शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

धर्मा पाटील यांच्या शेताचे पंचनामे कृषी अधिका-यांनी कार्यालयात बसूनच केले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 15:09 IST

शासनाला घरचा आहेर : अनिल गोटे यांचा खळबळजनक आरोप, चौकशीची केली मागणी

ठळक मुद्देभूसंपादनात १३५ कोटीचा गैरव्यवहार धुळे जिल्ह्यात वेगवेगळ्या प्रकल्पासाठी संपादीत केल्या जाणाºया जमिनीच्या व्यवहारामध्ये कोटयावधीचा भ्रष्टाचार आहे. हे मी गेल्या अनेक दिवसापासून सातत्याने शासनाच्या निदर्शनास आणून देत आहे. मुख्यमंत्र्यांनी खंबीर भूमिका घेऊन धुळ्यातील सर्व्हे नं.५०१ व ५१० या त्यात १३५ कोटीचे शासनाचे बोगस भूसंपादनाचे प्रकरण उघडकीस आले. जिल्ह्यात गेल्या अनेक वर्षापासून राजकीय नेत्यांच्या संरक्षणाखाली भूमाफीया व दलाल अक्षरश: हैदास घालीत आहेत. त्याचाच दृष्य परिणाम विखरणचे शेतकरी धर्मा पाटील यांच्या आत्महत्येत झाला.दोंडाईचा येथील औष्णिक प्रकल्पासाठी १९९ हेक्टर म्हणजे जवळपास ५०० एकर जमिनीचे भूसंपादन २००९ पासून सुरु होते.

