शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

नोटबंदीचा आजही व्यापारावर परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2019 13:13 IST

तीन वर्ष पूर्ण : व्यापाऱ्यांचे मत

धुळे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबर २०१६ मध्ये देशातील हजार व पाचशे रूपयांच्या नोटा बंदीचा निर्णय घेतला होता़ या निर्णयाचा आजही व्यापार उद्योगावर परिणाम होत असल्याचे मत व्यापाऱ्यांनी ‘लोकमत’ शी बोलतांना व्यक्त केले.काही काळ होता परिणामतीन वर्षापुर्वी केंद्र सरकारने देशात नोटबंदीचा निर्णय घेतला होतो़ त्यामुळे काही काळ लोकांमध्ये नाराजी होती़ आता मात्र व्यापार, उद्योगात कोणताही परिणाम दिसुन येत नाही़ नोटाबंदीचा विषय काही लोक उकरून काढत बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे़- अरूण नावरकर(किराणा व्यापारी असोसिएशन)आजही व्यापारावर परिणामकेंद्र सरकारच्या नोटबंदीचा निर्णय आजही व्यापारावर जाणवत आहे़ नोट बंदीचा निर्णय व्यापाºयांचा समर्थनार्थ नव्हता़ त्यामुळे तीन वर्षानंतरही त्याचा परिणाम व्यापार उद्योगावर दिसत आहे़ बाजारपेठ स्थिर होण्यासाठी किमान तीन ते चार वर्ष लागू शकतात़-राजेश गिंंदोंडिया(व्यापारी महासंघाचे सचिव)अर्थव्यवस्थेवर परिणामकेंद्र नोटबंदीला तीन वर्षपुर्ण होत आह़े़ निर्णय झाल्यावर देखील जाणकारांनी नोटबंदीच निर्णय चुकीचा होता़ व त्याचा परिणाम अर्थव्यवस्थेवर होऊ शकतो़ अशी शक्यता वर्तविली होती़ त्यामुळ आज अर्थव्यवस्थेला मरगळ आलेली दिसते़-एस़ वाय़ बच्छाव(सेवानिवृत्त प्राध्यापक)काही काळ होता परिणामव्यापार किंवा उद्योगावर नोटबंदीचा तीन वर्षापासुन कोणताही परिणाम दिसुन येत नाही़ उलट व्यापार व्यवसायाला चालना मिळाली आहे़ सर्वसामान्य व्यक्तीवर तर काहीच परिणाम झालेला नाही़ सध्या पावसामुळे बाजारात मंदीचे सावट आहे़- सुभाष कोटेजा(अध्यक्ष, असो. आॅफ बिझनेस अ‍ॅन्ड कॉमर्स )नोटबंदीचा निर्णय योग्यनोटबंदीच्या काळात एक हजार आणि पाचशे रूपयांच्या नोटा बंद होत्या़ त्यामुळे इतर नोटा चालु असल्याने उद्योग, व्यापारी किंवा व्यवसायावर काहीही परिणाम झाला नाही़ उलट नोटबंदीच्या निर्णयानंतर आॅनलाईन बॅर्किगव्दारे उद्योग व व्यापारात भर पडली़-अजय नाशिककर(उद्योजक)अर्थव्यवस्थेवर परिणामकेंद्र सरकारने देशातील काळा पैसा काढण्यासाठी नोटाबंदीचा निर्णय घेतला होता़ यानिर्णयाने फायदा होईल असे वाटत होते़ मात्र नोटबंदीचा फटका सर्वसामान्य व्यक्तीपासून तर उद्योगावर देखील झालेला दिसून आला़ त्यामुळे आजही देशातील अर्थव्यवस्थेवर परिणाम दिसतो़-धिरज पाटील(व्यापारी)

टॅग्स :Dhuleधुळे