शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

स्वातंत्र्यानंतर शिंदखेड्याचे राजकारण पाण्याभोवतीच फिरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2017 11:23 IST

शिंदखेडा नगरपंचायत निवडणूक; राजकीय हालचालींना वेग : सत्ता द्या; पाणी पुरवठा योजना पूर्ण करण्याचे मतदारांना आश्वासन

ठळक मुद्देअवघ्या काही दिवसांवर शिंदखेडा नगरपंचायत येऊन ठेपल्यामुळे राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत. भाजपाची राजकीय सूत्र लालचंद नगर येथील अनिल वानखेडे यांचे निवासस्थान व स्टेशनरोडवरील भाजपा कार्यालय येथून हालत आहे.तर कॉँग्रेसतर्फे निवडणुकी संदर्भातील राजकीय रणनिती व धोरणात्मक निर्णय हे प्रा. सुरेश देसले यांच्या शिवाजी चौकातील निवासस्थानी चर्चा करून घेतले जात आहेत. शिवाजी चौकातच शिवसेना पक्षाचे कार्यालय आहे.शिवसेनेचे उमेदवार व कार्यकर्ते पक्ष कार्यालयात येऊन त्यांची निवडणुकीतील रणनिती ठरवत आहेत. तर समाजवादी पार्टीच्या राजकीय हालचाली या विजयसिंग राजपूत यांच्या रथगल्ली येथील निवासस्थानी चर्चा केल्यानंतर गतिमान होत असल्याचे एकंदरीत शिंदखेडा शहरात चित्र दिसून ये

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : शिंदखेडा तालुक्याची दुष्काळी तालुका अशी पूर्वापार ओळख आहे. ही ओळख अजूनही पुसली गेलेली नाही. शिंदखेडा शहरापुरता विचार केला तर येथील ग्रामपंचायत ते नगरपंचायतीत आजपर्यंत ज्यांनी सत्तेचा उपभोग घेतला; त्यांनाही शहराचा पाणी प्रश्न मार्गी लावता आलेला नाही. येवढेच नव्हे तर स्वातंत्र्यानंतर येथील राजकारण्यांचे राजकारण हे केवळ पाण्याभोवतीच फिरत राहिले; असे येथील जाणकार सांगतात. आता तर सत्ता द्या, पाणी पुरवठा योजना मार्गी लावूनच दाखवू, असे जनतेला आश्वासित केले जात असल्याचा प्रयत्न शिंदखेडा नगरपंचायत निवडणुकीत रिंगणात असलेल्या प्रमुख पक्षांच्या नेतेमंडळींकडून दिला जातो आहे. त्यामुळेच भाजपात केला प्रवेश भाजपात प्रवेश करणारे अनिल वानखेडे यांनी कॉँग्रेस व देसले गटातील गटबाजीला कंटाळून भाजपात प्रवेश करण्याचे सांगितले आहे. तसेच त्यांचे भाजपात येण्याचे दुसरे मुख्य कारण म्हणजे भाजपात मंत्री जयकुमार रावल यांनी  पाणीपुरवठा योजना मंजूर करून आणू,असा शब्द दिला होता. तो त्यांनी पाळला आणि प्रत्यक्षात जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू झाले आहे. त्यामुळेच भाजपात ते आले आहे.  

पाणीपुरवठा योजनेसाठी दिली लोकवर्गणी कॉँग्रेसचे प्रा. सुरेश देसले म्हणाले, की गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत सत्ता मिळाली. त्यानंतर पाच वर्षात शहर विकासासाठी  ६० टक्के काम के ल्याचा दावा त्यांनी केला आहे. पाणी पुरवठा योजना मंजूर झाल्यानंतर त्यासाठी शासनाने ५ टक्के लोकवर्गणीची अट घातली होती. त्यानुसार शिंदखेडा नगरपंचायतीला १३ व १४ व्या वित्त आयोगाचा मिळालेल्या निधीचे पैसे हे लोकवर्गणीसाठी दिले होते. त्यामुळे काही कामे ही राहून गेली, असे प्रा. देसले यांनी म्हटले आहे.  मात्र, येत्या निवडणुकीत सत्ता मिळाल्यास विकासाचा अनुशेष भरून काढणार असल्याचे ते म्हणाले आहे.  

शिवसेना १ डिसेंबरला जाहीर करणार जाहीरनामा शिंदखेडा नगरपंचायतीत शिवसेनेनेही १२ उमेदवार व १ नगराध्यक्षपदाचे उमेदवार रिंगणात आहेत. या उमेदवारांच्या प्रचाराची धूरा जिल्हाप्रमुख हेमंत साळुंखे यांच्यावर असून शिवसेना पक्षाचा जाहीरनामा १ डिसेंबरला प्रसिद्ध करणार असल्याची माहिती साळुंखे यांनी दिली आहे. परंतु, जाहीनाम्यावर  पाणी प्रश्न हा मुख्य मुद्दा राहणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.  

समाजवादी पार्टीतर्फे दिला जातोय विकासाचा नारा शिंदखेडा नगरपंचायतीत समाजवादी पार्टीतर्फे विकासाचा नारा दिला जातो आहे. स.पा.चे उमेदवार मतदारांना रस्ते, पाण्याचा निचरा व इतर विकासात्मक कामे करणार असल्याचे आश्वासन देत आहेत; तर या निवडणुकीत स.पा.ने १७ उमेदवार रिंगणात उतरविले आहे. त्यापैकी १० जागा व १ नगराध्यक्षपदी आमचा उमेदवारच निवडून येईल, असा विश्वास समाजवादी पार्टीचे विजय नथेसिंह राजपूत यांनी व्यक्त केला  आहे. 

जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू; गृहभेटीदरम्यान ‘पाणी पे’ चर्चा

शिंदखेडा विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार तथा राज्याचे रोहयो व पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी शहराचा बिकट पाणी प्रश्न विचारात घेता, शासनाकडे वारंवार पाठपुरावा करून २१ कोटीची पाणीपुरवठा योजना मंजूर करून आणली. सद्य:स्थितीत या योजनेंतर्गत शिंदखेडा शहरापासून ९ कि.मी. अंततरावर सुकवद येथील तापी नदीचे पात्रातून जलवाहिनी टाकण्यात येत आहे. या जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे भाजपाचे अनिल वानखेडे हे सत्ता आल्यानंतर ही योजना प्राधान्याने पूर्ण करणार असल्याचे प्रचारादरम्यान सांगताना दिसत आहे. निवडणुकीला अवघे काही दिवस बाकी राहिले आहेत. त्यामुळे आता विविध पक्षांचे उमेदवार हे गृहभेटींवर अधिक लक्ष केंद्रीत करताना दिसत आहेत. उमेदवार प्रचारासाठी मतदारांच्या घरी गेल्यानंतर केवळ ‘पाणी पे’ चर्चा अधिक रंगत आहे. मतदार उमेदवारांना या निवडणुकीनंतर तरी शहराचा पाणी प्रश्न हा कायमस्वरूपी मार्गी लावावा, अशी विनंती करताना दिसत आहे. मतदारांना उत्तर देताना  ‘फक्त सत्ता द्या, हा प्रश्न मार्गी लावल्याशिवाय राहणार नाही, असे सांगताना दिसत आहे.