शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

धुळ्यात बॅक आॅफ बडोदा बॅँकेचे कामकाज तीन तास ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2018 21:28 IST

मनपा : थकबाकीदार मालमत्तांची किंमत निश्चित झाल्यावर होणार लिलाव

ठळक मुद्देमनपाने गेल्यावर्षी कर वसुलीसाठी धडक मोहिम राबविली होती़ या मोहिमेत जवळपास १२ निवासी घरे व गाळे सील केले होते़या मालमत्तांचा लिलाव करण्यासाठी प्रशासकीय पातळीवर संबंधित मालमत्तांची निर्धारण किंमत ठरविण्याची प्रक्रिया सुरू आहे. ती पूर्ण झाल्यानंतर या मालमत्तांचा लिलाव होईल, अशी माहिती उपायुक्त कदम यांनी दिली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : मनपा प्रशासनाने थकीत मालमत्ताधारकांकडून वसुलीसाठी पथकांची नियुक्ती करून धडक मोहीम सुरू केली आहे. गल्ली क्रमांक ५ येथील बॅँक आॅफ बडोदाच्या इमारतीची थकबाकी वसुलीसाठी मनपाच्या पथकाने शुक्रवारी सकाळी बॅँकेला सील लावले. या कारवाईनंतर संबंधित इमारतीच्या मालकाने थकबाकीची पूर्ण रक्कम प्रशासनाकडे जमा केली. त्यानंतर हे सील काढण्यात आले. बॅँकेला सील लावल्यामुळे तब्बल तीन तास बॅँकेचा व्यवहार ठप्प होता. त्याचा फटका ग्राहकांना सहन करावा लागला. थकबाकी वसुलीसाठी मनपाची यंत्रणा कंबर कसून कामाला लागली आहे. मनुष्यबळाचा अभाव असल्यामुळे मनपा आयुक्तांच्या आदेशानुसार मालमत्ताधारकांकडून वसुली करण्यासाठी तयार केलेल्या पथकात कर्मचाºयांसोबत अधिकाºयांचाही समावेश करण्यात आली आहे. शुक्रवारी सकाळी साडे नऊ वाजता उपायुक्त अभिजीत कदम यांच्या नेतृत्वाखाली पथकाने गल्ली क्रमांक ५ मधील बॅँक आॅफ बडोदाची शाखा  सील केली. ही बॅँक भाड्याच्या खोलीत सुरू आहे. बॅँक सील केल्यामुळे ग्राहक बॅँकेच्या बाहेर ताटकळत होते. याबाबत बॅँक इमारतीचे मालक ज्योती किशोर रिजवानी यांना माहिती देण्यात आली. त्यांनी  दुपारी साडे बारा वाजता त्यांच्याकडे असलेली आठ लाखाची थकीत रक्कम जमा केल्यानंतर बॅँकेचे सील काढण्यात आले. त्यानंतर बॅँकेत व्यवहार सुरळीत सुरू झाले. पुढे मनपाच्या एका पथकाने रेल्वे स्टेशनरोडवरील एका गॅरेजरचे दुकान सील केले. संबंधिताकडे १  लाख ४६ हजार ८३९ रुपये थकले आहे. संबंधित गॅरेज चालकाचे नाव सुरेश राजाराम जडे आहे. तसेच वैभव नगरात  शैलेश मदाने यांच्याकडून १ लाख ७१ हजार ३४३ रुपये पथकाने वसूल केले. यावेळी  वसुली प्रमुख शिरीष जाधव, बळवंत रनाळकर, राजेंद्र ओगले आदी उपस्थित होते. वसुलीसाठी शास्ती माफी अभय योजना धुळे मनपा बाजार विभागाने मनपा हद्दीतील दुकाने, गाळे, आटे व जागा भाडे रक्कमेच्या बिलातील शास्ती रक्कमेसाठी अभय योजना लागू केली आहे. त्यात ८ फेब्रुवारी ते ९ मार्च २०१८ पर्यंत भरणा केल्यास शास्ती रक्कमेत ५० टक्के सवलत देण्यात येईल. तसेच १० मार्च ते २३ मार्चच्या आत भरणा केल्यास २५ टक्के सवलत जाहीर करण्यात येईल, अशी माहिती मनपा प्रशासनातर्फे देण्यात आली आहे.