शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

अमरावती मध्यम प्रकल्प ‘ओव्हरफ्लो’ वाया जाणाऱ्या पाण्यातून ‘पिक’ नष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2020 19:40 IST

मालपूर शिवार । हातात आलेल्या पिकांचे नुकसान होत असल्याने बळीराजाच्या डोळ्यात पाणी

लोकमत न्यूज नेटवर्कमालपूर : शिंदखेडा तालुक्यातील मालपूर येथील अमरावती मध्यम प्रकल्प ओव्हरफ्लो झाला असुन सध्या नाई व अमरावती नद्यांच्या पाण्याचा ओघ सुरुच असल्यामुळे हे वाया जाणारे पाणी अमरावती नदी पात्रात सोडण्यापेक्षा या प्रकल्पाच्या डाव्या व उजव्या कालव्यात ५० क्यसेक्सने सोडण्यात आले आहे. हे कालवे नादुरुस्त असुन अनेक ठिकाणी गळती दिसुन येते आहे. त्यांच्या मधोमध प्रचंड प्रमाणात डोक्यापार कसाड असुन पाणी कालव्याला लागुन असलेल्या शेतशिवारात झिरपून तेथील शेतकºयाचे पिक या पाण्यामुळे धोक्यात आले आहे.या शेतकऱ्यांनी अनेकदा लेखी तक्रार करुन त्यांची कोणी दखल घेत नसल्यामुळे आता तर हातातोंडाशी आलेला घासावर यामुळे पाणी फिरले आहे़ उभ्या पिकात गुडघाभर पाणी सध्या दिसुन येत आहे.अमरावती मध्यम प्रकल्पाला ७़५० किलोमीटर लांबीचा डावा व सात किलोमीटर उजवा तसेच सात किलोमीटर वाढीव उजवा कामपूर विखरण मेथी तलाव भरण्यासाठी असा एकुण १४ किलोमीटर लांबीचा हा कालवा आहे. सन १९८७ मध्ये रोजगार हमी योजनेंतर्गत या कालव्याच्या कामाला सुरुवात झाली होती़ मात्र, या कालव्याचे दर्जेदार काम झालेच नाही. अनेक ठिकाणी या कालव्यांना गळती लागली आहे. तसेच धरणाजवळ पाटचारीच्या मुख्य गेट जवळ मोठ्या प्रमाणात या कालव्यांना पाझर फुटतो़ यामुळे तेथील शेती ही कसण्या योग्य रहात नाही.नेहमीच ओलावा रहातो. कालव्यांना पाणी सोडल्यावर येथे गुडघाभर पाणी कायम दिसुन येते. यामुळे आता चांगली वाढीस लागलेली व हातातोंडाशी आलेला घास डोळ्यासमोर पाण्यात बुडला असल्यामुळे येथील शेतकºयांच्या डोळ्यात पाणी उभे राहिले आहे. मात्र, याकडे पाटबंधारे विभाग कानाडोळा करतांना दिसुन येत आहे.