शहरं
Join us  
Trending Stories
1
"विधानभवनात आमदारांचे खून पडले तरी...", राज ठाकरे भडकले, महाराष्ट्रातील जनतेला संतप्त सवाल
2
'...तेव्हा राज ठाकरे-उद्धव ठाकरेंना लोक आपटून आपटून मारतील'; भाजप खासदार निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
3
पोस्ट ऑफिसच्या स्कीम्समध्ये महिलांना पुरुषांपेक्षा अधिक व्याज मिळतं का? चेक करा डिटेल्स
4
हृदयद्रावक! हिमाचल प्रदेशात निसर्ग कोपला, डोंगरावरून खाली आले दगड; आई-मुलाचा मृत्यू
5
आधी ९० तास काम करण्याचा दिलेला सल्ला; आता त्यांचाच पगार २५ कोटींनी वाढला, किती मिळणार पॅकेज
6
Cast Certificate: 'त्या' लोकांचे जातीचे प्रमाणपत्र रद्द होणार; विधान परिषदेत फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले...
7
पति निक जोनाससोबत प्रियंका चोप्राचं लिप-लॉक, समुद्र किनाऱ्यावर दिसला रोमॅन्टिक अंदाज; बघा लेटेस्ट VIDEO
8
नो फोटो प्लीज! सिद्धार्थ मल्होत्राची पापाराझींना विनंती; म्हणाला, "फक्त आशीर्वाद द्या..."
9
Mumbai: मालवणी परिसरातून अपहरण झालेल्या तीन मुलींची सुखरूप सुटका
10
'ही' आयटी कंपनी देणार २५०% लाभांश, तुमच्याकडे शेअर आहेत का? रेकॉर्ड डेट लगेच बघा!
11
५ वर्षांनंतर पाकिस्तानला यूके उड्डाणाची मुभा मिळाली! पण 'बनावट पायलट' घोटाळ्याचा शिक्का अजूनही कायम?
12
"नेत्यांचे आणि कार्यकर्त्यांचे अभिनंदन...", विधानभवनात पडळकर-आव्हाडांचे कार्यकर्ते भिडल्यानंतर मराठी अभिनेत्याचा टोला
13
६ महिन्यांपूर्वी लग्न मोडलं, मुलीने दुसरीकडे स्थळ बघायला सुरुवात केली; रागाने तरुण ऑफिसमध्ये पोहोचला अन्...
14
Mumbai Chawl Collapsed: वांद्र्यात तीन मजली चाळ कोसळली, अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकले, बचावकार्य सुरू
15
Share Market Today: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; 'या' शेअर्समध्ये दिसली मोठी घसरण
16
'शोले'मधील गब्बरचा अड्डा आहे या ठिकाणी, शूटिंगसाठी निर्मात्यांनी बनवलेला रस्ता, आता बनलंय पर्यटन स्थळ
17
१८ जुलै ते ११ ऑगस्ट बुधाचे वक्री भ्रमण; डोक्याचा ताप वाढणार, सगळ्या राशींनी घ्या 'ही' काळजी!
18
Ola-Uber Strike: "संप मागे घ्या नाही तर...; बंदूक दाखवून कॅब चालकांना धमकावले, व्हिडीओ व्हायरल!
19
दूध गरम करताना सिलेंडर फुटला, २० घरांची राखरांगोळी; महिलेचा होरपळून मृत्यू
20
राड्याच्या काही क्षण अगोदर काय घडले? पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर...

मनरेगा अंतर्गत ९७५ जणांना मिळाला रोजगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:38 IST

राज्यात लागू केलेल्या संचारबंदीचे शिरपूर प्रशासनातर्फे काटेकोरपणे पालन होत आहे. परंतु या संचारबंदीमुळे ग्रामीण भागातून शहरात कामासाठी येणाऱ्या मजुरांना ...

