शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

अनैतिक संबंधातून भवरे येथील महिलेचा खून

By admin | Updated: April 20, 2017 00:37 IST

सहा दिवसांनी गुन्हा उघड : दोन जणांना अटक, चाºयाच्या गंजीत आढळला होता मृतदेह

नवापूर : भवरे शिवारातील शेतात १४ एप्रिल रोजी चाºयाच्या गंजीत सापडलेल्या महिलेचा अनैतिक संबंधातूनच खून झाल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी पानबारा येथील दोघांना अटक करण्यात आली आहे.शिवाजी बाबाजी गावीत (४७) रा.पानबारा व योहान जत्र्या गावीत (३७) रा.भवरे असे अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. पोलीस  सूत्रांनुसार, भवरे येथील लक्ष्मण गोपू कोकणी यांच्या शेतातील चाºयाच्या गंजीत १४ रोजी एका महिलेचा मृतदेह आढळून आला होता. महिलेचा गळा चिरलेला होता तर आजूबाजूला चाकू व बियरच्या रिकाम्या बाटल्या पडलेल्या होत्या. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध नवापूर पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल केला होता. महिलेची ओळख पटविण्याचे आवाहनदेखील करण्यात आले होते.  दरम्यान १५ रोजी पांघराणजवळील होलीपाडा येथील २२ वर्षीय युवकाने आपली आई १२ एप्रिलपासून बेपत्ता असल्याचे खबर नवापूर पोलिसात दिली. पोलिसांनी मयत महिलेचे कपडे युवकाला दाखविल्यावर त्याने ते ओळखले. त्यानंतर मयत महिलेची ओळख पटली. पोलिसांनी या महिलेचा खून का व कोणी केला याचा तपास सुरू केला. मयत महिला ही दररोज सकाळी सात वाजता शहरात येऊन सात ते आठ ठिकाणी धुणी-भांडी करीत होती. सायंकाळी ती परत घरी जात असे. तिचा पती १५ वर्षांपासून लकव्यामुळे घरीच राहत असे. एक मुलगा छापरी येथे मावशीकडे तर दुसरा तिच्यासोबत राहत होता. मुलगी सुरत येथे कामास होती. १२ एप्रिल रोजी दुपारी अडीच वाजता महिलेला फोन आला त्यानंतर ती घराबाहेर पडली, ती परत आलीच नसल्याचे सांगितल्यावर महिलेच्या फोन नंबरवरून काही माहिती मिळते का त्याचा तपास पोलीस निरीक्षक रामदास पाटील यांच्यासह पथकाने सुरू केला. त्यानुसार त्यांना पानबारा येथील शिवाजी बाबाजी गावीत (४७) याच्यावर संशय आला. त्याची कुंडली काढल्यानंतर पानबारा येथे पोलीस गेल्यावर तो पोलिसांना पाहून पळू लागला. त्याला ताब्यात घेऊन माहिती घेतली असता त्यानेच महिलेचा खून केल्याचे स्पष्ट झाले. महिलेसोबत त्याचे अनैतिक संबंध होते. त्यातून महिला वारंवार पैशांची मागणी करीत होती. त्याला कंटाळून आपण १२ एप्रिल रोजी दुपारी महिलेने फोन केला व ६० हजार रुपयांची मागणी केली. दुपारी तिला पालिका कार्यालयाजवळ भेटण्यास बोलविले. त्यांच्यात बोलणे झाल्यानंतर त्यांनी दारूच्या दुकानातून बिअर विकत घेतली. चालतच ते घोडजामणे येथे गेले. तेथून भवरे येथील योहान जत्र्या गावीत यास सोबत घेतले. त्याच्या दुचाकीवर बसून ते भवरे येथे पोहचल्यावर योहानच्या शेतात उतरून एक किलोमीटर अंतरावरील लक्ष्मण कोकणी यांचे शेत गाठले. तेथे बिअर घेतल्यानंतर त्यांच्यात पैशांच्या मुद्यावरून वाद झाला. रागाच्या भरात शिवाजी याने बिअरची बाटली फोडून पोटावर व गळ्यावर वार केला. त्यात महिलेचा मृत्यू झाला. इकडे योहान वाट पाहून थकल्यावर तो त्यांना पाहण्यास गेला असता शिवाजी गावीत हा महिलेचा मृतदेह ओढताना आढळून आला. झोपडीच्या बाजूला असलेल्या चाºयाच्या गंजीत त्याने मृतदेह लपविला. त्यानंतर योहान याने त्याच्या दुचाकीवरून शिवाजी यावीत यास देवळफळी येथे सोडून परत भवरे येथे गेल्याची माहिती पोलीस निरीक्षक रामदास पाटील यांनी दिली. त्यावरून दोघांना अटक करण्यात आली असून त्यांना सात दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.(वार्ताहर) दोघा आरोपींना सात दिवसांची कोठडीअटक करण्यात आलेल्या शिवाजी बाबाजी गावीत व योहान जत्र्या गावीत यांना बुधवारी नवापूर न्यायालयात उभे केले असता न्यायालयाने त्यांना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपींना शिताफीने अवघ्या चार दिवसातच अटक करण्यात नवापूर पोलिसांना यश आले. या घटनेतील महिलेची ओळख, अज्ञात आरोपींपर्यंत पोहचण्याचे दिव्य या बाबी पोलिसांपुढे आव्हान होत्या. परंतु पोलिसांनी अतिशय शिताफीने या गुन्ह्याचा छडा लावला.-रामदास पाटील, पोलीस निरीक्षक, नवापूर.