शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
4
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
5
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
6
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
7
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
8
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
9
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
10
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
11
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
12
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
13
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
14
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
15
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
16
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
17
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
18
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
19
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
20
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त

ऐन दिवाळीच्या तोंडावर धान्य पुरवठा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2017 16:07 IST

पुरवठा विभागाचे कामकाज ठप्प : प्रलंबित मागण्या निकाली काढण्यासाठी पुकारला संप; जिल्हाधिकारी कार्यालयात निदर्शने

ठळक मुद्देपुरवठा विभागाची अस्थापना स्वतंत्र करू नये...पुरवठा विभागाची आस्थापना स्वतंत्र करू नये. पुरवठा निरीक्षकाची पदे सरळ सेवा भरती करण्यात येऊ नये. महसूल लिपीकाचे पदनाम बदलून साहाय्यक करणेबाबत मान्य केले होते. त्यानुसार शासन निर्णय पारित करणे. नायब तहसीलदार पदाचा ग्रेड पे ४३०० वरून ४८०० करणेबाबत मान्य केले होते. त्यानुसार शासन निर्णय पारित करावा. अव्वल कारकून वर्ग ३ पदाचे वेतन त्रूटी दूर कराव्यात. नायब तहसीलदार सरळसेवा भरती ३३ टक्क्यांवरून २० टक्के करणे. शिपाई संवर्गास तलाठी संवर्गात पदोन्नती देणे. तसेच त्यांच्या पाल्यास शासन सेवेत सामावून घेणे.

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : गेल्या अनेक दिवसांपासून शासनाकडे पाठपुरावा करूनही प्रलंबित मागण्या निकाली निघत नसल्यामुळे संतप्त झालेल्या पुरवठा विभागातील कर्मचाºयांनी ऐन दिवाळीच्या तोंडावर संप पुकारला आहे. परिणामी, मंगळवारी पुरवठा विभागाचे कामकाज ठप्प पडले होते. केवळ संपावरच मर्यादीत न राहता कर्मचाºयांनी धान्य पुरवठाही बंद ठेवल्यामुळे शिधापत्रिकाधारकांना ऐन सणासुदीच्या काळात धान्य मिळण्यास अडचणी येणार आहेत. निदर्शने करीत व्यक्त केला शासनाचा निषेध २०१२ पासून पुरवठा विभागातील कर्मचारी त्यांच्या मागण्या निकाली काढण्यासाठी पाठपुरावा करीत आहे. परंतु, आजतागायत, या विभागातील कर्मचाºयांना केवळ आश्वासने देऊन तोंडाला पाने पुसल्यामुळे आता संतप्त झालेल्या कर्मचाºयांनी संपाचे हत्यार उचलले आहे. या विभागातील कर्मचाºयांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील मुख्य प्रवेशद्वारासमोर उभे राहून शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करीत निषेध व्यक्त केला. यावेळी जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष मन्सूर शेख, रत्नाकर वसईकर, अनिल हिसाळे, जितेंद्रसिंग राजपूत, विशाल मोहिते, सुरेश पाईकराव, विनोद चौधरी, आशा येलमामे, कामिनी महाले, वैशाली बोरसे, महेश पाटील, नीलेश सांगळे आदी उपस्थित होते. धान्य पुरवठा केला बंद जिल्ह्यात एकूण ९८५ स्वस्त रेशन धान्य दुकानदार आहेत. या सर्व दुकानदारांना पुरवठा विभागाच्या कर्मचाºयांनी संपामुळे आजपासून धान्य पुरवठा बंद केल्याची कल्पना दिली आहे.जिल्ह्यात अंत्योदय शिधापत्रिकाधारकांची संख्या ३ लाख ४७ हजार इतकी आहे. तर उर्वरीत प्राधान्य कुटुंबातील शिधापत्रिकाधारकांची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे धान्य पुरवठा बंदमुळे लाभार्थींना धान्य मिळण्यास अडचणी होणार आहे.  जोपर्यंत प्रलंबित मागण्यांचा तोडगा सुटत नाही, तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार असल्याचे जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेतर्फे सांगण्यात आले आहे. १० पासून महसूल विभागाचे काम बंद आंदोलन प्रलंबित मागण्यांचा प्रश्न शासनाने त्वरित प्रश्न सोडविला नाही; तर येत्या १० तारखेपासून महसूल विभागातील कर्मचारी बेमुदत कामबंद आंदोलन करणार आहेत. 

सणासुदीच्या काळात लाभार्थ्यांची गैरसोय होणार नाही, यासाठी जिल्हा पुरवठा विभागातर्फे पर्यायी व्यवस्था करून धान्याचा पुरवठा केला जाईल.     - दत्तात्रय बोरूडे, जिल्हा पुरवठा अधिकारी 

शासनाकडे आमच्या मागण्या निकाली काढण्यासाठी आम्ही अनेक दिवसांपासून पाठपुरावा करीत आहोत. परंतु, केवळ आश्वासने देऊन वेळ काढून नेली जात आहे. त्यापार्श्वभूमीवर आम्ही संप पुकारला आहे. आमच्या मागण्या सुटत नाही, तोपर्यंत संप सुरूच ठेवणार आहोत.     - मन्सूर शेख, जिल्हाध्यक्ष, जिल्हा महसूल कर्मचारी संघटना