शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
2
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
3
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
4
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
5
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
6
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
7
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
8
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
9
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
10
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
11
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
12
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
13
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
14
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
15
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
16
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
17
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
18
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
19
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
20
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले

खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीस २० वर्षांनंतर अटक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2019 13:21 IST

पिंपळनेर पोलीस ठाणे हद्दीत १९९९ मध्ये झाला होता खून  

लोकमत आॅनलाईन धुळे : पिंंपळनेर पोलीस ठाणे हद्दीतील युवकाच्या खूनप्रकरणातील फरार आरोपीस तब्बल २० वर्षे ४ महिने १२ दिवसांनंतर अटक करण्यात आली आहे. विजय उर्फ पिन्ट्या प्रल्हाद पाटील (४१), रा.चिकसे, ता.साक्री असे या आरोपीचे नाव आहे. नारायण सुकदेव पाटील, रा.चिकसे, ता.साक्री यांनी त्यांचा मुलगा दीपक नारायण पाटील (१७) याचा निर्घृणपणे खून झाल्या प्रकरणी पिंंपळनेर पोलिसांत चार आरोपींविरूद्ध दिलेल्या फिर्यादीवरून गुरनं १/१९९९, भादंवि कलम ३०२,३४ प्रमाणे हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. विजय उर्फ पिन्ट्या हा गुन्हा घडल्यापासून फरार होता. त्याच्या वास्तव्याची माहिती मिळत नव्हती. त्यासाठी पोलिसांनी सर्वतोपरी प्रयत्न करूनही तो सापडत नव्हता. पण प्रयत्न सुरूच होते. त्यानुसार तो सध्या सुरत शहरात राहत असल्याचे समजले. तेथे जाऊन शोध घेतला. पण आरोपी चतूर असल्याने तो वेळोवेळी त्याचा राहण्याचा व व्यवसायाचा ठावठिकाणा बदलून आपले अस्तित्व लपवित होता. परंतु २८ रोजी विजय उर्फ पिन्ट्या हा साक्री येथे येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत घुमरे यांच्या मार्गदर्शनात येथील पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक पी.जे.राठोड, पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रवीण अमृतकर, सुरेश बोरसे, पोलीस कॉन्स्टेबल विशाल मोहने, प्रभाकर सोनवणे हे मंगळवारी संध्याकाळी साक्री बसस्थानक परिसरात दबा धरून बसले. त्याचवेळी विजय तेथे येताच त्यांनी त्यास ताब्यात घेतले. तो रामपार्क सोसायटी, प्लॉट नं.२१४, नवागाव दिडोली, सुरत (गुजरात) यास खात्री करून अटक करण्यात आली. जिल्हा पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे, अपर पोलीस अधीक्षक डॉ.राजू भुजबळ यांचे मार्गदर्शनात ही कारवाई करण्यात आली. 

टॅग्स :DhuleधुळेCrime Newsगुन्हेगारी