शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

१३ वर्षानंतर अमरावती प्रकल्प ‘ओव्हरफ्लो’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2019 12:13 IST

धरणाचे दोन दरवाजे उघडले : १४८३ क्यूसेस पाण्याचा विसर्ग, दोंडाईच्यात नदीला आलेला पूर पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी

मालपूर/दोंडाईचा : शिंदखेडा तालुक्यातील मालपूर येथील अमरावती मध्यम प्रकल्प तब्बल १३ वर्षांच्या प्रदिर्घ कालावधीनंतर पूर्ण क्षमतेने भरला असून ‘ओव्हर फ्लो’ झाला आहे. गुरुवारी रात्री आठ वाजता धरणाचे दोन दरवाजे उघडण्यात आले. यामुळे अमरावती नदीला पूर आला आहे.मालपूर येथील अमरावती व नाई नदीवर अमरावती मध्यम प्रकल्प असून गुरुवारी सायंकाळी झालेल्या जोरदार पावसामुळे तसेच गेल्या दोन महिन्यात झालेल्या पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीत झपाटयाने वाढ होत आहे. त्यामुळे गुरुवारी रात्री ८ वाजेला धरणाचे दोन दरवाजे  ०.२५ मीटरने व रात्री १२ वाजेच्या सुमारास ०.३० मीटरने उघडण्यात आले. या अनुषंगाने एकूण १४८३ क्यूसेक इतका पाण्याचा विसर्ग अमरावती नदीपात्रात करण्यात आला आहे. तसेच पावसाचा जोर अधिक वाढल्यास पाण्याचा विसर्ग वाढविण्याची शक्यता असल्याचे प्रकल्पस्थळी लक्ष ठेऊन असलेले पाटबंधारे विभागाचे अभियंता जे.एम. शेख व प्रशांत खैरनार यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.दरम्यान, दोंडाईचा, दाऊळ, मंदाणे, झोतवाडे या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. ५ सप्टेंबर रोजी रात्री आठ वाजता प्रकल्पातील पाणी पातळी २२५.६० मीटर ९५० एम.सी.एफ.टी. जलसाठा होता. पाणी सोडल्यानंतर ६ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजेला २२५.३५ एवढा जलसाठा दिसून आला. २२५.२० लेव्हल आल्यावर परिस्थितीनुसार पाण्याचा अंदाज घेऊन हा विसर्ग थांबविण्यात येणार असल्याचे पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आले. पुन्हा आवक वाढल्यास विसर्ग करण्यात येईल.या प्रकल्पाची पूर्ण संचय पाणी पातळी २२५.७० असून १० सप्टेंबर नंतर एवढा पाणी साठा केला जाणार आहे. यामुळे २६०६ हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे.दोंडाईच्यात नदीला पूरप्रकल्प ‘ओव्हर फ्लो’ झाल्याने दोंडाईचा शहरातून जाणाºया अमरावती नदीला १३ वर्षानंतर प्रथमच पूर आला आहे. पूर पाहण्यासाठी शहवासीयांनी नदी काठावर मोठी गर्दी केली होती.दरम्यान, या पुरामुळे १३ वर्षापूर्वी आलेल्या पुराच्या आठवणी ताज्या झाल्या. सप्टेंबर २००६ मध्ये अतिवृष्टी झाली होती. परिसरातील तापी, अमरावती, भोगावती, बुराई नदीला पूर आला होता. दोंडाईच्यात अमरावती व भोगावती  नदीला पूर आला होता. त्यात नदी काठावरील ३० टपºया, २ बैल वाहून गेले होते. तसेच लाखो रुपयांची वित्तहानी झाली होती. या पुरावेळी सर्वात दुर्दैवी घटना म्हणजे या पुरात ठाकूर गल्लीत वास्तव्यास असलेले  विजय राघो वाडीले व महादेव मंदिरातील पुजारी वाहून गेले होते. त्यात त्यांचा मृत्यू झाला होता. अमरावती नदीकाठी विजय वाडीले यांची पानटपरी होती. पानटपरीत असलेला गल्ला वाहून जाऊ नये म्हणून ते गल्ल्यावर बसून होते. दरम्यान, पाण्याचा मोठा लोंढा आला. त्यात वाडीले वाहून गेले होते. अमरावती नदीच्या पुलावरून पाणी गेले होते. त्यावेळी पाण्यात दोर फेकून पुरग्रस्तांना बाहेर काढण्याचे प्रयत्न झाले होते.आता १३ वर्षानंतर प्रथमच अमरावती नदी दुथडी भरुन वाहत आहे. अनेकांनी पहिल्यादांच नदी वाहत असल्याचे पाहत असल्याचे सांगितले. तहसीलदार सुदाम महाजन यांनी आॅडीओ क्लिप व दोंडाईचा नगरपालिकेचे बांधकाम अभियंता शिवनंदन राजपूत यांनी लाऊड स्पीकरवरून नदी काठावरील व्यापारी व नागरिकांना सावध राहण्याचा इशारा दिला. काही दुर्घटना होऊ नये म्हणून पोलीस अमरावती पुलावर थांबून होते.

टॅग्स :Dhuleधुळे