शहरं
Join us  
Trending Stories
1
पूरग्रस्तांसाठी ३१,६२८ कोटींचे महापॅकेज; शेतकऱ्यांना दिलासा : दोनऐवजी तीन हेक्टरसाठी मदतीची घाेषणा
2
संपादकीय: सनातन की संविधान? ही घटना किरकोळ ठरवून चालणार नाही...
3
आजचे राशीभविष्य- ८ ऑक्टोबर २०२५: सुंदर ठिकाणी फिरण्याचा योग, नोकरीत मिळेल बढती!
4
एक सेलेब्रिटी म्हणून त्या कंपनीसोबत जोडले गेले, मानधन मला मिळाले; ६० कोटींच्या घोटाळ्यावर शिल्पा शेट्टी काय म्हणाली...
5
छोट्या प्लाॅटधारकांची चिंता मिटली; मिळेल मालकी, तुकडेबंदी विनाशुल्क
6
हैदराबाद गॅझेट ‘जीआर’ला स्थगिती नाही; सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे हायकोर्टाचे निर्देश
7
नफ्यासाठी फिक्स होतो भारत विरुद्ध पाकिस्तान लढतींचा ड्रॉ! माइक आथर्टनचा ‘आयसीसी’वर आरोप
8
बिहारमध्ये पैशांचा पाऊस ठरणार का गेमचेंजर? महाराष्ट्रासारखेच निवडणुकीच्या तोंडावर सरकारी 'पॅकेज'
9
न्यायाधीशांच्या तोंडी शेऱ्यांचा सोशल मीडियात विपर्यास केला जात आहे; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली चिंता
10
टाटा सन्सच्या संचालक मंडळावरील नियुक्त्यांवरून उफाळले तीव्र मतभेद; केंद्र सरकार हस्तक्षेप करण्याची शक्यता
11
माझे अनेक डीपफेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली माहिती
12
सराव सामन्यात पृथ्वी शॉ मुंबईविरुद्ध तळपला, तंबूत जाता जाता भडकला...
13
जॉन क्लार्क, मिशेल देवोरेट अन् जॉन मार्टिनिस  यंदाचे भौतिकशास्त्राचे नोबेल पुरस्कार विजेते
14
रत्ने व आभूषण धोरण मंजूर, एक लाख कोटींची गुंतवणूक; पाच लाख रोजगार निर्मितीचे लक्ष्य
15
कर्जमाफीचे आश्वासन सरकार पूर्ण करणारच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुन्हा व्यक्त केला निर्धार 
16
आरक्षण, नोकरीसाठी आत्महत्येची चिठ्ठी अंगलट; तीन विविध समाजांची प्रकरणे : तिघांवर गुन्हा
17
आका मंत्रिमंडळात आहे का? पाटोळेंच्या अटकेवरून मित्रपक्ष व विरोधकांकडून शिंदेसेना लक्ष्य
18
विषारी ‘कफ सिरप’मुळे मृत्यूचे थैमान; १६ तासांत ३ बालकांचा बळी; मृतांची संख्या १६ 
19
वर्धा-भुसावळ, गोंदिया-डोंगरगड रेल्वे मार्ग मंजूर; २४,६३४ कोटी खर्चाच्या चार प्रकल्पांना केंद्राची मंजुरी
20
नवी मुंबई विमानतळ, भुयारी मेट्रोचे पंतप्रधानांच्या हस्ते आज लोकार्पण

धुळे विभागाला सुमारे ३५ लाखांचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:36 IST

जनता कर्फ्यूच्या कालावधीत बससेवा सुरू आहे. मात्र रविवार सायंकाळपासून संचारबंदी असल्याने, अनेकांनी प्रवास करणे टाळले होते. त्यामुळे १४ रोजी ...

