शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

वादळ व गारपीटमुळे कोट्यावधीचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2020 12:33 IST

शिरपूर तालुका : मृतांची संख्या झाली दोन; आठ जनावरे मृत्यूमुखी; ४४ गावातील पिके जमीनदोस्त

लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर : शहरासह तालुक्यात मंगळवारी झालेल्या अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे तब्बल १३ हजार ७०० हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे ३३ टक्यांपेक्षा जास्त नुकसान झाले आहे. तर गारपीटमुळे आठ जनावरे मृत्यूमुखी पडली. या अवकाळी पावसामुळे तालुक्यातील ४४ गावातील केळी, पपई, गहु, हरभरा, टरबूज, डांगर आदी पिके भुईसपाट झाली असून, कोट्यावधीचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे गुरूवारपासून सुरू करण्यात येणार आहेत.शिरपूर येथे मंगळवारी झालेल्या वादळात पत्र्याचे शेड अंगावर पडून राजेंद्र धुडकू माळी यांचा मृत्यू झाला. तर सत्तरसिंग भिकेसिंग सिसोदिया (वय ५५) रा.आढे हे शिरपूरहून गावी जात असताना शिरपूर बसस्थानकाजवळ ते रिक्षेत बसले असताना मंगळवारी सायंकाळी अचानक गारपीटीमुळे त्यांचा मृत्यू झाला.शिरपूर तालुक्यात झालेल्या वादळीवाºयामुळे केळी, गहू पिके भुईसपाट झालेली आहेत. त्यात शिंगावे शिवारात मोठ्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शिरपूर शिवारात कमी प्रमाणात नुकसान झाले आहे.आढे शिवारचंद्रकांत सदाशिव सोनार यांचे साडेचार एकर केळीचे अंदाजे २० ते २२ लाख, योगेश सदाशिव सोनार यांच्या साडेचार एकर शेतातील केळी, पपई पिकाचे १० लाख, भटूसिंग सुदामसिंग राजपूत यांचे सहा एकर मधील केळी व पपईचे १५ लाख, नंदु श्रावण सोनार २.५ एकरात आठ लाख, किशोर माळी यांच्या ३ एकरातील केळीचे १२ ते १५ लाख, पुंडलिक हरि पाटील ३ एकरातील केळी सात लाखाचे नुकसान झाले आहे.शिंगावे शिवारविजय खेमचंद धाकड यांच्या १२ एकर शेतातील पपई, डांगर, केळीचे २८ ते ३० लाखाचे नुकसान झाले आहे. याच शिवारातील शिरीष मनोहर पाटील यांच्या १५ एकरातील केळी, पपईचे ४० लाख, रमेश आनंदराव पाटील यांच्या ७ एकरातील केळी, टरबूज या पिकांचे १२ ते १५ लाखाचे नुकसान झाले आहे. विजय निळकंठ पाटील १० एकरातील केळी, पपई १२ ते १५ लाख, जयवंत फकिरा पाटील सात एकर केळी, पपईचे २० लाख, गणेश फकिरा पाटील सहा एकरातील केळी, पपईचे १२ ते १५ लाख, देविदास मोतीराम पाटील तीन एकरातील केळीचे १० लाख, चंद्रकांत नथ्थू पाटील १५ एकरातील केळी, पपईचे ३० लाखाचे नुकसान, मधुकर फकिरा पाटील आठ एकरातील केळी, पपई, २० लाख, सुरेश निळकंठ पाटील तीन एकर केळीचे सात लाख, दीपक पाटील तीन एकर केळी सात लाख, महेश अरविंद माळी आठ एकर केळी २० लाख, निलेश साहेबराव पाटील चार एकर केळी आठ लाख, गुलाब निंबा पाटील सहा एकर केळी १५ लाख, रिंकू पाटील तीन एकर केळी आठ लाख, चंद्रकांत पाटील तीन एकरातील केळी सात लाखाचे नुकसान झाले आहे. दिवान आनंदराव पाटील तीन एकरातील केळी आठ लाख, तर धिरज शंभु पाटील यांच्या तीन एकरातील केळीचे आठ लाखाचे नुकसान झाले आहे.