शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
4
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
5
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
6
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
7
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
8
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
9
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
10
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
11
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
12
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
13
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
14
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
15
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
17
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
18
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
19
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
20
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले

अमरावती मध्यम प्रकल्प ‘ओव्हरफ्लो’ वाया जाणाऱ्या पाण्यातून ‘पिक’ नष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2020 19:40 IST

मालपूर शिवार । हातात आलेल्या पिकांचे नुकसान होत असल्याने बळीराजाच्या डोळ्यात पाणी

लोकमत न्यूज नेटवर्कमालपूर : शिंदखेडा तालुक्यातील मालपूर येथील अमरावती मध्यम प्रकल्प ओव्हरफ्लो झाला असुन सध्या नाई व अमरावती नद्यांच्या पाण्याचा ओघ सुरुच असल्यामुळे हे वाया जाणारे पाणी अमरावती नदी पात्रात सोडण्यापेक्षा या प्रकल्पाच्या डाव्या व उजव्या कालव्यात ५० क्यसेक्सने सोडण्यात आले आहे. हे कालवे नादुरुस्त असुन अनेक ठिकाणी गळती दिसुन येते आहे. त्यांच्या मधोमध प्रचंड प्रमाणात डोक्यापार कसाड असुन पाणी कालव्याला लागुन असलेल्या शेतशिवारात झिरपून तेथील शेतकºयाचे पिक या पाण्यामुळे धोक्यात आले आहे.या शेतकऱ्यांनी अनेकदा लेखी तक्रार करुन त्यांची कोणी दखल घेत नसल्यामुळे आता तर हातातोंडाशी आलेला घासावर यामुळे पाणी फिरले आहे़ उभ्या पिकात गुडघाभर पाणी सध्या दिसुन येत आहे.अमरावती मध्यम प्रकल्पाला ७़५० किलोमीटर लांबीचा डावा व सात किलोमीटर उजवा तसेच सात किलोमीटर वाढीव उजवा कामपूर विखरण मेथी तलाव भरण्यासाठी असा एकुण १४ किलोमीटर लांबीचा हा कालवा आहे. सन १९८७ मध्ये रोजगार हमी योजनेंतर्गत या कालव्याच्या कामाला सुरुवात झाली होती़ मात्र, या कालव्याचे दर्जेदार काम झालेच नाही. अनेक ठिकाणी या कालव्यांना गळती लागली आहे. तसेच धरणाजवळ पाटचारीच्या मुख्य गेट जवळ मोठ्या प्रमाणात या कालव्यांना पाझर फुटतो़ यामुळे तेथील शेती ही कसण्या योग्य रहात नाही.नेहमीच ओलावा रहातो. कालव्यांना पाणी सोडल्यावर येथे गुडघाभर पाणी कायम दिसुन येते. यामुळे आता चांगली वाढीस लागलेली व हातातोंडाशी आलेला घास डोळ्यासमोर पाण्यात बुडला असल्यामुळे येथील शेतकºयांच्या डोळ्यात पाणी उभे राहिले आहे. मात्र, याकडे पाटबंधारे विभाग कानाडोळा करतांना दिसुन येत आहे.