शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

अनैतिक संबंधातून भवरे येथील महिलेचा खून

By admin | Updated: April 20, 2017 00:37 IST

सहा दिवसांनी गुन्हा उघड : दोन जणांना अटक, चाºयाच्या गंजीत आढळला होता मृतदेह

नवापूर : भवरे शिवारातील शेतात १४ एप्रिल रोजी चाºयाच्या गंजीत सापडलेल्या महिलेचा अनैतिक संबंधातूनच खून झाल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी पानबारा येथील दोघांना अटक करण्यात आली आहे.शिवाजी बाबाजी गावीत (४७) रा.पानबारा व योहान जत्र्या गावीत (३७) रा.भवरे असे अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. पोलीस  सूत्रांनुसार, भवरे येथील लक्ष्मण गोपू कोकणी यांच्या शेतातील चाºयाच्या गंजीत १४ रोजी एका महिलेचा मृतदेह आढळून आला होता. महिलेचा गळा चिरलेला होता तर आजूबाजूला चाकू व बियरच्या रिकाम्या बाटल्या पडलेल्या होत्या. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध नवापूर पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल केला होता. महिलेची ओळख पटविण्याचे आवाहनदेखील करण्यात आले होते.  दरम्यान १५ रोजी पांघराणजवळील होलीपाडा येथील २२ वर्षीय युवकाने आपली आई १२ एप्रिलपासून बेपत्ता असल्याचे खबर नवापूर पोलिसात दिली. पोलिसांनी मयत महिलेचे कपडे युवकाला दाखविल्यावर त्याने ते ओळखले. त्यानंतर मयत महिलेची ओळख पटली. पोलिसांनी या महिलेचा खून का व कोणी केला याचा तपास सुरू केला. मयत महिला ही दररोज सकाळी सात वाजता शहरात येऊन सात ते आठ ठिकाणी धुणी-भांडी करीत होती. सायंकाळी ती परत घरी जात असे. तिचा पती १५ वर्षांपासून लकव्यामुळे घरीच राहत असे. एक मुलगा छापरी येथे मावशीकडे तर दुसरा तिच्यासोबत राहत होता. मुलगी सुरत येथे कामास होती. १२ एप्रिल रोजी दुपारी अडीच वाजता महिलेला फोन आला त्यानंतर ती घराबाहेर पडली, ती परत आलीच नसल्याचे सांगितल्यावर महिलेच्या फोन नंबरवरून काही माहिती मिळते का त्याचा तपास पोलीस निरीक्षक रामदास पाटील यांच्यासह पथकाने सुरू केला. त्यानुसार त्यांना पानबारा येथील शिवाजी बाबाजी गावीत (४७) याच्यावर संशय आला. त्याची कुंडली काढल्यानंतर पानबारा येथे पोलीस गेल्यावर तो पोलिसांना पाहून पळू लागला. त्याला ताब्यात घेऊन माहिती घेतली असता त्यानेच महिलेचा खून केल्याचे स्पष्ट झाले. महिलेसोबत त्याचे अनैतिक संबंध होते. त्यातून महिला वारंवार पैशांची मागणी करीत होती. त्याला कंटाळून आपण १२ एप्रिल रोजी दुपारी महिलेने फोन केला व ६० हजार रुपयांची मागणी केली. दुपारी तिला पालिका कार्यालयाजवळ भेटण्यास बोलविले. त्यांच्यात बोलणे झाल्यानंतर त्यांनी दारूच्या दुकानातून बिअर विकत घेतली. चालतच ते घोडजामणे येथे गेले. तेथून भवरे येथील योहान जत्र्या गावीत यास सोबत घेतले. त्याच्या दुचाकीवर बसून ते भवरे येथे पोहचल्यावर योहानच्या शेतात उतरून एक किलोमीटर अंतरावरील लक्ष्मण कोकणी यांचे शेत गाठले. तेथे बिअर घेतल्यानंतर त्यांच्यात पैशांच्या मुद्यावरून वाद झाला. रागाच्या भरात शिवाजी याने बिअरची बाटली फोडून पोटावर व गळ्यावर वार केला. त्यात महिलेचा मृत्यू झाला. इकडे योहान वाट पाहून थकल्यावर तो त्यांना पाहण्यास गेला असता शिवाजी गावीत हा महिलेचा मृतदेह ओढताना आढळून आला. झोपडीच्या बाजूला असलेल्या चाºयाच्या गंजीत त्याने मृतदेह लपविला. त्यानंतर योहान याने त्याच्या दुचाकीवरून शिवाजी यावीत यास देवळफळी येथे सोडून परत भवरे येथे गेल्याची माहिती पोलीस निरीक्षक रामदास पाटील यांनी दिली. त्यावरून दोघांना अटक करण्यात आली असून त्यांना सात दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.(वार्ताहर) दोघा आरोपींना सात दिवसांची कोठडीअटक करण्यात आलेल्या शिवाजी बाबाजी गावीत व योहान जत्र्या गावीत यांना बुधवारी नवापूर न्यायालयात उभे केले असता न्यायालयाने त्यांना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपींना शिताफीने अवघ्या चार दिवसातच अटक करण्यात नवापूर पोलिसांना यश आले. या घटनेतील महिलेची ओळख, अज्ञात आरोपींपर्यंत पोहचण्याचे दिव्य या बाबी पोलिसांपुढे आव्हान होत्या. परंतु पोलिसांनी अतिशय शिताफीने या गुन्ह्याचा छडा लावला.-रामदास पाटील, पोलीस निरीक्षक, नवापूर.