शहरं
Join us  
Trending Stories
1
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
2
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
3
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
4
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
5
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
6
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
7
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
8
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
9
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
10
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
11
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
12
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
13
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
14
जबरदस्त कॅमेरा आणि दमदार बॅटरी, किंमत १० हजारांहून कमी; नव्या 5G फोनची सर्वत्र चर्चा!
15
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
16
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
17
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
18
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
19
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
20
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक

धुळ्यात बॅक आॅफ बडोदा बॅँकेचे कामकाज तीन तास ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2018 21:28 IST

मनपा : थकबाकीदार मालमत्तांची किंमत निश्चित झाल्यावर होणार लिलाव

ठळक मुद्देमनपाने गेल्यावर्षी कर वसुलीसाठी धडक मोहिम राबविली होती़ या मोहिमेत जवळपास १२ निवासी घरे व गाळे सील केले होते़या मालमत्तांचा लिलाव करण्यासाठी प्रशासकीय पातळीवर संबंधित मालमत्तांची निर्धारण किंमत ठरविण्याची प्रक्रिया सुरू आहे. ती पूर्ण झाल्यानंतर या मालमत्तांचा लिलाव होईल, अशी माहिती उपायुक्त कदम यांनी दिली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : मनपा प्रशासनाने थकीत मालमत्ताधारकांकडून वसुलीसाठी पथकांची नियुक्ती करून धडक मोहीम सुरू केली आहे. गल्ली क्रमांक ५ येथील बॅँक आॅफ बडोदाच्या इमारतीची थकबाकी वसुलीसाठी मनपाच्या पथकाने शुक्रवारी सकाळी बॅँकेला सील लावले. या कारवाईनंतर संबंधित इमारतीच्या मालकाने थकबाकीची पूर्ण रक्कम प्रशासनाकडे जमा केली. त्यानंतर हे सील काढण्यात आले. बॅँकेला सील लावल्यामुळे तब्बल तीन तास बॅँकेचा व्यवहार ठप्प होता. त्याचा फटका ग्राहकांना सहन करावा लागला. थकबाकी वसुलीसाठी मनपाची यंत्रणा कंबर कसून कामाला लागली आहे. मनुष्यबळाचा अभाव असल्यामुळे मनपा आयुक्तांच्या आदेशानुसार मालमत्ताधारकांकडून वसुली करण्यासाठी तयार केलेल्या पथकात कर्मचाºयांसोबत अधिकाºयांचाही समावेश करण्यात आली आहे. शुक्रवारी सकाळी साडे नऊ वाजता उपायुक्त अभिजीत कदम यांच्या नेतृत्वाखाली पथकाने गल्ली क्रमांक ५ मधील बॅँक आॅफ बडोदाची शाखा  सील केली. ही बॅँक भाड्याच्या खोलीत सुरू आहे. बॅँक सील केल्यामुळे ग्राहक बॅँकेच्या बाहेर ताटकळत होते. याबाबत बॅँक इमारतीचे मालक ज्योती किशोर रिजवानी यांना माहिती देण्यात आली. त्यांनी  दुपारी साडे बारा वाजता त्यांच्याकडे असलेली आठ लाखाची थकीत रक्कम जमा केल्यानंतर बॅँकेचे सील काढण्यात आले. त्यानंतर बॅँकेत व्यवहार सुरळीत सुरू झाले. पुढे मनपाच्या एका पथकाने रेल्वे स्टेशनरोडवरील एका गॅरेजरचे दुकान सील केले. संबंधिताकडे १  लाख ४६ हजार ८३९ रुपये थकले आहे. संबंधित गॅरेज चालकाचे नाव सुरेश राजाराम जडे आहे. तसेच वैभव नगरात  शैलेश मदाने यांच्याकडून १ लाख ७१ हजार ३४३ रुपये पथकाने वसूल केले. यावेळी  वसुली प्रमुख शिरीष जाधव, बळवंत रनाळकर, राजेंद्र ओगले आदी उपस्थित होते. वसुलीसाठी शास्ती माफी अभय योजना धुळे मनपा बाजार विभागाने मनपा हद्दीतील दुकाने, गाळे, आटे व जागा भाडे रक्कमेच्या बिलातील शास्ती रक्कमेसाठी अभय योजना लागू केली आहे. त्यात ८ फेब्रुवारी ते ९ मार्च २०१८ पर्यंत भरणा केल्यास शास्ती रक्कमेत ५० टक्के सवलत देण्यात येईल. तसेच १० मार्च ते २३ मार्चच्या आत भरणा केल्यास २५ टक्के सवलत जाहीर करण्यात येईल, अशी माहिती मनपा प्रशासनातर्फे देण्यात आली आहे.