शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

खान्देशातील आखाजी- सासुरवाशीणींचा सण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2018 09:23 IST

लाडक्या लेकींना माहेरी आनंदाच्या चार क्षणांसाठी या सणाला महत्त्व 

ठळक मुद्देखान्देशात आखाजी सासुरवाशिणींचा सण घागर पुजून केले जाते पितरांचे श्राद्ध, तर्पणविधी त्यासाठी आमरस, पुरणपोळी, कटाची आमटी, भजी, कुरडई असा बेत

 

प्रदीप पाटील। लोकमत न्यूज नेटवर्कतिसगाव : खान्देशात आखाजी अर्थात अक्षय तृतीया हा सासुरवाशीणींचा सण समजला जातो. सासरी गेलेल्या लेकी सणासाठी माहेरी परतात. यामुळे परिवारात आनंदी वातावरण असते. लाडक्या लेकींना माहेरी आनंदाचे चार क्षण मिळावे यासाठी आखाजी सणाला विशेष महत्व आहे.अक्षय्यतृतीया! खान्देशात घरोघरी अक्षय्यघट म्हणजे पाण्याची घागर भरली जाते. त्याच्यावर छोटं मातीचच भांडं ठेऊन त्यावरती खरबुज आणि दोन सांजोºया, दोन आंबे ठेवतात. छोटं भांडं पितरांसाठी. आधी त्यांना पाण्याचा घट देऊन मग नविन माठ वापरण्यात येतो. पितरांचे श्राद्ध/ तर्पणविधी होतो. सकाळी उंबरठ्याचं औक्षण घेऊन पुर्वजांचं स्मरण करुन कुंकवाचं एकेक बोट उंबरठ्यावर उमटवत आणि एकेक नाव उच्चारत पितरांना आमंत्रण दिलं जातं. दुपारी चुलीवर 'घास' टाकतात. आमरस, पुरणपोळी, कटाची आमटी, भजी, कुरडई असा जबरदस्त बेत असतो. आजपासून आंबे खायला सुरवात करतात. रस्त्यावरील पाणपोयांचे उद्घाटन केले जाते.खान्देशात आखाजीचं अजुन एक महत्व आहे. भले तो लौकीकअर्थाने पितरांचा सण का म्हणेनात. पण खान्देशात हा सासुरवाशिणींचाही सण आहे. सासरी गेलेल्या लेकींना वर्षातून दोनदाच माहेरी जायला मिळतं. दिवाळी आणि आखाजी. दिवाळी घाई गडबडीत देणं घेणं करण्यात जाते. आखाजी म्हणजे विसाव्याचा सण. सासरच्या घबडग्यातुन, कामाच्या रेट्यातुन तेवढाच आराम. त्यामुळे त्या या सणाची आतुरतेने वाट बघत असतात. सासुरवाशिणीना गौराई असं म्हटलं जातं. आणि जावयाला शंकरजी!माहेरच्या ओढीने चैत्र वैशाखाच्या उन्हात, भावाबरोबर माहेरी निघालेली 'ती', उन्हाने तापुन लाल झालेल्या खडकांवरुन चालत, कधी पळत निघतांना बेगडी वहाणेचा उपयोग होत नाही. त्यामुळे पायही लाल झालेत. कण्हेरीच्या झाडाची सावली ती किती. तेवढ्याही सावलीचा आधार घेऊन, विसावा घेऊन नव्या दमाने पुन्हा 'ती' माहेरच्या वाटेला लागते.चैत्र वैशाखाचं उन्हं वं मायवैशाखाचं उन्हंखडक तापुन लाल झाले वं मायतापुन झाले लालआईच्या पायी आले फोड वं मायपायी आले फोडआईची बेगडी वाव्हन वं मायबेगडी वाव्हनतठे काय कन्हेरानं झाड वं मायकन्हेरानं झाडमाहेरी या सासुरवाशिणीचं कित्ती कोडकौतुक. आमरस, पुरणपोळीचं गोड जेवण, पुडाच्या पाटोड्या आणि काय काय...! दुपारच्या जेवणानंतर शेजारपाजारच्या सख्या भेटायला येतात. आंब्याच्या झाडाखाली पथाºया टाकल्या जातात.. गप्पागोष्टी, चेष्टामस्करी सुरु होते. मग आंब्याच्या झाडांना झोके बांधले जातात.आथानी कैरी तथानी कैरी, कैरी झोका खाय वंकैरी तुटनी खडक फुटना, झुयझुय पानी व्हायं वंझुयझुय पानी व्हाय तठे कसाना बाजार वंझुयझुय पानी व्हाय तठे बांगड्यास्ना बाजार वंमाय माले बांगड्या ली ठेवजो ली ठेवजोबन्धु हातमा दी ठेवजो ली ठेवजोबन्धु मना सोन्याना सोन्याना, पलंग पाडू मोत्यानाआथानी कैरी तथानी कैरी, कैरी झोका खाय वंकैरी तुटनी खडक फुटना झुयझुय पानी व्हायं वंझोके घेत मुली गाण्यातून आपल्याला सासरी कसं सुख आहे, नवरा किती काळजी घेतो हे असं रुपकातुन सांगतात.वाटवर हिरकनी खंदी वं मायसंकर राजानी खंदी वं मायवाटवर जाई कोनी लाई वं मायसंकर राजानी लाई वं मायजाईले पानी कोनी घालं वं मायसंकर राजानी घालं वं मायजाईले फुल कोनी आनं वं मायसंकर रानाजी आनं वं मायगौराईना गयामां माय कोनी घाली वं मायसंकर राजानी घाली वं माय

 

टॅग्स :DhuleधुळेAkshaya Tritiyaअक्षय तृतीया