शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

जिल्ह्यात ८५ ग्रामपंचायतींमध्ये राेहयोचे एकही काम नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:24 IST

धुळे : कोरोना, लाॅकडाऊन आणि ‘ब्रेक द चेन’च्या कठोर निर्बंधांमुळे बेरोजगारांची संख्या वाढली असताना जिल्ह्यातील ५५८ ग्रामपंचायतींपैकी ८५ ...

धुळे : कोरोना, लाॅकडाऊन आणि ‘ब्रेक द चेन’च्या कठोर निर्बंधांमुळे बेरोजगारांची संख्या वाढली असताना जिल्ह्यातील ५५८ ग्रामपंचायतींपैकी ८५ ग्रामपंचायतींमध्ये रोजगार हमी योजनेचे एकही काम सुरू झालेले नाही. त्यामुळे या ग्रामपंचायतींच्या अंतर्गत येणाऱ्या गावांमधील मजुरांना रोजगार उपलब्ध झालेला नाही.

कठोर निर्बंधांमुळे रोजगार गेल्याने महानगरातील अनेक कुटुंबे आपापल्या गावाला परतली होती. उन्हाळ्यात शेतांमध्येही कामे नसल्याने या मजुरांना कामांची प्रतीक्षा होती. परंतु काम मिळाले नसल्याने उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला होता.

जिल्ह्यात सध्या राेजगार हमी योजनेची ९९५ कामे सुरू असून, या कामांवर तीन हजार ९८६ मजुरांची उपस्थिती आहे. या कामांमध्ये घरकुल योजनेच्या कामांची संख्या सर्वाधिक आहे. जलसंधारणाची कामेदेखील हाती घेण्यात आली होती.

दरम्यान, आता शेतशिवारांमध्ये कामे उपलब्ध होणार असल्याने रोहयोच्या कामांची संख्या कमी होणार आहे.

हाताला काम नाही,

अन‌् ‘राेहयो’ही नाही !

कोरोनाकाळात हाताला काम नाही. काम शोधण्यासाठी बाहेरही पडता येत नव्हते. रोहयोची कामे सुरू झाली असती तर रोजगार मिळाला असता. उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

- विद्याबाई साळवे, मालपूर

काेरोनामुळे रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. राेहयो विभागाने गावात कामे सुरू केली नसल्याने हाताला काम मिळाले नाही. उदरनिर्वाह कसा करायचा, असा प्रश्न पडला आहे. कामे सुरू करण्याची गरज आहे.

- भरत देवरे, म्हसदी

सरपंच काय म्हणतात..?

कोरोनाकाळात रोहयोची कामे सुरू करण्याची घोषणा शासनाने केली होती. तशी मागणी आम्हीदेखील केली होती. मात्र काम सुरू झाले नाही. त्यामुळे बेरोजगार झालेल्या मजुरांच्या हाताला काम मिळाले नाही. मजूर कामाच्या शोधात आहेत. त्यांच्या हाताला काम देणे गरजेचे आहे. मजुरांना कामाची गरज आहे.

- मच्छिंद्र शिंदे, सरपंच, मालपूर

ग्रामीण भागाचा विकास घडवून आणण्याकरिता ग्रामीण भागातील लोकांचा आर्थिक विकास होणे गरजेचे आहे. यासाठी रोजगार असायला हवा. महाराष्ट्र रोजगार हमी योजनांची कामे करण्यावर भर देण्यात यावा. सिंचन विहीर, फळबाग लागवड योजना स्थानिक स्तरावर लवकरात लवकर सुरू करावी.

- शैलेजा देवरे, सरपंच, म्हसदी

कामे सुरू करणार

मजुरांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी कामे सुरू करण्याच्या सूचना सर्व विभागांना केल्या आहेत. मजुरांनी मागणी नोंदवावी. तशा सूचना विविध विभागांना दिल्या जातील.

- गाेविंद दाणेज, उपजिल्हाधिकारी, रोहयो