शहरं
Join us  
Trending Stories
1
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
2
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
3
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
4
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
5
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
6
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
7
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
8
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
9
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
10
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
11
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
12
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
13
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
14
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
15
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
16
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
17
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
18
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
19
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
20
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...

गोताणेचा जलयुक्तमध्ये समावेश करा

By admin | Updated: January 13, 2017 00:21 IST

धुळे : तालुक्यातील गोताणे येथील फुटलेले निमदरा धरण, तसेच गाळ साचलेले व नादुरुस्त पाझर तलाव आणि साठवण बंधा:यांच्या अभावामुळे हजारो एकर शेती कोरडवाहू बनली आहे

धुळे : तालुक्यातील गोताणे येथील फुटलेले निमदरा धरण, तसेच गाळ साचलेले व नादुरुस्त पाझर तलाव आणि साठवण बंधा:यांच्या अभावामुळे हजारो एकर शेती कोरडवाहू बनली आहे. पाण्याअभावी शेतकरी कजर्बाजारी झाला आहे. यासाठी गोताणे गावाचा जलयुक्त शिवार अभियानात समावेश करावा, अशी मागणी गोताणे ग्राममंचायतीतर्फे ठरावाद्वारे करण्यात आली आहे.गोताणे गावात सुमारे सहा हजार लोकसंख्या असून येथील ग्रामस्थांचा मुख्य व्यवसाय शेती आहे. संपूर्ण जीवन शेतीवरच अवलंबून असते. या गावाला मोठय़ाप्रमणात वनक्षेत्र तसेच छोटय़ा मोठय़ा नद्या नाल्यांचे भौगोलिक अनुकूलता लाभलेली आहे. परंतु कायम दुष्काळी भाग असल्याने भूगर्भातील पाण्याची पातळी खालावलेली आहे. परिणामी आजही हजारो एकर शेती कोरडवाहूच आहे. याकरीया उपाय योजना करणे गरजेचे आहे. अनेक वर्षापासून अतिवृष्टीमुळे गोताणे येथील निमदरा धरण फुटलेल्या अवस्थेत आहे. या धरणावर शेकडो एकर शेती अवलंबून असून धरण फुटल्यामुळे सदर जमीन कोरडवाहू झाली आहे. तसेच बामदरा आणि मंजुळ्या या पाझर तलावात प्रचंड प्रमाणात गाळ साठला असून यातील पाणी साठविण्याची क्षमता कमी झाली आहे. तसेच यास गळतीही मोठय़ा प्रमाणात आहे. परिणामी या धरणावर अवलंबून असलेल्या बागायतीचे प्रमाण कमी होऊन भूगर्भातील पाण्याची पातळी खालावल्याने विहिरीही लवकर तळ गाठत असतात. गोताणे वनक्षेत्र तसेच शेतशिवारातील नाल्यांचेही खोलीकरण करुन याठिकाणी सिमेंटचे साठवण बंधारे होणे गरजेचे आहे. सदर कामे करण्यासाठी गोताणे गावाचा जलयुक्त शिवार अभियानात समावेश करावा, अशी मागणी एका ठरावाद्वारे कृऊबाचे संचालक अजरून पाटील, सरपंच भगवान पाटील, सेवासोसायटीचे चेअरमन जिभाऊ वारु पाटील, ग्रा.पं. सदस्य पंढरीनाथ पाटील, माजी चेअरमन धुडकू पाटील, हिरालाल पाटील, तंटामुक्तीचे अध्यक्ष सरदार पाटील, उपाध्यक्ष चुडामण पाटील, वसंत पाटील, हिंमत अहिरे, सोसायटीचे संचालक आनंदा पाटील, दगडू पाटील, विनायक पाटी, हिंमत पाटील, दाजभाऊ पाटील यांच्यासह शेतक:यांनी केली आहे.