जनता कर्फ्यूच्या कालावधीत बससेवा सुरू आहे. मात्र रविवार सायंकाळपासून संचारबंदी असल्याने, अनेकांनी प्रवास करणे टाळले होते. त्यामुळे १४ रोजी सायंकाळी ६ वाजता जनता कर्फ्यूची अंमलबजावणी झाल्यानंतर बसस्थानकावर बऱ्यापैकी वर्दळ हेाती. मात्र रात्री सर्वत्र शुकशुकाट होता.

धुळे विभागाच्या दररोज अडीच ते तीन हजार फेऱ्या ग्रामीणसह विविध शहरांत होत असतात. मात्र सोमवारी तब्बल ११५० फेऱ्या रद्द करण्यात आल्या होत्या. त्यामुळे एका दिवसात विभागाला ३० ते ३५ लाखांचा फटका बसल्याचे सांगण्यात आले.

शहरासह जिल्ह्यातही बाजारपेठेसह सर्वच दुकाने बंद आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातून शहरात येण्यासही काहीच अर्थ नसल्याने प्रवाशांनीही प्रवास करणे टाळले आहे. या जनता कर्फ्यूच्या कालावधीत ग्रामीण भागातील सर्वात जास्त फेऱ्या रद्द करण्यात आलेल्या आहेत. तसेच पुणे, मुंबई, नाशिक, औरंगाबाद, सुरत या मार्गावर प्रवाशांच्या उपलब्धतेनुसारच गाड्या सोडण्यात येत आहेत. मात्र या गाड्यांची संख्याही कमी झालेली आहे. मंगळवारीही दुपारी २ वाजेपर्यंत १ हजार २० फेऱ्या कमी झालेल्या होत्या अशी माहिती देण्यात आली.

केवळ धुळे जिल्ह्यातच नाही तर आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्येही कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने, तेथील जिल्हा प्रशासनाने जनता कर्फ्यू, अंशत: लॉकडाऊन जाहीर केलेले आहे. याचाही परिणाम बसेसच्या प्रवासी संख्येवर झालेला आहे.

बुधवारपासून नियमित फेऱ्या सुरू होण्याची शक्यता कमीच

बुधवारी सकाळी ६ वाजेपर्यंतच जनता कर्फ्यू असला तरी त्यानंतर विभागातील बसफेऱ्या पूर्वीप्रमाणेच सुरू होतील की नाही हे प्रवासी संख्येवरच अवलंबून आहे. परिस्थिती पूर्वपदावर येण्यासाठी अजून दोन-तीन दिवस लागू शकतात, अशी शक्यता अधिकारी व्यक्त करीत आहेत.

खासगी प्रवासी वाहतूक जोरात

प्रवासी नसल्याने महामंडळाने अनेक मार्गांवरील बसफेऱ्या रद्द केल्याचा फायदा मात्र खासगी प्रवासी वाहतूक करणारे घेत आहेत. काही भागात टॅक्सीसेवा सुरू असून, त्यांच्याकडून दुप्पट भाडे आकारणी केली जात आहे. मात्र गरज असल्याने प्रवासीही जादा पैसे देत आहेत.

आर्थिक संकटातून सावरत नाही तोच पुन्हा धक्का

गेल्या वर्षी २३ मार्चला लाॅकडाऊन जाहीर झाल्यानंतर संपूर्ण बससेवा बंद होती. यात महामंडळाचे कोट्यवधीचे नुकसान झाले. २५ मेपासून जिल्ह्यांतर्गत बससेवा सुरू झाली. मात्र त्याला प्रतिसादच मिळाला नाही. तर १९ ऑगस्टपासून आंतरजिल्हा बससेवा सुरू झाल्यानंतर थोडाफार प्रतिसाद मिळाला. मात्र दिवाळीपासून बसला प्रचंड गर्दी होऊ लागली होती. यातून महामंडळाला उत्पन्नही चांगले मिळाले होते. या संकटातून बाहेर येत नाही तोच पुन्हा जनता कर्फ्यू लागू लागल्याने महामंडळाच्या नुकसानीत भरच पडत आहे.