शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
2
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
3
आंध्र प्रदेशातील ग्रॅनाइट खाणीत मोठी दुर्घटना, ६ स्थलांतरित कामगारांचा मृत्यू, ३ जखमी
4
सुरक्षित गुंतवणुकीसह जबरदस्त रिटर्न! कमाईची उत्तम संधी आहेत या ५ स्कीम; मिळेल ८% पेक्षा जास्त व्याज
5
मनसे, उद्धवसेना, शेकाप, राष्ट्रवादी एकत्र आले म्हणजे..?
6
विमान उड्डाण करणारच होतं अन् केबिन तापलं; एअर इंडियाची 'ही' फ्लाइट झाली रद्द 
7
‘झोपु’ योजनेत ८० कोटींचा घोटाळा; विकासकांवर गुन्हा; आशापुरा ग्रुपच्या ७ जणांविरोधात टिळक नगर पोलिसांकडून तपास सुरू
8
आजचे राशीभविष्य, ०४ ऑगस्ट २०२५: ६ राशींना शुभ फलदायी दिवस, अचानक धनलाभ योग; कार्यात यश
9
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
10
अजेंटिक AI : ते काम करेलच, विचारही स्वत:च करेल!
11
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
12
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
13
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
14
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
15
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
16
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
17
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
18
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
19
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
20
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले

तीन वर्षात भाजपा सरकार सर्व पातळ्यावर अपयशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2017 14:42 IST

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची टीका, शिंदखेड्यात झाली सभा

ठळक मुद्दे नगरपंचायत निवडणुकीनिमित्त माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची सभासभेत केंद्र व राज्य शासनावर केली टीका नांदेड मनपाप्रमाणेच शिंदखेडा नगरपंचायत निवडणुकीत एकहाती सत्ता देण्याचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कशिंदखेडा: ‘अच्छे दिन’चे स्वप्न जनतेला दाखवून केंद्र व राज्यात सत्ता मिळविणारे भाजपा सरकार गेल्या तीन वर्षाच्या काळात सर्व पातळ्यांवर अपयशी ठरले आहे. सरकारच्या धोरणामुळे शेतकरी, जनता, व्यापारी हे त्रस्त झालेले आहेत. भाजपाला त्यांची जागा दाखविल्याशिवाय परिवर्तन घडणार नाही.त्यामुळे शिंदखेडा नगरपंचायत निवडणुकीत कॉँग्रेस-राष्टÑवादी कॉँग्रेसला एकहाती सत्ता द्या असे आवाहन राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण यांनी आज येथे केले.शिंदखेडा नगर पंचायत निवडणुकीनिमित्त कॉंग्रेसची प्रचार सभा शुक्रवारी शहरातील गांधी चौकात झाली. त्यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री रोहीदास पाटील, डॉ. हेमंत देशमुख, आमदार डी.एस. अहिरे, अब्दुल सत्तार, कॉँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष श्यामकांत सनेर, राष्टÑवादीचे जिल्हाध्यक्ष किरण शिंदे, ज्ञानेश्वर भामरे, कॉँग्रेसच्या अ‍ॅड.ललिता पाटील आदी होते.अशोक चव्हाण पुढे म्हणाले की, मोदी लाटेवर सत्तेत आलेल्या भाजपा सरकारने जनतेची दिशाभूल केली. ‘मन की बात’, ‘मी मुख्यमंत्री बोलतोय’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून जनतेला विकास कामांचे स्वप्न दाखविले जात आहे. मात्र त्याची पूर्तता झालेली नाही. सरकारतर्फे विकास कामांची वल्गना केली जात असतांना, प्रत्यक्षात काही होत नसल्याने, सरकारने आता ‘काम की बात’ करावी अशी परिस्थिती असल्याचे सांगत, चव्हाण यांनी सरकारवर जोरदार टीका केली.बोंडअळीमुळे नुकसानराज्यात बोंड अळीच्या प्रादुर्भावामुळे शेतकºयांचे १७०० कोटी रूपयांचे नुकसान झाले. सरकारने १५ लाख शेतकºयांना ३४०० कोटी रूपयांची कर्जमाफी जाहीर केली. प्रत्यक्षात मात्र अनेक शेतकरी कर्जमाफीपासून वंचीत आहेत. सरकारतर्फे ‘मेक इन इंडिया’चा नारा दिला जातो आहे. परंतु हे मेक इन इंडीया नव्हे तर फेक इन इंडीया आहे. जनतेला विकास कामांचे स्वप्न दाखविणारे सरकार सर्वच पातळीवर अपयशी ठरले आहे. त्यामुळे भाजपाला मते मागण्याचा अधिकार दिला कोणी? असा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यासाठी जे नांदेड मनपा निवडणुकीत जनतेने करून दाखविले तेच शिंदखेडा नगरपंचायत निवडणुकीत करून, कॉँग्रेसला एकहाती सत्ता द्यावी असे आवाहन त्यांनी केले.