शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

खान्देशातील आखाजी- सासुरवाशीणींचा सण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2018 09:23 IST

लाडक्या लेकींना माहेरी आनंदाच्या चार क्षणांसाठी या सणाला महत्त्व 

ठळक मुद्देखान्देशात आखाजी सासुरवाशिणींचा सण घागर पुजून केले जाते पितरांचे श्राद्ध, तर्पणविधी त्यासाठी आमरस, पुरणपोळी, कटाची आमटी, भजी, कुरडई असा बेत

 

प्रदीप पाटील। लोकमत न्यूज नेटवर्कतिसगाव : खान्देशात आखाजी अर्थात अक्षय तृतीया हा सासुरवाशीणींचा सण समजला जातो. सासरी गेलेल्या लेकी सणासाठी माहेरी परतात. यामुळे परिवारात आनंदी वातावरण असते. लाडक्या लेकींना माहेरी आनंदाचे चार क्षण मिळावे यासाठी आखाजी सणाला विशेष महत्व आहे.अक्षय्यतृतीया! खान्देशात घरोघरी अक्षय्यघट म्हणजे पाण्याची घागर भरली जाते. त्याच्यावर छोटं मातीचच भांडं ठेऊन त्यावरती खरबुज आणि दोन सांजोºया, दोन आंबे ठेवतात. छोटं भांडं पितरांसाठी. आधी त्यांना पाण्याचा घट देऊन मग नविन माठ वापरण्यात येतो. पितरांचे श्राद्ध/ तर्पणविधी होतो. सकाळी उंबरठ्याचं औक्षण घेऊन पुर्वजांचं स्मरण करुन कुंकवाचं एकेक बोट उंबरठ्यावर उमटवत आणि एकेक नाव उच्चारत पितरांना आमंत्रण दिलं जातं. दुपारी चुलीवर 'घास' टाकतात. आमरस, पुरणपोळी, कटाची आमटी, भजी, कुरडई असा जबरदस्त बेत असतो. आजपासून आंबे खायला सुरवात करतात. रस्त्यावरील पाणपोयांचे उद्घाटन केले जाते.खान्देशात आखाजीचं अजुन एक महत्व आहे. भले तो लौकीकअर्थाने पितरांचा सण का म्हणेनात. पण खान्देशात हा सासुरवाशिणींचाही सण आहे. सासरी गेलेल्या लेकींना वर्षातून दोनदाच माहेरी जायला मिळतं. दिवाळी आणि आखाजी. दिवाळी घाई गडबडीत देणं घेणं करण्यात जाते. आखाजी म्हणजे विसाव्याचा सण. सासरच्या घबडग्यातुन, कामाच्या रेट्यातुन तेवढाच आराम. त्यामुळे त्या या सणाची आतुरतेने वाट बघत असतात. सासुरवाशिणीना गौराई असं म्हटलं जातं. आणि जावयाला शंकरजी!माहेरच्या ओढीने चैत्र वैशाखाच्या उन्हात, भावाबरोबर माहेरी निघालेली 'ती', उन्हाने तापुन लाल झालेल्या खडकांवरुन चालत, कधी पळत निघतांना बेगडी वहाणेचा उपयोग होत नाही. त्यामुळे पायही लाल झालेत. कण्हेरीच्या झाडाची सावली ती किती. तेवढ्याही सावलीचा आधार घेऊन, विसावा घेऊन नव्या दमाने पुन्हा 'ती' माहेरच्या वाटेला लागते.चैत्र वैशाखाचं उन्हं वं मायवैशाखाचं उन्हंखडक तापुन लाल झाले वं मायतापुन झाले लालआईच्या पायी आले फोड वं मायपायी आले फोडआईची बेगडी वाव्हन वं मायबेगडी वाव्हनतठे काय कन्हेरानं झाड वं मायकन्हेरानं झाडमाहेरी या सासुरवाशिणीचं कित्ती कोडकौतुक. आमरस, पुरणपोळीचं गोड जेवण, पुडाच्या पाटोड्या आणि काय काय...! दुपारच्या जेवणानंतर शेजारपाजारच्या सख्या भेटायला येतात. आंब्याच्या झाडाखाली पथाºया टाकल्या जातात.. गप्पागोष्टी, चेष्टामस्करी सुरु होते. मग आंब्याच्या झाडांना झोके बांधले जातात.आथानी कैरी तथानी कैरी, कैरी झोका खाय वंकैरी तुटनी खडक फुटना, झुयझुय पानी व्हायं वंझुयझुय पानी व्हाय तठे कसाना बाजार वंझुयझुय पानी व्हाय तठे बांगड्यास्ना बाजार वंमाय माले बांगड्या ली ठेवजो ली ठेवजोबन्धु हातमा दी ठेवजो ली ठेवजोबन्धु मना सोन्याना सोन्याना, पलंग पाडू मोत्यानाआथानी कैरी तथानी कैरी, कैरी झोका खाय वंकैरी तुटनी खडक फुटना झुयझुय पानी व्हायं वंझोके घेत मुली गाण्यातून आपल्याला सासरी कसं सुख आहे, नवरा किती काळजी घेतो हे असं रुपकातुन सांगतात.वाटवर हिरकनी खंदी वं मायसंकर राजानी खंदी वं मायवाटवर जाई कोनी लाई वं मायसंकर राजानी लाई वं मायजाईले पानी कोनी घालं वं मायसंकर राजानी घालं वं मायजाईले फुल कोनी आनं वं मायसंकर रानाजी आनं वं मायगौराईना गयामां माय कोनी घाली वं मायसंकर राजानी घाली वं माय

 

टॅग्स :DhuleधुळेAkshaya Tritiyaअक्षय तृतीया