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : विखरण येथील शेतकरी धर्मा पाटील यांच्या शेतात झालेल्या झाडांच्या पंचनाम्यावर कुठलीही तारीख नाही, पंचाच्या सह्या सुद्धा नाहीत. जमीन मालकाची सही नाही. यावरुन सिद्ध होते की, कृषी अधिकाºयांनी कार्यालयात बसूनच पंचनामे केले, असा खळबळजनक धुळे शहराचे भाजपा आमदार अनिल गोटे यांनी एका निवेदनाद्वारे केला आहे. आमदार गोटे यांनी सरकारला घरचा आहेर दिला आहे.आमदार गोटे यांनी निवेदनात म्हटले आहे की, धर्मा पाटील यांच्या शेतात असलेल्या झाडांचा पंचनामा ९ सप्टेंबर २०१२ रोजी करण्यात आला. त्यात सर्व्हे न.२९१/२अ, क्षेत्र १ हे.४ आर, ३७६ आंब्याची रोपे व पाईप लाईन अशी नोंद   आहे. सर्व्हे नं.२९१/२ ब धर्मा पाटील यांच्या नावावर एक हेक्टर जमिनीत २७१ आंबा रोपे व पक्की विहीर अशी स्वच्छ नोंद आहे. आपल्याकडे असलेल्या कागदपत्रामध्ये तलाठी आणि कृषी सहाय्यक यांनी प्रत्यक्ष शेतावर न जाताच पंचनामा केल्याचे सिद्ध होते. कारण धर्मा पाटील यांचा गट नं.२९१/२अ असा दर्शविला आहे तर नरेंद्र धर्मा पाटील यांचा गट नं.२९८/२ब असा दर्शविला आहे. पंचनाम्यावर कुठलीही तारीख, पंच आणि जमिन मालकाची सही नाही. याउलट ज्या शेतकºयास १ कोटी ९० लाख रुपये मोबदला मिळाला. त्याच्या पंचनाम्यावर मात्र पाच पंचाच्या व जमीन मालकाच्या सह्या आहेत. याबाबत धर्मा पाटील यांनी १४ आॅगस्ट २०१२ रोजी हरकत घेतल्याचे दिसून येते. जमिनीचा मोबदला देण्यात आल्यावर अन्याय होत असल्याबद्दल धर्मा पाटील यांनी जिल्हाधिकारी यांचेकडे २ डिसेंबर २०१७ रोजी, महसूल आयुक्तांकडे ४ डिसेंबर २०१७, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील व मुख्यमंत्री यांच्याकडे २२ नोव्हेंबर २०१७, पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांच्याकडे २१ नोव्हेंबर २०१७ रोजी केली आहे. तर मतदार संघाचे खासदार, केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री  यांच्याकडे ४ डिसेंबर २०१७ आणि भूसंपादन अधिकाºयाकडे २२ नोव्हेंबर २०१७ रोजी लेखी तक्रार केल्याचे त्यांच्या उपलब्ध कागदपत्रानुसार दिसून येते.वस्तुत: अधिकाºयांनी या तक्रारींची गांभीर्याने दखल घेऊन वेळीच कारवाई केली असती तर अशी दुर्देवी घटना निश्चितच टळू शकली असती.धर्मा पाटील यांनी भूसंपादन अधिकारी यांना २ डिसेंबर २०१७ रोजी दिलेल्या लेखी निवेदनात स्पष्टपणे नमूद केले आहे की,   माझे क्षेत्र जमीन विखरण औष्णिक ऊर्जा प्रकल्पांतर्गत येत असल्याने त्यात तशी भू - संपादन ४-१ ची नोटीस मला १६ जुलै २०१२ रोजी प्राप्त झाली. नोटीशीवर मी कायदेशीररित्या कोर्टामार्फत हरकत घेतली. त्यात माझ्या गटातील फळझाडे आंब्याच्या झाडाविषयी पूर्वसुचना दिली तरी माझ्या हरकतीवर भू - संपादन अधिकारी वर्ग -१ धुळे यांनी लेखी उत्तर पाठविले. त्यात शासकीय निवाडयात ठरले त्याप्रमाणे मोबदला देण्यात येईल, असे म्हटले. स्थळनिरीक्षण पंचनामे पिकपेरे असे सर्व असतांना मला फळझाडांचा मोबदल्यापासून वंचित ठेवण्यात आले आणि माझ्या बाजूच्या गटात गट नं.२९०/३, २२७/१, २२७/२ हे तिन्ही गट बाहेरगावच्या एजंटने घेतल्याने त्यात फळझाडे मोबदला देण्यात आला. परंतू सर्वसामान्य शेतकºयाला मुद्दाम डावलण्यात आले. तरी मला असा भेदभावाची वागणूक शासनाने देवू नये. वरील तिन्ही गटात   एजंट जयदेव दत्तात्रय देसले या नामक व्यक्तीने शासनाचे कोटयावधी रुपये मिळविले. पण प्रकल्पातील माझ्यासारख्या सामान्य शेतकºयाला डावलण्यात आले आहे. या प्रकरणाची शासनाने गंभीर दखल घेऊन योग्य ती कायदेशीर कारवाई करावी. तरी माझ्यावर झालेल्या अन्यायाची त्वरित दखल घेऊन मला योग्य न्याय लवकरात लवकर एक महिन्याच्या आत द्यावा अन्यथा मला आत्महत्या शिवाय दुसरा पर्याय नाही. याची संबंधित अधिकारी व शासनाने दखल घ्यावी. अन्यथा माझ्या मृत्यूस या प्रकारणातील सर्व शासकीय यंत्रणा जबाबदार राहतील याची नोंद घ्यावी, असे म्हटले होते.धर्मा पाटील यांच्या वरील निवेदनावरुन स्पष्ट दिसते की, त्यांच्या इशाºयाला कोणीही गांभीर्याने घेतले नाही.आतातरी शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन राष्टÑीय महामार्ग क्र.६ तसेच अन्य प्रकल्पासाठी सुरु असलेल्या भूसंपादनाच्या कामाची सखोल चौकशी करुन भूमाफीया व दलालानी घातलेल्या गोंधळाचा कायमचा बंदोबस्त करण्यासंबंधी आवश्यक ती कठोर कारवाई युद्धपातळीवर करावी. भविष्यात कुठल्याही शेतकºयाचा धर्मा पाटील होऊ नये याची काळजी घेतली जावी, असे निवेदनात शेवटी आमदार अनिल गोटे यांनी म्हटले आहे.