, ग्रामस्थ दाखल पिंंपळनेरकरांकडून मृतांच्या कुटुंबीयांसह नातेवाईकांना मदतीचा हात 

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपळनेर : साक्री तालुक्यातील राईनपाडा येथे रविवारी जमावाच्या हल्ल्यात बळी गेलेल्या मृतांच्या कुटुंबास प्रत्येकी २५ लाख रूपये व एकास शासकीय नोकरी द्या, अशी मागणी मृतांच्या नातेवाईकांनी केली आहे. तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा त्यांनी घेतला. दरम्यान मंगळवेढा परिसरातील काही गावांचे सरपंच व ग्रामस्थ पिंपळनेर येथे दाखल झाले. मृतांच्या नातेवाईकांनी येथील त्यांच्या वस्तीवरच या मागणीसाठी ठिय्या दिला आहे. रविवारी राईनपाडा येथे घडलेल्या क्रूर घटनेनंतर मृतांच्या नातेवाईकांनी रात्री उशीरा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. त्यांनी शासनाकडे घटनेतील पाचही मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी २५ लाख रूपये व कुटुंबातील एकास शासकीय नोकरी द्यावी, अशी मागणी केली. ही मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा घेत येथील वस्तीवरच ठिय्या दिला आहे. सरपंच, ग्रामस्थ दाखल दरम्यान घटनेची माहिती कळाल्यानंतर मंगळवेढा परिसरातील खवे, मानेवाडी व अन्य गावांचे सरपंच व नाथपंथी डवरी समाजाचे ग्रामस्थ येथे येऊन दाखल झाले. समाजातील आणखी काही प्रतिष्ठित व्यक्ती पिंपळनेर येथे दुपारपर्यंत दाखल होणार आहेत. त्यानंतरच आम्ही शासनाशी चर्चा करून आपला निर्णय जाहीर करू, असे मृतांच्या नातेवाईकांनी सांगितले. पिंंपळनेरकरांकडून मदतीचा हात या घटनेनंतर वस्तीवर चूल पेटली नसून मृतांच्या कुटुंबातील सदस्यांसह नातेवाईकांना मदत करण्यासाठी पिंपळनेरकर सरसावले आहेत. तेथील विविध संस्था, संघटना व व्यक्तींकडून त्यांच्या चहापानासह जेवणाची व्यवस्था करण्यात आली. इतरही मदत देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. १२ जणांसह जमावाविरूद्ध खुनाचा गुन्हा; २३ जणांना अटक  दरम्यान या क्रूर घटने प्रकरणी खूनाच्या भादंवि ३०२ कलमासह अन्य विविध कलमांन्वये १२ संशयितांसह जमावाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या पैकी २३ जणांना अटक केली असून अन्य संशयितांचा शोध घेऊन अटकेची प्रक्रिया सुरू असल्याचे पिंपळनेर पोलिसांनी सांगितले. या घटनेतील १२ संशयितांची ओळख पटली असून त्यांची नावे अशी : बाळू मन्याराम भवरे, सुरेश मोतीराम बोरसे, अशोक गोपाल राऊत, महारू वनक्या  पवार सर्व रा.राईनपाडा, मोतीराम काशिनाथ साबळे रा.निळीघोटी, ता.साक्री, दीपक रमेश गागुडे रा,सुतारे, ता.साक्री, बाबुलाल महाळचे, संदीप महाळचे, दिलीप गवळे सर्व रा.रनमळी, सुरेश कांबळे रा.काकरपाडा, काळू सोन्या गाीत, सोमा मावच्या काळ्या. यांच्यासह अन्य अनोळखी २० ते २५ जणांचा आरोपींमध्ये समावेश आहे. पोलिसांनी २३ जणांना अटक केली असून उर्वरीतांना अटकेची प्रक्रिया सुरूच आहे. या सर्वांविरूद्ध पिंपळनेर पोलिसांत गुरनं ७४/२०१८ भादंवि कलम ३०२, १४३, १४४, १४७, १४८, १४९, ३४१, ३४२, ३५३, ३२७,५०६ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. 

 

टॅग्स :DhuleधुळेChild Kidnapping Rumoursबालकांचे अपहरण अफवा