शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
2
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
3
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
4
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
5
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
6
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
7
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
8
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
9
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
10
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
11
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
12
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
13
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
14
समसप्तक नीचभंग राजयोग: ९ राशींना सुवर्ण काळ, अडकलेले पैसे मिळतील; शेअर बाजारात नफा, शुभ-लाभ!
15
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
16
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
17
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
18
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
19
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी
20
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया

दुष्काळ मुक्तीसाठी ‘जलसिंचन’ उत्तम पर्याय!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2019 22:35 IST

नाम फाऊंडेशनने घेतला पुढाकार । प्रशासनासह ग्रामस्थांचे श्रमदान ठरणार मोलाचे

संडे हटके बातमीदेवेंद्र पाठक ।लोकमत न्यूज नेटवर्क धुळे : सतत पडणारा दुष्काळ, नापिकी अशा द्विदा मनस्थितीत बळीराजा वावरत असताना त्याला उत्तम पर्याय हा जलसिंचनाचा ठरणार आहे़ हा धागा पकडून नाम फाऊंडेशनची निर्मिती झाली़ या संघटनेच्या माध्यमातून होणारे काम आता धुळे तालुक्यात देखील सुरु झाले आहे़ त्याचा काही अंशी का असेना शेती सिंचनाखाली येत असल्याने दुष्काळसदृश्य परिस्थितीच्या दाहकतेत फरक पडत आहे़  शेतकºयांच्या होणाºया आत्महत्या, त्यांना मिळणारी तुटपुंजी मदत लक्षात घेता सिंचनाच्या माध्यमातून शेतकरी संपन्न होऊ शकतो असा विचार पुढे आला़ आॅगस्ट २०१५ च्या दरम्यान महाराष्ट्रातील विदर्भ आणि मराठवाडा या दुष्काळी भागांमध्ये आत्महत्याग्रस्त शेतकºयांच्या कुटुंबीयांना अभिनेते नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी वैयक्तिक पातळीवर आर्थिक मदत केली. सुरुवातीला नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील २०१५ या वर्षी आत्महत्या केलेल्या २३० शेतकºयांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी १५ हजारांचा धनादेश, ब्लँकेट, साडी-चोळी, वर्षभराचे मेडिकल किट असे मदतीचे स्वरूप होते. परंतु, केवळ काही निवडक कुटुंबीयांना मदत करण्यापेक्षा या मदतीची व्याप्ती वाढवण्यासाठी नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी एका सामाजिक संस्थेची स्थापना करण्याचे ठरवले. मदतीचे स्वरूप फक्त आर्थिक मदत न रहाता शेतकºयांना व त्यांच्या कुटुंबीयांना काही पर्यायी उत्पन्नाचे साधन उपलब्ध करून देणे याकडे पण लक्ष देता यावे यासाठी या संस्थेची कल्पना पुढे आली. या कल्पनेचे रुपांतर ‘नाम’ फाऊंडेशन या संस्थेमध्ये झाले. ‘नाम’ फाऊंडेशनचे कार्य संपुर्ण राज्यात सुरु झाले असताना ते अधिक गतीने होण्यासाठी जिल्हा समन्वयकाची नियुक्ती करण्यात आली़ त्यात अनेकांनी सहभाग नोंदवत असताना आपले काम सांभाळून केवळ सामाजिक कामात सक्रीय झाले़ धुळे जिल्ह्याचे समन्वयक म्हणून प्रदीप पानपाटील यांच्याकडे जबाबदारी सोपविण्यात आली़ त्यांच्याकडून ही जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली जात आहे़ सिंचन कामांसोबत आरोग्य सेवेसाठी सक्रीय‘नाम’ फाऊंडेशनचे समन्वयक म्हणून प्रदीप पानपाटील हे काम करत असलेतरी यापुर्वीपासून ते आरोग्य सेवेत सक्रीय आहे़ सर्वसामान्य रुग्णांना वैद्यकीय सेवा कशी उपलब्ध होईल, याकडे त्यांचा नेहमी कटाक्ष राहिला आहे़ अगदी निरपेक्ष भावनेने, त्यांचे कार्य सुरु आहे़दुष्काळसदृश्य परिस्थिती हटविण्यासाठी प्रयत्नधुळे तालुक्यातील लामकानी येथे ४ ते ५ किमी इतक्या अंतरात नाल्याचे खोलीकरण, पाझर तलावाचे काम करण्यात आले़ तसेच काम धुळे तालुक्यातील मांडळ येथेही १० किमी अंतरात काम सुरु आहे़ त्याचा लाभ गावकºयांना होणार असल्याने त्यांच्याकडून श्रमदान होत आहे़ प्रशासनाची देखील मदत मिळत आहे़ पाझर तलाव, नाला खोलीकरण असे काम करत असताना संघटनेच्या माध्यमातून पोकलॅण्ड मशिन उपलब्ध करुन दिले जात आहे़ यासाठी जे काही डिझेल लागत आहे ते प्रशासनाकडून मिळत आहे़ संघटनेसह गावकºयांचे मिळत असलेल्या श्रमदानातून खूप मोठ्या कामांचा पल्ला गाठला जात आहे़ दुष्काळ हटविण्यासाठी हे प्रगतीचे पाऊल आहे़ 

टॅग्स :Dhuleधुळे