शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात उडाला काँग्रेसच्या 'लाडकी बहीण' योजनेचा बोजवारा? दोन महिन्यांचे मानधन रखडले, खुद्द मंत्र्यांचीच कबुली!
2
लग्न होत नसेल, नोकरी मिळत नसेल तर 'राम' नामाचा जप करा; भाजपा खासदारानं संसदेत सांगितला उपाय
3
काश्मीर खोऱ्यात सैन्याला मिळाले १२ हत्तींचे बळ! मिलिटरी ट्रेनने रणगाडे, अवजड शस्त्रास्त्रे नेण्यात यश...
4
प्रसिद्ध माजी क्रिकेटपटू अन् दुबई एअरलाइन्सच्या माजी मालकाची पत्नी स्टेशवर सापडली; भीषण अवस्था, व्हिडीओ व्हायरल, नेमकं सत्य काय?
5
उत्तराखंडच्या राज्यपालांचा धामींना धक्का ! UCC दुरुस्ती व धर्मांतर विरोधी सुधारणा विधेयक परत पाठविले
6
Rakhi Sawant : Video - "माफी मागा, मी तुमचं धोतर खेचलं तर...", नितीश कुमारांवर भडकली राखी सावंत
7
म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! सेबीने एक्सपेन्स रेशोचे नियम बदलले, कमाईवर थेट परिणाम
8
खळबळजनक! घर मालकिणीने भाडं मागितलं, कपलने तिलाच संपवलं; मृतदेहाचे तुकडे केले अन्...
9
परदेश दौऱ्यावर जाताय? ट्रॅव्हल इन्शुरन्स घेताना 'या' चुका टाळा; अन्यथा खिशाला बसू शकतो मोठा फटका
10
Bomb Threat: न्यायाधीशांना ई-मेल पाठवून नागपूर जिल्हा न्यायालयात बॉम्बस्फोट करण्याची धमकी
11
सुरक्षा दलांची मोठी कामगिरी; छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात 3 नक्षलवादी ठार, शस्त्रसाठा जप्त
12
माजी आमदार प्रज्ञा सातव यांचा भाजपमध्ये प्रवेश! काँग्रेसचं काय चुकतंय विचारताच, म्हणाल्या...
13
५ राजयोगात मार्गशीर्ष अमावास्या २०२५: ९ राशींवर लक्ष्मी कुबेर कृपा, कल्पनेपलीकडे यश-पैसा-लाभ!
14
Creta ला टक्कर देण्यासाठी येतेय Mahindra ची नवी 'मिड-साईज' SUV; असे असेल डिझाईन अन् खासियत
15
मार्गशीर्ष अमावस्या २०२५: वर्षातली शेवटची आणि प्रभावशाली रात्र; आठवणीने करा 'हे' ५ उपाय!
16
‘मला उमेदवारी द्या, अन्यथा माझ्या जीवाचं काही बरंवाईट झाल्यास पक्ष जबाबदार राहील’, भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्त्याची धमकी
17
चांदीची 'पांढरी' लाट! सोन्याला मागे टाकत गाठला २ लाखांचा ऐतिहासिक टप्पा; काय आहेत भाववाढीची कारणे?
18
डोनाल्ड ट्रम्प यांनी अचानक का वापरलं 'भारत मॉडेल'?; मिड टर्म निवडणुकीपूर्वी अमेरिकेत मोफत खैरात
19
'पुढे दरोडा पडलाय, दागिने काढून ठेवा'; पोलिसांच्या वेशातील टोळीचा पर्दाफाश, लोकांना घाबरवून लुटायचे
20
"विश्वविख्यात बोलले म्हणजे त्यांचे २९ महापालिकांत पराभव पक्के", भाजपाने संजय राऊतांना डिवचलं
Daily Top 2Weekly Top 5

तीन वर्षात भाजपा सरकार सर्व पातळ्यावर अपयशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2017 14:42 IST

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची टीका, शिंदखेड्यात झाली सभा

ठळक मुद्दे नगरपंचायत निवडणुकीनिमित्त माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची सभासभेत केंद्र व राज्य शासनावर केली टीका नांदेड मनपाप्रमाणेच शिंदखेडा नगरपंचायत निवडणुकीत एकहाती सत्ता देण्याचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कशिंदखेडा: ‘अच्छे दिन’चे स्वप्न जनतेला दाखवून केंद्र व राज्यात सत्ता मिळविणारे भाजपा सरकार गेल्या तीन वर्षाच्या काळात सर्व पातळ्यांवर अपयशी ठरले आहे. सरकारच्या धोरणामुळे शेतकरी, जनता, व्यापारी हे त्रस्त झालेले आहेत. भाजपाला त्यांची जागा दाखविल्याशिवाय परिवर्तन घडणार नाही.त्यामुळे शिंदखेडा नगरपंचायत निवडणुकीत कॉँग्रेस-राष्टÑवादी कॉँग्रेसला एकहाती सत्ता द्या असे आवाहन राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण यांनी आज येथे केले.शिंदखेडा नगर पंचायत निवडणुकीनिमित्त कॉंग्रेसची प्रचार सभा शुक्रवारी शहरातील गांधी चौकात झाली. त्यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री रोहीदास पाटील, डॉ. हेमंत देशमुख, आमदार डी.एस. अहिरे, अब्दुल सत्तार, कॉँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष श्यामकांत सनेर, राष्टÑवादीचे जिल्हाध्यक्ष किरण शिंदे, ज्ञानेश्वर भामरे, कॉँग्रेसच्या अ‍ॅड.ललिता पाटील आदी होते.अशोक चव्हाण पुढे म्हणाले की, मोदी लाटेवर सत्तेत आलेल्या भाजपा सरकारने जनतेची दिशाभूल केली. ‘मन की बात’, ‘मी मुख्यमंत्री बोलतोय’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून जनतेला विकास कामांचे स्वप्न दाखविले जात आहे. मात्र त्याची पूर्तता झालेली नाही. सरकारतर्फे विकास कामांची वल्गना केली जात असतांना, प्रत्यक्षात काही होत नसल्याने, सरकारने आता ‘काम की बात’ करावी अशी परिस्थिती असल्याचे सांगत, चव्हाण यांनी सरकारवर जोरदार टीका केली.बोंडअळीमुळे नुकसानराज्यात बोंड अळीच्या प्रादुर्भावामुळे शेतकºयांचे १७०० कोटी रूपयांचे नुकसान झाले. सरकारने १५ लाख शेतकºयांना ३४०० कोटी रूपयांची कर्जमाफी जाहीर केली. प्रत्यक्षात मात्र अनेक शेतकरी कर्जमाफीपासून वंचीत आहेत. सरकारतर्फे ‘मेक इन इंडिया’चा नारा दिला जातो आहे. परंतु हे मेक इन इंडीया नव्हे तर फेक इन इंडीया आहे. जनतेला विकास कामांचे स्वप्न दाखविणारे सरकार सर्वच पातळीवर अपयशी ठरले आहे. त्यामुळे भाजपाला मते मागण्याचा अधिकार दिला कोणी? असा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यासाठी जे नांदेड मनपा निवडणुकीत जनतेने करून दाखविले तेच शिंदखेडा नगरपंचायत निवडणुकीत करून, कॉँग्रेसला एकहाती सत्ता द्यावी असे आवाहन त्यांनी केले.