शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

आता व्हा आत्मनिर्भर; १९२ जणांना मिळणार १० लाखांपर्यंत अनुदान जिल्ह्यातून आतापर्यंत २९ अर्ज; धुळे, साक्रीतून दोन प्रस्ताव बँकांकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:41 IST

धुळे : केंद्र शासनाने आत्मनिर्भर भारत पॅकेजअंतर्गत प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्यप्रक्रिया उद्योग ही योजना २०२०-२१ ते २०२४-२५ या कालावधीत राबविण्याची ...

धुळे : केंद्र शासनाने आत्मनिर्भर भारत पॅकेजअंतर्गत प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्यप्रक्रिया उद्योग ही योजना २०२०-२१ ते २०२४-२५ या कालावधीत राबविण्याची कार्यवाही सुरू केली आहे. प्रकल्प खर्चाच्या ३५ टक्के आणि कमाल १० लाखांपर्यंत अनुदान मिळणार आहे.

या योजनेसाठी जिल्ह्याला १९२ प्रकरणांचे उद्दिष्ट प्राप्त झाले आहे. आतापर्यंत २९ अर्ज आले असून, त्यापैकी धुळे आणि साक्री तालुक्यात प्रत्येकी एका प्रस्तावाला जिल्हास्तरीय समितीने मंजुरी दिली आहे. दोन्ही प्रस्ताव कृषी विभागाने संबंधित बँकांकडे अर्थसाहाय्यासाठी पाठविले आहेत.

‘एक जिल्हा, एक उत्पादन’ या धर्तीवर ही योजना राबविली जाणार आहे. धुळे जिल्ह्यात केळी पिकासाठी ही योजना मंजूर आहे. या योजनेंतर्गत अन्नप्रक्रिया उद्योगांसाठी, तसेच सामाईक पायाभूत सुविधा केंद्रासाठी ३५ टक्के अनुदान, ब्रँडिंग व मार्केटिंगसाठी एकूण खर्चाच्या ५० टक्के अनुदान, स्वयंसाहाय्यता गटांना बीज भांडवल, तसेच लहान उपकरणे खरेदीसाठी ४० हजार प्रतिसभासद याप्रमाणे ४ लाख रुपयांपर्यंत अनुदान देय राहील. ‘एक जिल्हा, एक उत्पादन’ या घटकांतर्गत नवीन प्रकल्पांचे प्रस्ताव सादर करता येतील. सद्य:स्थितीत अस्तित्वात असलेल्या अन्नप्रक्रिया प्रकल्पांच्या विस्तारीकरणासाठी स्थरवृद्धी, आधुनिकीकरण या प्रकल्पांचे प्रस्तावदेखील या योजनांमध्ये सादर करता येतील. म्हणजे केळी पिकावर आधारित नवीन अन्नप्रक्रिया उद्योग सुरू करता येईल, तर या पिकांव्यतिरिक्त अन्य अन्न घटकांसाठी आधीचा प्रकल्प वाढविण्यासाठी अर्थसाहाय्य केले जाणार आहे, अशी माहिती कृषी विभागाने दिली.

कोणाला घेता येणार लाभ?

पीएमएफएमई ही योजना असंघटित, नोंदणीकृत अन्नप्रक्रिया उद्योगांसाठी आहे. धुळे जिल्ह्यात केळी पिकाला प्राधान्य दिले आहे. केळी उत्पादकांना नवीन उद्योग सुरू करता येईल. अन्य उद्योगांसाठी आधीचा उद्योग वाढविण्यासाठी अनुदान मिळणार आहे. व्यक्तिगत शेतकरी, शेतकरी उत्पादक संघ, कंपनी, संस्था, बचत गट, सहकारी उत्पादक, तसेच शासन यंत्रणा किंवा खासगी उद्योग इत्यादी घटकांना लाभ घेता येईल.

तालुकानिहाय उद्दिष्ट असे...

असा करा अर्ज

एमआयएस पोर्टलवर ऑनलाइन अर्ज सादर करावा.

अर्ज करण्यासाठी कृषी विभागातर्फे सर्वतोपरी सहकार्य केले जाते.

यासाठी प्रत्येक तालुक्यात संसाधन व्यक्तींची नियुक्ती करण्यात आली आहे.

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयासह सर्व तालुका कृषी अधिकारी आणि गावपातळीवर कृषी सहायकांशी संपर्क साधल्यावर सहकार्य केले जाते.