शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
2
महाराष्ट्रात ७९ ठिकाणी शेतकरी भवन उभारणार; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ८ महत्त्वाचे निर्णय
3
भारत आणि चीनचं टेन्शन वाढवणार युरोपियन युनियन! अमेरिकेच्या समोर झुकलं का EU?
4
निष्पाप लेकरावर दयाही आली नाही! ७ वर्षांच्या मुलीला तिसऱ्या मजल्यावरून फेकलं, सावत्र आईचा गुन्हा 'असा' झाला उघड
5
6G क्षेत्रात भारताची मोठी झेप, IIT हैदराबादने विकसित केले प्रोटोटाइप; 2030 पर्यंत लॉन्च होणार
6
दही, दूध, लोणी घागर भरूनी...! सर्व स्वस्त झाले, या मोठ्या डेअरीने GST कपातीपूर्वीच घोषणा केली
7
ITR भरण्यासाठी उरले शेवटचे काही तास! आयकर विभागाकडून करदात्यांसाठी ६ टिप्स
8
Pitru Paksha 2025: काही लोक जिवंतपणी स्वत:चे श्राद्ध करवून घेतात; पण का आणि कुठे? वाचा!
9
बाबांसाठी घड्याळ, आईला कानातले पण ते...; अधिकाऱ्याच्या लेकाची काळजात चर्र करणारी गोष्ट
10
'भारत तर टॅरिफचा महाराजा, त्यांच्यामुळे अमेरिकेच्या कामगारांचे...'; डोनाल्ड ट्रम्प यांच्या सल्लागाराचा आरोप
11
भारतीय नवराच हवा! न्यूयॉर्कमधील प्रसिद्ध टाइम्स स्क्वेअरवर फलक घेऊन उभी राहिली तरुणी
12
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये मसूद अझहरच्या कुटुंबाचे काय झाले? जैश कमांडर म्हणाला, 'तुकडे- तुकडे...'
13
अंजली दमानियांच्या पतीची राज्य सरकारची थिंक टँक असलेल्या 'मित्रा' संस्थेच्या सल्लागारपदी नियुक्ती
14
टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुपरफास्ट ३००० धावा; विराट दुसऱ्या क्रमांकावर, पहिला कोण?
15
आता उत्तर कोरियात 'आईस्क्रीम' शब्द बोलण्यास बंदी; हुकूमशाह किम जोंग उननं काढलं फर्मान, कारण...
16
जबरदस्त दणका! आयसीसीने मॅच रेफरीला काढण्याची मागणी फेटाळली; पाकिस्तान संघ आशिया कपमधून बाहेर पडणार?
17
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून जाताय? आज तातडीचा विशेष ब्लॉक, एक तासासाठी वाहतूक राहणार बंद 
18
फक्त ३ वर्षात १०,००० रुपयांच्या SIP ने खरेदी करू शकता ड्रीम कार; गुंतवणुकीचा फॉर्म्युला ठरतोय हीट
19
जगातील सर्वात ‘पॉवरफुल’ व्यक्तीचे बंगळुरुमध्ये नवे ऑफिस; भाडे 400 कोटींपेक्षा जास्त..!
20
'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये आर्यन खानच्या दिग्दर्शनाखाली केलं काम, बॉबी देओलने सांगितला अनुभव

जिल्ह्यात स्वच्छ भारत मिशन अंतर्गत प्रत्येक गावात स्वच्छाग्रहीची नियुक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:30 IST

नियमित मास्कचा वापर, शारीरिक अंतर पाळणे, वेळोवेळी हात धुणे या शासन निर्देशांचे रूपांतर ग्रामस्थांच्या सवयींत होऊ लागल्याचे आशादायी चित्र ...

नियमित मास्कचा वापर, शारीरिक अंतर पाळणे, वेळोवेळी हात धुणे या शासन निर्देशांचे रूपांतर ग्रामस्थांच्या सवयींत होऊ लागल्याचे आशादायी चित्र आहे. जिल्हाधिकारी श्री. संजय यादव, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वानमथी सी., अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. संदीप माळोदे, पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप पवार यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांच्या वर्तन बदलांमध्ये शासकीय यंत्रणा महत्त्वपूर्ण भूमिका निभावत आहे.

जिल्हा परिषदेच्या जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षातर्फे जल जीवन मिशन व स्वच्छ भारत मिशन या दोन मुख्य कार्यक्रमांची अंमलबजावणी केली जाते. प्रामुख्याने या कक्षाकडून वर्तणूक बदलासंदर्भातील विविध उपक्रम संवाद/ प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. केंद्र व राज्य शासनाच्या विविध अभियान उपक्रमांमध्ये जिल्हा परिषदेचा नेहमीच सक्रिय सहभाग राहिला आहे. स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत गेल्या अनेक वर्षांपासून ग्रामीण भागात प्रत्येक गावात किमान एक स्वयंसेवक स्वच्छाग्रही म्हणून काम करीत आहे. स्वच्छतेचा आग्रह धरणारा असा हा जिल्हा परिषद कर्मचारी व स्वच्छाग्रही म्हणजे गावातील ग्रामीण जनतेसाठी वर्तणूक बदलासाठी विविध संवाद साधणारा व स्वच्छ भारत मिशन मध्ये सक्रिय सहभाग घेणारा महत्वपूर्ण घटक आहे. सध्या सर्वत्र कोरोना आजाराने थैमान घातले आहे. अशा परिस्थितीत समाजाचे आपण काही देणे लागतो या सामाजिक भावनेतून स्वच्छ भारत मिशनमधील हा स्वच्छाग्रही जाणीव-जागृतीच्या उपक्रमांमध्ये सहभागी झाला आहे.

अनेक गावांमध्ये दवंडी देणे, छोट्या लाऊड स्पीकर वरून कोविड १९ आजारांबाबत माहिती देणे, पारंपरिक गीते सादर करून लोकांमध्ये आजाराबाबत शास्त्रीय माहिती पोहोचविणे, सामाजिक अंतराचे पालन करणे, नियमित मास्क वापरणे, वेळोवेळी (दर दोन तासांनी) साबणाने हात धुणे आदी उपक्रम स्वच्छाग्रही राबवित आहे, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून उपलब्ध असलेले साहित्य गावातील घराघरापर्यंत पोचवण्यात स्वच्छाग्रहीचे महत्त्वाची भूमिका राहिली आहे. कोविड १९ आजारासंदर्भात ग्रामीण भागात सुरू असलेली जाणीव जागृती मोहीम आता जोर धरत आहे, तालुका व ग्रामपंचायत स्तरावरील सर्व संबंधितांनी जाणीव जागृतीसाठी सक्रिय सहभाग नोंदवावा, अशा सूचना जिल्हा परिषदेचे पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप पवार यांनी ग्रामीण भागातील काम करणाऱ्या सर्व संबंधितांना दिल्या आहेत. जनतेलाही सहभागी होण्यासाठी व कोरोना महामारी विरोधातील चळवळीत सक्रिय होऊन शासकीय यंत्रणेला संपूर्ण सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.