शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
3
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
4
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
5
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
8
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
9
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
10
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
11
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
12
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
13
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
14
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
15
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
16
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
17
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
18
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
19
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
20
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
Daily Top 2Weekly Top 5

धुळे विभागाला सुमारे ३५ लाखांचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:36 IST

जनता कर्फ्यूच्या कालावधीत बससेवा सुरू आहे. मात्र रविवार सायंकाळपासून संचारबंदी असल्याने, अनेकांनी प्रवास करणे टाळले होते. त्यामुळे १४ रोजी ...

जनता कर्फ्यूच्या कालावधीत बससेवा सुरू आहे. मात्र रविवार सायंकाळपासून संचारबंदी असल्याने, अनेकांनी प्रवास करणे टाळले होते. त्यामुळे १४ रोजी सायंकाळी ६ वाजता जनता कर्फ्यूची अंमलबजावणी झाल्यानंतर बसस्थानकावर बऱ्यापैकी वर्दळ हेाती. मात्र रात्री सर्वत्र शुकशुकाट होता.

धुळे विभागाच्या दररोज अडीच ते तीन हजार फेऱ्या ग्रामीणसह विविध शहरांत होत असतात. मात्र सोमवारी तब्बल ११५० फेऱ्या रद्द करण्यात आल्या होत्या. त्यामुळे एका दिवसात विभागाला ३० ते ३५ लाखांचा फटका बसल्याचे सांगण्यात आले.

शहरासह जिल्ह्यातही बाजारपेठेसह सर्वच दुकाने बंद आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातून शहरात येण्यासही काहीच अर्थ नसल्याने प्रवाशांनीही प्रवास करणे टाळले आहे. या जनता कर्फ्यूच्या कालावधीत ग्रामीण भागातील सर्वात जास्त फेऱ्या रद्द करण्यात आलेल्या आहेत. तसेच पुणे, मुंबई, नाशिक, औरंगाबाद, सुरत या मार्गावर प्रवाशांच्या उपलब्धतेनुसारच गाड्या सोडण्यात येत आहेत. मात्र या गाड्यांची संख्याही कमी झालेली आहे. मंगळवारीही दुपारी २ वाजेपर्यंत १ हजार २० फेऱ्या कमी झालेल्या होत्या अशी माहिती देण्यात आली.

केवळ धुळे जिल्ह्यातच नाही तर आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्येही कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने, तेथील जिल्हा प्रशासनाने जनता कर्फ्यू, अंशत: लॉकडाऊन जाहीर केलेले आहे. याचाही परिणाम बसेसच्या प्रवासी संख्येवर झालेला आहे.

बुधवारपासून नियमित फेऱ्या सुरू होण्याची शक्यता कमीच

बुधवारी सकाळी ६ वाजेपर्यंतच जनता कर्फ्यू असला तरी त्यानंतर विभागातील बसफेऱ्या पूर्वीप्रमाणेच सुरू होतील की नाही हे प्रवासी संख्येवरच अवलंबून आहे. परिस्थिती पूर्वपदावर येण्यासाठी अजून दोन-तीन दिवस लागू शकतात, अशी शक्यता अधिकारी व्यक्त करीत आहेत.

खासगी प्रवासी वाहतूक जोरात

प्रवासी नसल्याने महामंडळाने अनेक मार्गांवरील बसफेऱ्या रद्द केल्याचा फायदा मात्र खासगी प्रवासी वाहतूक करणारे घेत आहेत. काही भागात टॅक्सीसेवा सुरू असून, त्यांच्याकडून दुप्पट भाडे आकारणी केली जात आहे. मात्र गरज असल्याने प्रवासीही जादा पैसे देत आहेत.

आर्थिक संकटातून सावरत नाही तोच पुन्हा धक्का

गेल्या वर्षी २३ मार्चला लाॅकडाऊन जाहीर झाल्यानंतर संपूर्ण बससेवा बंद होती. यात महामंडळाचे कोट्यवधीचे नुकसान झाले. २५ मेपासून जिल्ह्यांतर्गत बससेवा सुरू झाली. मात्र त्याला प्रतिसादच मिळाला नाही. तर १९ ऑगस्टपासून आंतरजिल्हा बससेवा सुरू झाल्यानंतर थोडाफार प्रतिसाद मिळाला. मात्र दिवाळीपासून बसला प्रचंड गर्दी होऊ लागली होती. यातून महामंडळाला उत्पन्नही चांगले मिळाले होते. या संकटातून बाहेर येत नाही तोच पुन्हा जनता कर्फ्यू लागू लागल्याने महामंडळाच्या नुकसानीत भरच पडत आहे.