शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

शिरपूर तालुक्यात अमरिशभाई पटेल यांचे वर्चस्व कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:35 IST

शिरपूर तालुक्यात झालेल्या ३४ ग्रामपंचायतींच्या निकालात अमरिशभाई पटेल यांचा करिष्मा यंदाही कायम चालला़ आमदार अमरिशभाई पटेल हे तब्बल ३५ ...

शिरपूर तालुक्यात झालेल्या ३४ ग्रामपंचायतींच्या निकालात अमरिशभाई पटेल यांचा करिष्मा यंदाही कायम चालला़ आमदार अमरिशभाई पटेल हे तब्बल ३५ वर्षापासून काँग्रेस पक्षाचे एकनिष्ठ नेते होते़ तालुकासह त्यांचे जिल्ह्यावर वर्चस्व होते़ जे राज्यात नाही ते-ते या तालुक्यात आणण्याचा त्यांचा प्रयत्न असतो़ त्यामुळेच देशासह अन्य राज्यातील मंत्री, लोकप्रतिनिधींनीही त्यांच्या विकास कामांना भेट देऊन माहिती जाणून घेतली आहे़ तसाच प्रयोग अन्य काही लोकप्रतिनिधींनी आपापल्या मतदार संघात करण्याचा प्रयत्न केला आहे़ जलसंधारणाचा शिरपूर पॅटर्न असो की, भुयारी गटारी, घर तेथे काँक्रीट रस्ता-वीज-पाणी, २४ तास निर्जंतूक पिण्याचा प्र्रकल्प असो की एज्युकेशन हब असो त्यात पटेल बंधूंनी कर्मभूमीकरिता तन-मन-धनाने अत्याधुनिक अशी कामे केली आहेत़

नवनवीन कल्पना साकारण्याचे व शहराला देशात अग्रस्थान मिळवून देण्याच्या कामी जाणीवपूर्वक प्रयत्न पटेल बंधू करीत असल्याने त्या प्रयत्नांची फलश्रुती म्हणजे शिरपूर खूपच बदलले आहे. बदल हा चालूच आहे. विकासाचे कार्य त्यांचे अव्याहत सुरू आहे़ त्यामुळे धुळे जिल्ह्यातच नव्हे तर खानदेशात इतक्या झपाट्याने बदललेले शिरपूर हे एकमेव शहर असावे.

आजपर्यंत शिरपूर हे ‘एज्युकेशन हब’ होते ते आता ‘मेडिकल हब’ म्हणूनही ओळखले जाईल अशी समाधानाची चर्चा जनतेत आहे़ पुणे-मुंबई येथे ज्या दर्जाची आरोग्य सुविधा मिळते तीच आता शिरपुरात लवकरच मिळणार आहे़ अपूर्ण सोयीसुविधांमुळे परिसरातील रुग्णांना नाशिक-पुणे-मुंबई जावे लागत होते़ यात बहुमूल्य वेळ व पैसा खर्च होत होता़ पण आता या हॉस्पिटलमुळे परिसरातील रुग्णांचे प्राण व अतिरिक्त पैसा वाचणार आहे़ पटेल बंधू नेहमीच सार्वजनिक हिताचा विचार करतात, हेच त्यातून दिसून येते़ यापुढील काळात स्मार्ट सिटी योजनेचा पुढील टप्पा म्हणून स्मार्ट आरोग्य ही संकल्पना शिरपूर जगाला देणार आहे़

गतवर्षी आमदार अमरिशभाई पटेल यांनी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकत पूर्वाश्रमीच्या भाजपात दाखल झाले़ तालुक्यातील ग्रामस्थांनी देखील अमरिशभाई ज्या पक्षात जातील त्या पक्षात असतील असे समीकरण असल्यामुळे या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा सफाया झालेला दिसतो, त्याऐवजी आता भाजपाचा झेंडा रोवलेला दिसत आहे़ त्यामुळे आज तालुक्यात काँग्रेस पक्षाचे अस्तित्व कुठेच दिसत नाही़ अमरिशभाईमुळे भाजपाला एक प्रकारे नवसंजीवनी मिळाली आहे़ यापूर्वी भाजपाला बोटावर मोजण्याएवढ्याच ग्रामपंचायतींवर सत्ता मिळत होती़ भाईंमुळेच भाजपाला अधिक शक्ती मिळाली आहे़

तसेच काँग्रेस पक्षापेक्षा या तालुक्यात काही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अस्तित्व दिसते़ या निवडणुकीत बोटावर मोजण्या एवढ्या का असेना त्यांना संधी मिळाली आहे़ राष्ट्रवादीचे प्रमुख डॉ़. जितेंद्र ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीने देखील पाय रोवलेला दिसत आहे़