शहरं
Join us  
Trending Stories
1
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
2
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
3
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
5
जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
6
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
7
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
8
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
9
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
10
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
11
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
12
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
13
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
14
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
15
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
16
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
17
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
18
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
19
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
20
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."

दारूबंदीनंतरही धुळे जिल्ह्यात अपघातांच्या संख्येत वाढ

By admin | Updated: June 10, 2017 13:31 IST

दारूबंदी लागू केल्यानंतरचे दोन महिने आणि त्याआधीच्या दोन महिन्यांतील अपघातांची तुलना करता ही बाब स्पष्ट झाली

ऑनलाईन लोकमत / राम निकुंभ  धुळे, दि. 10 - राज्य व राष्ट्रीय महामार्गालगत दारूबंदीची अंमलबजावणी सुरू झाल्यापासून दोन महिन्यात अपघातांची संख्या जैसे थे असून त्यात मृत्यूमुखी पडणा:या किंवा जखमींच्या संख्येत मात्र लक्षणीय वाढ झाली आहे. दारूबंदी लागू केल्यानंतरचे दोन महिने आणि त्याआधीच्या दोन महिन्यांतील अपघातांची तुलना करता ही बाब स्पष्ट झाली. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने राज्य व राष्ट्रीय महामार्गालगत 1 एप्रिलपासून दारूबंदीची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे.  राज्य व राष्ट्रीय महामार्गावर वेगात, निष्काळजीपणे वाहने चालविणे, अवघड वळणे या कारणाबरोबरच वाहनचालकांकडून मद्यसेवन करून वाहने चालविण्यामुळे अपघात होत असतात. महामार्गावर सहज मद्य उपलब्ध होत असल्याने हे अपघात होत असल्याचे मानले जात होते.त्यामुळे महामार्गावरील परमीट रूम, दारू दुकानांमधून सहज मद्य उपलब्ध होऊ नये, म्हणून महामार्गापासून पाचशे मीटरच्या अंतरावरील दारू विक्री बंद झाली आहे. त्यात जिल्ह्यातील महामार्गावरील 260 दारू दुकाने बंद झाली आहेत.  त्यात 40 देशी दारू दुकाने, 13 वाईप शॉप, 146 परवाना कक्ष, 61 बिअर शॉपी अशा एकूण 260 दारू दुकानांचा समावेश आह़े जिल्ह्यात महामार्गाचे जाळे आहे. सुरत-नागपूर, मुंबई-आग्रा, धुळे-सोलापूर,  अंकलेश्वर-बु:हाणपूर असे महामार्ग जिल्ह्यातून जातात. या मार्गावरील अपघातात वर्षाला 350हून अधिक जणांचा मृत्यू होतो. या महामार्गावरच सर्वाधिक दारू दुकाने होती. महामार्गावरील दारूबंदीनंतर एप्रिल व मे महिन्यात झालेल्या अपघातांची माहिती घेतली असता, अपघातांच्या संख्येमध्ये घट होण्याऐवजी वाढ झाल्याचे आढळून आले.एप्रिल महिन्यांत प्राणघातक 22 अपघात झाले असून त्यात 25 जणांना जीव गमवावा लागला, 14 गंभीर अपघात होऊन 54 जण गंभीर जखमी झाल़े मे महिन्यात 19 अपघातात 28 जणांचा मृत्यू, तर 21 गंभीर अपघातात 54 जण गंभीर जखमी झाले. दोन्ही महिन्यात 26 किरकोळ अपघातात 74 जखमी झाले आहे.महामार्गावरील दारूबंदी लागू होण्यापूर्वी मार्च महिन्यात 17 प्राणघातक अपघात होऊन 20 जण ठार, तर 8 गंभीर अपघातात 28 गंभीर जखमी झाले होते. तसेच फेब्रुवारी महिन्यात 13 अपघातात 14 ठार, तर 14 गंभीर अपघातात 28 गंभीर जखमी झाले होत़बेकादेशीर दारूविक्री रोखण्याची गरज महामार्गावर दारूबंदी असली, तरी हॉटेल्स व धाब्यांवर सहज दारू उपलब्ध होत आहे. पोलिसांनी केलेल्या हॉटेलमधील छाप्यांवरूनही ही बाबसमोर येत आहे.  बेकायदेशीर दारू विक्री रोखल्यास अपघातांची संख्या कमी होण्यास मदत होऊ शकते. अपेक्षा फोल कारण नेमके काय?फेब्रुवारी-मार्च आणि एप्रिल-मे महिन्यांच्या या तुलनेनुसार प्राणघातक  अपघातांची संख्या या कालावधीत सारखीच 30 एवढी असली तरी मृतांच्या संख्येत मात्र दारूबंदीनंतर 34 वरून 53 अशी दीडपट वाढ झाली आहे. गंभीर अपघातांची संख्या 22 वरून 35 अशी वाढली असून जखमींच्या प्रमाणातही 56 वरून 108 अशी जवळपास दुप्पट वाढ झाली आहे. किरकोळ अपघात मात्र दारूबंदीनंतर 31 ऐवजी 26 असे घटले आहेत. याऊलट जखमींच्या संख्येत मात्र पुन्हा 60 वरून 74 अशी सव्वा पट वाढ दिसून आली आहे. ही आकडेवारी पाहता दारूबंदीनंतर राज्य व राष्ट्रीय महामार्गालगत अपघातांची संख्या घटेल व प्राणहानी कमी होईल ही अपेक्षा फोल ठरली आहे मात्र एप्रिल व मे महिन्यात असलेल्या सुटय़ा व लगAसराईच्या हंगामामुळेसुद्धा वाहतुकीत वाढ होऊन अपघातांची संख्या वाढल्याचे कारण देण्यात येत आहे.