शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

१३ वर्षानंतर अमरावती प्रकल्प ‘ओव्हरफ्लो’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2019 12:13 IST

धरणाचे दोन दरवाजे उघडले : १४८३ क्यूसेस पाण्याचा विसर्ग, दोंडाईच्यात नदीला आलेला पूर पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी

मालपूर/दोंडाईचा : शिंदखेडा तालुक्यातील मालपूर येथील अमरावती मध्यम प्रकल्प तब्बल १३ वर्षांच्या प्रदिर्घ कालावधीनंतर पूर्ण क्षमतेने भरला असून ‘ओव्हर फ्लो’ झाला आहे. गुरुवारी रात्री आठ वाजता धरणाचे दोन दरवाजे उघडण्यात आले. यामुळे अमरावती नदीला पूर आला आहे.मालपूर येथील अमरावती व नाई नदीवर अमरावती मध्यम प्रकल्प असून गुरुवारी सायंकाळी झालेल्या जोरदार पावसामुळे तसेच गेल्या दोन महिन्यात झालेल्या पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीत झपाटयाने वाढ होत आहे. त्यामुळे गुरुवारी रात्री ८ वाजेला धरणाचे दोन दरवाजे  ०.२५ मीटरने व रात्री १२ वाजेच्या सुमारास ०.३० मीटरने उघडण्यात आले. या अनुषंगाने एकूण १४८३ क्यूसेक इतका पाण्याचा विसर्ग अमरावती नदीपात्रात करण्यात आला आहे. तसेच पावसाचा जोर अधिक वाढल्यास पाण्याचा विसर्ग वाढविण्याची शक्यता असल्याचे प्रकल्पस्थळी लक्ष ठेऊन असलेले पाटबंधारे विभागाचे अभियंता जे.एम. शेख व प्रशांत खैरनार यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.दरम्यान, दोंडाईचा, दाऊळ, मंदाणे, झोतवाडे या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. ५ सप्टेंबर रोजी रात्री आठ वाजता प्रकल्पातील पाणी पातळी २२५.६० मीटर ९५० एम.सी.एफ.टी. जलसाठा होता. पाणी सोडल्यानंतर ६ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजेला २२५.३५ एवढा जलसाठा दिसून आला. २२५.२० लेव्हल आल्यावर परिस्थितीनुसार पाण्याचा अंदाज घेऊन हा विसर्ग थांबविण्यात येणार असल्याचे पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आले. पुन्हा आवक वाढल्यास विसर्ग करण्यात येईल.या प्रकल्पाची पूर्ण संचय पाणी पातळी २२५.७० असून १० सप्टेंबर नंतर एवढा पाणी साठा केला जाणार आहे. यामुळे २६०६ हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे.दोंडाईच्यात नदीला पूरप्रकल्प ‘ओव्हर फ्लो’ झाल्याने दोंडाईचा शहरातून जाणाºया अमरावती नदीला १३ वर्षानंतर प्रथमच पूर आला आहे. पूर पाहण्यासाठी शहवासीयांनी नदी काठावर मोठी गर्दी केली होती.दरम्यान, या पुरामुळे १३ वर्षापूर्वी आलेल्या पुराच्या आठवणी ताज्या झाल्या. सप्टेंबर २००६ मध्ये अतिवृष्टी झाली होती. परिसरातील तापी, अमरावती, भोगावती, बुराई नदीला पूर आला होता. दोंडाईच्यात अमरावती व भोगावती  नदीला पूर आला होता. त्यात नदी काठावरील ३० टपºया, २ बैल वाहून गेले होते. तसेच लाखो रुपयांची वित्तहानी झाली होती. या पुरावेळी सर्वात दुर्दैवी घटना म्हणजे या पुरात ठाकूर गल्लीत वास्तव्यास असलेले  विजय राघो वाडीले व महादेव मंदिरातील पुजारी वाहून गेले होते. त्यात त्यांचा मृत्यू झाला होता. अमरावती नदीकाठी विजय वाडीले यांची पानटपरी होती. पानटपरीत असलेला गल्ला वाहून जाऊ नये म्हणून ते गल्ल्यावर बसून होते. दरम्यान, पाण्याचा मोठा लोंढा आला. त्यात वाडीले वाहून गेले होते. अमरावती नदीच्या पुलावरून पाणी गेले होते. त्यावेळी पाण्यात दोर फेकून पुरग्रस्तांना बाहेर काढण्याचे प्रयत्न झाले होते.आता १३ वर्षानंतर प्रथमच अमरावती नदी दुथडी भरुन वाहत आहे. अनेकांनी पहिल्यादांच नदी वाहत असल्याचे पाहत असल्याचे सांगितले. तहसीलदार सुदाम महाजन यांनी आॅडीओ क्लिप व दोंडाईचा नगरपालिकेचे बांधकाम अभियंता शिवनंदन राजपूत यांनी लाऊड स्पीकरवरून नदी काठावरील व्यापारी व नागरिकांना सावध राहण्याचा इशारा दिला. काही दुर्घटना होऊ नये म्हणून पोलीस अमरावती पुलावर थांबून होते.

टॅग्स :Dhuleधुळे