शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

अमरावती मध्यम प्रकल्प ‘ओव्हरफ्लो’ वाया जाणाऱ्या पाण्यातून ‘पिक’ नष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2020 19:40 IST

मालपूर शिवार । हातात आलेल्या पिकांचे नुकसान होत असल्याने बळीराजाच्या डोळ्यात पाणी

लोकमत न्यूज नेटवर्कमालपूर : शिंदखेडा तालुक्यातील मालपूर येथील अमरावती मध्यम प्रकल्प ओव्हरफ्लो झाला असुन सध्या नाई व अमरावती नद्यांच्या पाण्याचा ओघ सुरुच असल्यामुळे हे वाया जाणारे पाणी अमरावती नदी पात्रात सोडण्यापेक्षा या प्रकल्पाच्या डाव्या व उजव्या कालव्यात ५० क्यसेक्सने सोडण्यात आले आहे. हे कालवे नादुरुस्त असुन अनेक ठिकाणी गळती दिसुन येते आहे. त्यांच्या मधोमध प्रचंड प्रमाणात डोक्यापार कसाड असुन पाणी कालव्याला लागुन असलेल्या शेतशिवारात झिरपून तेथील शेतकºयाचे पिक या पाण्यामुळे धोक्यात आले आहे.या शेतकऱ्यांनी अनेकदा लेखी तक्रार करुन त्यांची कोणी दखल घेत नसल्यामुळे आता तर हातातोंडाशी आलेला घासावर यामुळे पाणी फिरले आहे़ उभ्या पिकात गुडघाभर पाणी सध्या दिसुन येत आहे.अमरावती मध्यम प्रकल्पाला ७़५० किलोमीटर लांबीचा डावा व सात किलोमीटर उजवा तसेच सात किलोमीटर वाढीव उजवा कामपूर विखरण मेथी तलाव भरण्यासाठी असा एकुण १४ किलोमीटर लांबीचा हा कालवा आहे. सन १९८७ मध्ये रोजगार हमी योजनेंतर्गत या कालव्याच्या कामाला सुरुवात झाली होती़ मात्र, या कालव्याचे दर्जेदार काम झालेच नाही. अनेक ठिकाणी या कालव्यांना गळती लागली आहे. तसेच धरणाजवळ पाटचारीच्या मुख्य गेट जवळ मोठ्या प्रमाणात या कालव्यांना पाझर फुटतो़ यामुळे तेथील शेती ही कसण्या योग्य रहात नाही.नेहमीच ओलावा रहातो. कालव्यांना पाणी सोडल्यावर येथे गुडघाभर पाणी कायम दिसुन येते. यामुळे आता चांगली वाढीस लागलेली व हातातोंडाशी आलेला घास डोळ्यासमोर पाण्यात बुडला असल्यामुळे येथील शेतकºयांच्या डोळ्यात पाणी उभे राहिले आहे. मात्र, याकडे पाटबंधारे विभाग कानाडोळा करतांना दिसुन येत आहे.