राज्यात लागू केलेल्या संचारबंदीचे शिरपूर प्रशासनातर्फे काटेकोरपणे पालन होत आहे. परंतु या संचारबंदीमुळे ग्रामीण भागातून शहरात कामासाठी येणाऱ्या मजुरांना रोजगाराची चिंता सतावत होती. काम मिळत नसल्याने आदिवासीबहुल परिसरातील अनेक तरुण मजूर स्थलांतरित होत असल्याची माहिती प्रशासनाच्या लक्षात आली. त्या पार्श्वभूमीवर तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने शहरात कामासाठी येणाऱ्या मजुरांना त्यांच्याच परिसरात मनरेगा अंतर्गत रोजगार मिळवून देण्यासाठी महसूल प्रशासनाने कंबर कसली आहे.

जिल्हाधिकारी संजय यादव यांच्या आदेशानंतर प्रांताधिकारी डॉ़. विक्रमसिंग बांदल यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार आबा महाजन यांनी महसूल प्रशासन, वनविभाग आणि पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या रोजगार हमी योजना विभागाची संयुक्त बैठक झाली़ या बैठकीनंतर आमदार काशिराम पावरा यांनी लागलीच आदिवासी भागात प्रत्यक्ष जाऊन मनरेगा अंतर्गत कामे सुरू केलीत़ त्यानुसार ११८ गावांपैकी सद्यस्थितीत ३७ गावात २०६ कामे सुरू करण्यात आली आहेत. त्यामध्ये विविध प्रकारच्या सहा कामांमधून तब्बल ९७५ मजुरांना कामे मिळाली आहेत.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतील जॉबकार्ड असलेल्या मजुरांनी काम मागितल्यास त्यांना शासनाकडून काम दिले जाते. केलेल्या कामांची नोंद मस्टरवर केली जाते. मस्टर संपल्यावर ८ ते १० दिवसात मजुरांना दिवसाला प्रती दिवस २४८ रुपये मजुरी सरळ त्यांच्या बँक खात्याद्वारे मिळते. अनेकवेळा तांत्रिक चुकांमुळे मजुरांच्या बँक खात्यात पैसे पडत नाहीत. त्यामुळे त्यांना बँकेचे हेलपाटे घालावे लागतात. याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची आवश्यकता आहे.

मजुरांचे स्थलांतर थांबणाऱ़़

मनरेगाच्या कामांची आदिवासी परिसरात मोठ्या प्रमाणात मागणी आहे. येथील तरुण मजुरांना काम मिळाले नाही तर ते मध्य प्रदेशची सीमा जवळ असल्याने तिथे काम करण्यास जातात. त्यामुळे त्यांच्या परिवारांना कोरोना काळात अनेक संकटांना तोंड द्यावे लागत आहे. प्रशासनाने कोरोना काळात अखंडितपणे काम दिल्यास येथून मजुरांचे स्थलांतर होणार नाही यांची दक्षता घेणे आवश्यक आहे़ तसे झाल्यास मजुरांचे स्थलांतर थांबेल़ तालुक्यातील वकवाड आणि दुर्बळ्या येथील आदिवासी बांधव मोठ्या प्रमाणात स्थलांतरित होत आहे़ प्रांताधिकारी डॉ.बांदल व तहसिलदार महाजन यांनी वकवाड आणि दुर्बळ्या परिसरातील स्थलांतर रोखण्यात यश मिळाले. प्रशासनाने या मजुरांना मनरेगा अंतर्गत त्यांच्याच परिसरात काम मिळवून दिले. या परिसरातील मनरेगा अंतर्गत होणारे काम आता अंतिम टप्प्यात आहे. येथील मजूर मनरेगाच्या नवीन कामांच्या प्रतीक्षेत आहेत.

सिंचनाच्या ४ कामांवर ३३ मजूर, रोपवाटिका १ एकरावर २० मजूर, सीसिटीच्या २-१९९, शौचखड्डा १-१९, रस्ता खडीकरण १-४८ , घरकुल - १९७ कामे त्यावर ६५६ मजूर असे एकूण ६ प्रकारच्या कामातून सुमारे १ हजार मजुरांना संचारबंदी काळात रोजगार हमी योजनेद्वारा रोजगार मिळाला आहे. येथील विवेकानंद रिसर्च अ‍ॅण्ड फाऊंडेशनचे विनोद माळी यांच्या देखरेखखाली कामे केली जात आहेत़