शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar Naresh Arora: नरेश अरोरा यांच्या कार्यालयात क्राइम ब्रँचचे अधिकारी; अजित पवार म्हणाले, "तथ्यांच्या आधारेच..."
2
'मदत येत आहे, संस्था ताब्यात घ्या...'; इराणशी चर्चा रद्द करून ट्रम्प यांनी निदर्शनांना भडकावले
3
भाजपा मुख्यालयात BJP नेते आणि चीनच्या CPC शिष्टमंडळाची बैठक; काँग्रेसचा खळबळजनक दावा
4
ZP Election in Maharashtra 2026: ९ लाख ते ६ लाख, झेडपी निवडणुकीत कोणत्या उमेदवाराला किती खर्च करता येणार?
5
कतारमधील अमेरिकन हवाई तळावर हालचाली वाढल्या! डोनाल्ड ट्रम्प इराणविरुद्ध कारवाई करण्याच्या तयारीत?
6
इराणमध्ये अराजकता! २००० हून अधिक लोकांचा मृत्यू, सरकारने पहिल्यांदाच सत्य केले मान्य
7
थंडीची लाट! हृदय आणि फुफ्फुसांवर परिणाम, एम्सच्या डॉक्टरांनी दिला सतर्कतेचा इशारा
8
अजित पवारांच्या राजकीय सल्लागारावर पोलीस कारवाई; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी पुण्यात मोठी घडामोड
9
Maharashtra ZP Election 2026 Date: मोठी बातमी! राज्यातील १२ जिल्हा परिषदा, १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकीची घोषणा, ५ फेब्रुवारीला मतदान
10
पुन्हा निवडणूक! महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यातील किती पंचायत समित्यांसाठी रंगणार 'रणसंग्राम'?
11
महापालिका निवडणुकीत नेत्यांची प्रतिष्ठा लागणार पणाला! भाजप विरुद्ध काँग्रेस, शिंदेसेना, उद्धवसेना, एमआयएम
12
'निवडणूक आयोग BJP च्या AI टूल्सचा वापर करतोय', SIR वर ममता बॅनर्जींचा संताप
13
Viral Video: लेकीच्या मॉइश्चरायझरची किंमत ऐकून वडिलांची उडाली झोप, व्हिडीओ शेवटपर्यंत पाहा!
14
अबब! फक्त ४ जणांच्या टीमला Open AI नं ९०० कोटींना खरेदी केले; आता ChatGPT देणार हेल्थ रिपोर्ट
15
राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचं एकत्रिकरण होणार का? प्रचार संपत असताना अजित पवारांचं मोठं विधान
16
चांदीपासून सावधान...! येणार मोठी घसरण...? रॉबर्ट कियोसाकी यांचा मोठा इशारा
17
केरळ राज्याचे नाव बदलले जाणार? राजीव चंद्रशेखर यांचे पीएम मोदी व सीएम पिनराई विजयन यांना पत्र
18
अबू सालेम मोठा गुन्हेगार, फक्त २ दिवसांचा पॅरोल शक्य; राज्य सरकारची कोर्टात स्पष्ट भूमिका
19
‘...ती एक मनपा वगळता २९ पैकी २८ महानगरपालिका महायुती जिंकणार’, चंद्रकांत पाटील यांचा मोठा दावा 
20
सामान्यांचे घराचे स्वप्न स्वस्त होणार? अर्थसंकल्पात रिअल इस्टेट क्षेत्राचे सरकारकडे साकडे!
Daily Top 2Weekly Top 5

वर्तमानात रचनात्मक कार्यासाठी प्रयत्नशील असावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2020 22:51 IST

‘विद्यावर्धिनी’मध्ये व्यक्तीमत्व विकास कार्यशाळा : उपप्राचार्य डॉ. विलास चव्हाण यांचे प्रतिपादन

धुळे : भूतकाळात रमल्याने रचनात्मक कार्य सिद्धी करणे शक्य नाही. तेव्हा वर्तमानात वेळेचे समायोजन करून योग्य दिशेने मार्गक्रमण करणे अत्यंत निकडीचे असल्याचे मत पालेशा वाणिज्य महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.डॉ. विलास चव्हाण यांनी येथे व्यक्त केले.कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्टÑ विद्यापीठ जळगाव व विद्यावर्धिनी सभेचे कला, वाणिज्य विज्ञान महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘व्यक्तीमत्व विकास कार्यशाळे’च्या उदघटनाप्रसंगी ते बोलत होते.व्यासपीठावर उमवि व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्रा.डॉ. मोहन पावरा होते. अध्यक्षस्थानी विद्यावर्धिनी सभेच्या गव्हर्निंग कौन्सिलचे सदस्य अनिल दामोदर होते.स्वव्यक्तीमत्वाची ओळख करून या विकासाला चालना देण्यासाठी महाविद्यालयीन जीवन हीच योग्य वेळ असल्याचे सांगून प्रा.डॉ. चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना आंतरबाह्य बदल करण्यासाठी स्वत:मधील गुणवत्ता शोधून ती जोपासण्यासाठी सतत प्रयत्नशील राहण्याचे सांगितले. तसेच वैगुण्यावर मात करून व्यक्तीमत्वाचा विकास करण्याचे आवाहन केले.जन्माला येणारा प्रत्येक जीव हा एक व्यक्तीमत्व असतो. हे व्यक्तीमत्व विकसनशील स्वरूपाचे असते. याचा विकास करणे आपल्या हाती असल्याचे प्रा.डॉ. मोहन पावरा यांनी सांगितले. तर उपलब्ध संधीचा योग्य तो लाभ घेतला तर व्यक्तीमत्व विकास सहज साध्य होतो असे अनिल दामोदर यांनी सांगितले.प्र. सतिष निकम यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन प्रा. विजय पालवे यांनी तर आभार डॉ. अभिषेक गायकवाड यांनी मानले.कार्यशाळेला प्राचार्या डॉ. शुभदा रावळ -ठाकरे, प्रा.बी.डी.गणपाटील, विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. पी.ओ. व्यास उपस्थित होते.

टॅग्स :Dhuleधुळे