शहरं
Join us  
Trending Stories
1
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
2
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
3
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
4
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
5
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
6
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
7
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
8
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
9
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
10
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
11
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
12
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
13
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
14
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
15
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
16
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
17
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
18
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
19
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

ऐन दिवाळीच्या तोंडावर धान्य पुरवठा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2017 16:07 IST

पुरवठा विभागाचे कामकाज ठप्प : प्रलंबित मागण्या निकाली काढण्यासाठी पुकारला संप; जिल्हाधिकारी कार्यालयात निदर्शने

ठळक मुद्देपुरवठा विभागाची अस्थापना स्वतंत्र करू नये...पुरवठा विभागाची आस्थापना स्वतंत्र करू नये. पुरवठा निरीक्षकाची पदे सरळ सेवा भरती करण्यात येऊ नये. महसूल लिपीकाचे पदनाम बदलून साहाय्यक करणेबाबत मान्य केले होते. त्यानुसार शासन निर्णय पारित करणे. नायब तहसीलदार पदाचा ग्रेड पे ४३०० वरून ४८०० करणेबाबत मान्य केले होते. त्यानुसार शासन निर्णय पारित करावा. अव्वल कारकून वर्ग ३ पदाचे वेतन त्रूटी दूर कराव्यात. नायब तहसीलदार सरळसेवा भरती ३३ टक्क्यांवरून २० टक्के करणे. शिपाई संवर्गास तलाठी संवर्गात पदोन्नती देणे. तसेच त्यांच्या पाल्यास शासन सेवेत सामावून घेणे.

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : गेल्या अनेक दिवसांपासून शासनाकडे पाठपुरावा करूनही प्रलंबित मागण्या निकाली निघत नसल्यामुळे संतप्त झालेल्या पुरवठा विभागातील कर्मचाºयांनी ऐन दिवाळीच्या तोंडावर संप पुकारला आहे. परिणामी, मंगळवारी पुरवठा विभागाचे कामकाज ठप्प पडले होते. केवळ संपावरच मर्यादीत न राहता कर्मचाºयांनी धान्य पुरवठाही बंद ठेवल्यामुळे शिधापत्रिकाधारकांना ऐन सणासुदीच्या काळात धान्य मिळण्यास अडचणी येणार आहेत. निदर्शने करीत व्यक्त केला शासनाचा निषेध २०१२ पासून पुरवठा विभागातील कर्मचारी त्यांच्या मागण्या निकाली काढण्यासाठी पाठपुरावा करीत आहे. परंतु, आजतागायत, या विभागातील कर्मचाºयांना केवळ आश्वासने देऊन तोंडाला पाने पुसल्यामुळे आता संतप्त झालेल्या कर्मचाºयांनी संपाचे हत्यार उचलले आहे. या विभागातील कर्मचाºयांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील मुख्य प्रवेशद्वारासमोर उभे राहून शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करीत निषेध व्यक्त केला. यावेळी जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष मन्सूर शेख, रत्नाकर वसईकर, अनिल हिसाळे, जितेंद्रसिंग राजपूत, विशाल मोहिते, सुरेश पाईकराव, विनोद चौधरी, आशा येलमामे, कामिनी महाले, वैशाली बोरसे, महेश पाटील, नीलेश सांगळे आदी उपस्थित होते. धान्य पुरवठा केला बंद जिल्ह्यात एकूण ९८५ स्वस्त रेशन धान्य दुकानदार आहेत. या सर्व दुकानदारांना पुरवठा विभागाच्या कर्मचाºयांनी संपामुळे आजपासून धान्य पुरवठा बंद केल्याची कल्पना दिली आहे.जिल्ह्यात अंत्योदय शिधापत्रिकाधारकांची संख्या ३ लाख ४७ हजार इतकी आहे. तर उर्वरीत प्राधान्य कुटुंबातील शिधापत्रिकाधारकांची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे धान्य पुरवठा बंदमुळे लाभार्थींना धान्य मिळण्यास अडचणी होणार आहे.  जोपर्यंत प्रलंबित मागण्यांचा तोडगा सुटत नाही, तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार असल्याचे जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेतर्फे सांगण्यात आले आहे. १० पासून महसूल विभागाचे काम बंद आंदोलन प्रलंबित मागण्यांचा प्रश्न शासनाने त्वरित प्रश्न सोडविला नाही; तर येत्या १० तारखेपासून महसूल विभागातील कर्मचारी बेमुदत कामबंद आंदोलन करणार आहेत. 

सणासुदीच्या काळात लाभार्थ्यांची गैरसोय होणार नाही, यासाठी जिल्हा पुरवठा विभागातर्फे पर्यायी व्यवस्था करून धान्याचा पुरवठा केला जाईल.     - दत्तात्रय बोरूडे, जिल्हा पुरवठा अधिकारी 

शासनाकडे आमच्या मागण्या निकाली काढण्यासाठी आम्ही अनेक दिवसांपासून पाठपुरावा करीत आहोत. परंतु, केवळ आश्वासने देऊन वेळ काढून नेली जात आहे. त्यापार्श्वभूमीवर आम्ही संप पुकारला आहे. आमच्या मागण्या सुटत नाही, तोपर्यंत संप सुरूच ठेवणार आहोत.     - मन्सूर शेख, जिल्हाध्यक्ष, जिल्हा महसूल कर्मचारी संघटना