शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
3
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
4
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
5
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
6
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
7
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
8
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
9
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
10
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
11
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
12
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
13
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
14
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
15
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
16
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
17
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
18
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
19
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
20
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?

किनाऱ्याला गळती लागल्याने के.टी.वेअरला धबधब्याचे स्वरुप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2020 23:04 IST

वडजाई : धबधब्याचा नजारा पाहण्यासाठी नागरिकांची तोबा गर्दी

लोकमत न्यूज नेटवर्कवडजाई : धुळे तालुक्यातील वडजाई गावाजवळील के.टी.वेअर बंधाºयाला किनाºयाने मोठी गळती लागल्यामुळे धबधब्यासारखे स्वरुप आले आहे. ते पाहण्यासाठी नागरिक मोठी गर्दी करीत आहेत. यामुळे हे पर्यटन स्थळच झाले आहे.पिकनिक स्पॉटपरिसरात मुसळधार पाऊस झाल्यामुळे परिसरातील धरण, लहान-मोठे बंधारे ओसंडून वाहत आहेत. त्यात वडजाई गावाजवळ असणारा केटी वेअर बंधारा तुडुंब भरुन वाहत आहे. त्यामुळे बंधाºयाच्या एका कोपºयाला मोठी गळती लागल्यामुळे पाणी मोठ्या प्रमाणात वाहुन जात आहे. हा बंधारा उंच असल्यामुळे हे पडणारे पाणी धबधब्यासारखे पडत आहे. सध्या शाळांना सुट्या आहेत. त्यामुळे हा नजारा पाहण्यासाठी येथे अनेक जण जेवणाचे डबे घेऊन महिला व मुलांसह येत आहेत. येथे यात्रा भरल्यासारखी गर्दी होत असल्याने सध्या हा पिकनिक स्पॉट बनला आहे.मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येथे फिजिकल डिस्टन्सिंगचा पुरता फज्या उडाल्याचे चित्र दिसत आहे. के.टी. वेअरमध्ये मोठा जलसाठा असल्यामुळे या ठिकाणी पोहणारेही मोठ्या प्रमाणात येत आहेत. परंतू बंधाºयात खुप पाणी आहे. काही तरुण या बंधाºयाच्या पाण्यात उड्या मारुन पोहतात. मात्र, बंधारा जीर्ण झाल्यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. लळींग परिसरातील दगडी नाल्यामध्ये दोघे मित्र बुडाल्याची घटना ताजी असताना वडजाई येथे अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे.महिला, लहान मुलांची येथे मोठी गर्दी होत असल्यामुळे दुर्घटना घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पोलिसांनी या गर्दीला त्वरित आवर घालावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.सर्व कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत असतांना एवढा मोठा जमाव जमणे म्हणजे कोरोनाला निमंत्रण दिल्यासारखेच असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.याबाबत मोहाडी पोलिस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरिक्षक संगिता राऊत यांना गावकऱ्यांनी फोन करुन माहिती दिली. त्यांनी दुपारी या स्थळाला भेट दिली. तसेच या परिसरात कोणीही येण्यास बंदी केली आहे, असे सांगून गेल्या. मात्र, चार वाजेनंतर पुन्हा मोठी गर्दी उसळली. यामुळे मोहाडी पोलिसांनी गर्दी होऊ नये, यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.दरम्यान, या गर्दीमुळे येथे वाद वाढण्याची शक्यताही निर्माण झाली आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणावर वाहनाची ये- जा सुरु असल्यामुळे वादही होत आहेत. त्यासाठी पोलिसांनी दिवसभर बंदोबस्त लावावा, अशी मागणी वडजाई ग्रामस्थांनी केली आहे.