शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

तेलगी प्रकरणात माझ्यावरील आरोप खोटे, हे भाजप नेत्यांना मान्य- आमदार अनिल गोटे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2018 13:56 IST

केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांच्या आरोपांना पत्रकार परिषदेत उत्तर

ठळक मुद्दे- तेलगी प्रकरणातील आरोप खोटे होते- पक्षात गुंडांना मिळालेला प्रवेश दुर्देवी- संरक्षण राज्यमंत्र्यांनी माझ्याविरोधात उमेदवारी करावी

आॅनलाइन लोकमतधुळे :  तेलगी प्रकरणात माझ्यावर झालेले आरोप खोटे आहेत, असे स्वत: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, स्व़ गोपीनाथ मुंडे यांनी सांगितले़ त्यांना म्हणून मला भाजपने विधानसभेची उमेदवारी दिली, असे प्रत्युत्तर आमदार अनिल गोटे यांनी डॉ़ सुभाष भामरे यांच्या आरोपांना दिले़     संरक्षण राज्यमंत्री डॉ़ सुभाष भामरे यांनी पत्रकार परिषद घेऊन आमदार अनिल गोटेंवर टिका केली़ या टिकेला उत्तर देण्यासाठी आमदार अनिल गोटे यांनीही पत्रकार परिषद घेतली़ त्यावेळी ते बोलत होते़ डॉ़ भामरे यांनी, गोटे यांच्यावर देशद्रोहाचा आरोप असतांना पक्षाने त्यांना विधानसभेला संधी देऊन निवडून आणल्याचे सांगितले होते़ त्यावर बोलतांना गोटे यांनी सांगितले की, केवळ मी सरकार पाडण्याचा प्रयत्न केला म्हणून मला तेलगी प्रकरणात अडकविण्यात आले हे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना मान्य होते़  म्हणून पक्षाने मला विधानसभेसाठी उमेदवारी दिली़  तेलगी प्रकरणातील आरोप इतके तकलादू होते की मी वकील न लावता स्वत:ची बाजू स्वत: मांडत जामीन मिळवला, असे गोटे म्हणाले़ ज्या व्यक्तीला महिलांनी चपलेने मारले, पोलीसांवर हल्ला केला त्यांना पदाधिकारी पक्षात प्रवेश देत असतील, तर हे दुर्देव आहे़ मनमाड-इंदूर रेल्वेमार्ग ९ हजार ५०० कोटींचा आहे़ नियमानुसार त्यापैकी किमान १० टक्के म्हणजेच ९५० कोटींचा निधी उपलब्ध असल्याशिवाय निविदा काढता येत नाही, तरी ४७ कोटींची निविदा कशी काढली? शिवाय एकानेही ही निविदा भरलेली नाही, असे गोटे म्हणाले़ मला कुणी निवडणूक प्रक्रिया शिकवण्याची गरज नाही़ शहराच्या कल्याणासाठी मी आमदारकीचा राजीनामा देतो आहे़ हिंमत असेल तर संरक्षण राज्यमंत्र्यांनी राफेल प्रकरणावरून राजीनामा देऊन माझ्याविरोधात उभे राहावे, असे आमदार गोटे म्हणाले़  

टॅग्स :DhuleधुळेAnil Goteअनिल गोटे