हिंगोणी शिवाररवींद्र भाईदास पाटील तीन एकरातील आठ लाखाचे नुकसान, विनोद नामदेव पाटील तीन एकर केळी ८ लाख, मिलिंद पाटील तीन एकर केळी सात लाख, रणजित सुभाष पाटील तीन एकर केळी पाच लाख, मनोहर परबत पाटील चार एकरातील केळी १२ लाख, कुंदन पाटील चार एकर केळी १२ लाख, प्रमोद पाटील तीन एकर केळी आठ लाख, चंद्रकांत भास्कर पाटील अडीच एकरातील केळी आठ लाख, रावसाहेब पाटील अडीच लाख एकरातील केळीच्या पिकांचे सहा लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.शिरपूर शिवारशिरपूर शिवारातील मनोज प्रदिप बाविस्कर यांच्या १६ एकरातील केळी व पपई पिकाचे २५ लाखाचे नुकसान झाले आहे. श्रीलाल शर्मा यांच्या तीन एकर मधील केळीचे आठ लाखाचे तर जितेंद्र पोतदार यांच्या तीन एकरातील केळीचे आठ लाखाचे नुकसान झाले आहे.राजेंद्र गुलाबसिंग गिरासे यांचे अजंदे शिवारातील सेडनेट मधील पपई रोपांचे नुकसान होऊन ६० ते ७० लाखांचे नुकसान झाले तसेच चार एकर केळी व पाच एकरातील कांद्याचे नुकसान झाले.तहसील कार्यालयातील कालच्या वादळामुळे तहसील कार्यालयातील डोमचा पत्रा उडून मोठे नुकसान झाले.शिरपूर शहरातील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयाशेजारी झाड पडल्यामुळे कार्यालयाचे नुकसान झाले. तर शिरपूर पोलीस स्टेशन परिसरात असलेल्या झाडांच्या फाद्यांमुळे कौलांचे नुकसान झाले तसेच वाहनांचे देखील नुकसान झाले आहे. शिरपूर येथील विश्वासराव रंधे क्रीडा संकुलाचा पत्रा उडून नुकसान झाले आहे. वादळामुळे जि.प. शाळेतील कौलांचे नुसान झाले. त्यामुळे वर्गखोल्यांचे नुकसान झाले आहे.शिरपूर शहरातील रामसिंग नगरात नुकसानग्रस्त लोकांची जेवणाची व्यवस्था भूपेशभाई पटेल यांनी चोपडा जीन आश्रमशाळेत केली होती. काही कुटुंबांना त्यांनी धान्याचा साठा दिला. कळमसरे येथे चारण समाजाचे लोक झोपड्या करुन राहतात. वादळी पावसामुळे झोपड्या उडून गेल्या त्यांचा संसार उघड्यावर पडला. विजपुरवठा खंडीत असल्यामुळे पाण्याची समस्या निर्माण झाली. भूपेशभाई पटेल यांनी तातडीने पाण्याचे टँकर पाठवून सुविधा उपलब्ध करुन दिली.शिवसेनेकडून पाहणीशिवसेनेचे जिल्हाध्यक्ष हेमंत साळुंखे, उपाध्यक्ष हिंमत महाजन, एस.टी. कामगार संघटनेचे अध्यक्ष राजू टेलर, तालुका प्रमुख भरत राजपूत, शहर प्रमुख मनोज धनगर, कुबेर जमादार आदींनी नुकसानग्रस्त गावांची पाहणी करुन तहसीलदार आबा महाजन यांची भेट घेतली.दरम्यान हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्याने बळीराजा हतबल झाला आहे.

टॅग्स :Dhuleधुळे