शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात ८५ ग्रामपंचायतींमध्ये राेहयोचे एकही काम नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:24 IST

धुळे : कोरोना, लाॅकडाऊन आणि ‘ब्रेक द चेन’च्या कठोर निर्बंधांमुळे बेरोजगारांची संख्या वाढली असताना जिल्ह्यातील ५५८ ग्रामपंचायतींपैकी ८५ ...

धुळे : कोरोना, लाॅकडाऊन आणि ‘ब्रेक द चेन’च्या कठोर निर्बंधांमुळे बेरोजगारांची संख्या वाढली असताना जिल्ह्यातील ५५८ ग्रामपंचायतींपैकी ८५ ग्रामपंचायतींमध्ये रोजगार हमी योजनेचे एकही काम सुरू झालेले नाही. त्यामुळे या ग्रामपंचायतींच्या अंतर्गत येणाऱ्या गावांमधील मजुरांना रोजगार उपलब्ध झालेला नाही.

कठोर निर्बंधांमुळे रोजगार गेल्याने महानगरातील अनेक कुटुंबे आपापल्या गावाला परतली होती. उन्हाळ्यात शेतांमध्येही कामे नसल्याने या मजुरांना कामांची प्रतीक्षा होती. परंतु काम मिळाले नसल्याने उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला होता.

जिल्ह्यात सध्या राेजगार हमी योजनेची ९९५ कामे सुरू असून, या कामांवर तीन हजार ९८६ मजुरांची उपस्थिती आहे. या कामांमध्ये घरकुल योजनेच्या कामांची संख्या सर्वाधिक आहे. जलसंधारणाची कामेदेखील हाती घेण्यात आली होती.

दरम्यान, आता शेतशिवारांमध्ये कामे उपलब्ध होणार असल्याने रोहयोच्या कामांची संख्या कमी होणार आहे.

हाताला काम नाही,

अन‌् ‘राेहयो’ही नाही !

कोरोनाकाळात हाताला काम नाही. काम शोधण्यासाठी बाहेरही पडता येत नव्हते. रोहयोची कामे सुरू झाली असती तर रोजगार मिळाला असता. उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

- विद्याबाई साळवे, मालपूर

काेरोनामुळे रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. राेहयो विभागाने गावात कामे सुरू केली नसल्याने हाताला काम मिळाले नाही. उदरनिर्वाह कसा करायचा, असा प्रश्न पडला आहे. कामे सुरू करण्याची गरज आहे.

- भरत देवरे, म्हसदी

सरपंच काय म्हणतात..?

कोरोनाकाळात रोहयोची कामे सुरू करण्याची घोषणा शासनाने केली होती. तशी मागणी आम्हीदेखील केली होती. मात्र काम सुरू झाले नाही. त्यामुळे बेरोजगार झालेल्या मजुरांच्या हाताला काम मिळाले नाही. मजूर कामाच्या शोधात आहेत. त्यांच्या हाताला काम देणे गरजेचे आहे. मजुरांना कामाची गरज आहे.

- मच्छिंद्र शिंदे, सरपंच, मालपूर

ग्रामीण भागाचा विकास घडवून आणण्याकरिता ग्रामीण भागातील लोकांचा आर्थिक विकास होणे गरजेचे आहे. यासाठी रोजगार असायला हवा. महाराष्ट्र रोजगार हमी योजनांची कामे करण्यावर भर देण्यात यावा. सिंचन विहीर, फळबाग लागवड योजना स्थानिक स्तरावर लवकरात लवकर सुरू करावी.

- शैलेजा देवरे, सरपंच, म्हसदी

कामे सुरू करणार

मजुरांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी कामे सुरू करण्याच्या सूचना सर्व विभागांना केल्या आहेत. मजुरांनी मागणी नोंदवावी. तशा सूचना विविध विभागांना दिल्या जातील.

- गाेविंद दाणेज, उपजिल्हाधिकारी, रोहयो