शहरं
Join us  
Trending Stories
1
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
2
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
3
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
4
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
5
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
6
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 
7
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
8
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
9
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 
10
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी
11
पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर?
12
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
13
कोट्यवधीची रोकड, ६.७ किलो सोनं आणि..., काँग्रेसच्या आमदाराकडे सापडलं घबाड, EDची कारवाई   
14
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
15
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
16
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
17
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
18
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
19
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
20
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!

धुळे विभागाला सुमारे ३५ लाखांचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:36 IST

जनता कर्फ्यूच्या कालावधीत बससेवा सुरू आहे. मात्र रविवार सायंकाळपासून संचारबंदी असल्याने, अनेकांनी प्रवास करणे टाळले होते. त्यामुळे १४ रोजी ...

जनता कर्फ्यूच्या कालावधीत बससेवा सुरू आहे. मात्र रविवार सायंकाळपासून संचारबंदी असल्याने, अनेकांनी प्रवास करणे टाळले होते. त्यामुळे १४ रोजी सायंकाळी ६ वाजता जनता कर्फ्यूची अंमलबजावणी झाल्यानंतर बसस्थानकावर बऱ्यापैकी वर्दळ हेाती. मात्र रात्री सर्वत्र शुकशुकाट होता.

धुळे विभागाच्या दररोज अडीच ते तीन हजार फेऱ्या ग्रामीणसह विविध शहरांत होत असतात. मात्र सोमवारी तब्बल ११५० फेऱ्या रद्द करण्यात आल्या होत्या. त्यामुळे एका दिवसात विभागाला ३० ते ३५ लाखांचा फटका बसल्याचे सांगण्यात आले.

शहरासह जिल्ह्यातही बाजारपेठेसह सर्वच दुकाने बंद आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातून शहरात येण्यासही काहीच अर्थ नसल्याने प्रवाशांनीही प्रवास करणे टाळले आहे. या जनता कर्फ्यूच्या कालावधीत ग्रामीण भागातील सर्वात जास्त फेऱ्या रद्द करण्यात आलेल्या आहेत. तसेच पुणे, मुंबई, नाशिक, औरंगाबाद, सुरत या मार्गावर प्रवाशांच्या उपलब्धतेनुसारच गाड्या सोडण्यात येत आहेत. मात्र या गाड्यांची संख्याही कमी झालेली आहे. मंगळवारीही दुपारी २ वाजेपर्यंत १ हजार २० फेऱ्या कमी झालेल्या होत्या अशी माहिती देण्यात आली.

केवळ धुळे जिल्ह्यातच नाही तर आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्येही कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने, तेथील जिल्हा प्रशासनाने जनता कर्फ्यू, अंशत: लॉकडाऊन जाहीर केलेले आहे. याचाही परिणाम बसेसच्या प्रवासी संख्येवर झालेला आहे.

बुधवारपासून नियमित फेऱ्या सुरू होण्याची शक्यता कमीच

बुधवारी सकाळी ६ वाजेपर्यंतच जनता कर्फ्यू असला तरी त्यानंतर विभागातील बसफेऱ्या पूर्वीप्रमाणेच सुरू होतील की नाही हे प्रवासी संख्येवरच अवलंबून आहे. परिस्थिती पूर्वपदावर येण्यासाठी अजून दोन-तीन दिवस लागू शकतात, अशी शक्यता अधिकारी व्यक्त करीत आहेत.

खासगी प्रवासी वाहतूक जोरात

प्रवासी नसल्याने महामंडळाने अनेक मार्गांवरील बसफेऱ्या रद्द केल्याचा फायदा मात्र खासगी प्रवासी वाहतूक करणारे घेत आहेत. काही भागात टॅक्सीसेवा सुरू असून, त्यांच्याकडून दुप्पट भाडे आकारणी केली जात आहे. मात्र गरज असल्याने प्रवासीही जादा पैसे देत आहेत.

आर्थिक संकटातून सावरत नाही तोच पुन्हा धक्का

गेल्या वर्षी २३ मार्चला लाॅकडाऊन जाहीर झाल्यानंतर संपूर्ण बससेवा बंद होती. यात महामंडळाचे कोट्यवधीचे नुकसान झाले. २५ मेपासून जिल्ह्यांतर्गत बससेवा सुरू झाली. मात्र त्याला प्रतिसादच मिळाला नाही. तर १९ ऑगस्टपासून आंतरजिल्हा बससेवा सुरू झाल्यानंतर थोडाफार प्रतिसाद मिळाला. मात्र दिवाळीपासून बसला प्रचंड गर्दी होऊ लागली होती. यातून महामंडळाला उत्पन्नही चांगले मिळाले होते. या संकटातून बाहेर येत नाही तोच पुन्हा जनता कर्फ्यू लागू लागल्याने महामंडळाच्या नुकसानीत भरच पडत आहे.