शहरं
Join us  
Trending Stories
1
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
2
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
3
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
4
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
5
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा
6
याला म्हणतात प्रामाणिकपणा...! व्यापाऱ्याचे रिक्षात लाखो रुपये विसरले, रिक्षाचालकानं सर्व परत नेऊन दिले; रक्कम जाणून थक्क व्हाल!
7
ICICI ला HDFC चं अधिग्रहण करायचं होतं, चंदा कोचर यांच्यासमोर दीपक पारेखांनी उघडलं गुपित
8
"प्रगत राज्यातील मुलांना मागासलेल्या राज्यांची भाषा...", हिंदी भाषा सक्तीवरुन गार्गी फुले थेटच बोलल्या
9
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पाठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
10
तेरी दिवानी...! शुबमन गिलच्या सेंच्युरीनंतर फॅन गर्लचा तो खास व्हिडिओ व्हायरल
11
पत्नीची हत्या करून मृतदेह घराबाहेर पुरला, पोलीस आणि नातेवाईकांना असा दिला चकवा, दोन महिने सांगायचा...  
12
Air India Plane Crash: नव्या पाहुण्याचं स्वागत करण्याआधीच सगळं संपलं; ७ महिन्याची गर्भवती होती जिनल
13
Iran Israel युद्घात अजब चोरी; इस्रायली हॅकर्सनं ८०० कोटींची क्रिप्टोकरन्सी केली नष्ट, प्रकरण काय?
14
Yogini Ekadashi 2025: एखाद्या व्यक्तीने दिलेला शाप योगिनी एकादशी व्रताचरणामुळे होतो दूर!
15
खळबळ उडाली! जीन्स अन् टॉपमध्ये दिसू लागल्या हायफाय भिकारी, लोक १००-२०० रुपये देऊ लागले... 
16
Beed Crime News : बीडमध्ये पैशांसाठी अपहरण, मुलासाठी ५० हजार रुपयांची मागणी; नेमकं प्रकरण काय?
17
चीन-पाकिस्तानचं वाढणार टेन्शन; भारताला लवकरच मिळणार हायटेक्निक मिसाईल, कसं करणार काम?
18
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
19
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
20
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर

जिल्ह्यात ८३ टक्के पेरण्या पूर्ण

By admin | Updated: July 16, 2017 00:23 IST

पिकांना जीवदान, ‘दुबार’चे संकट टळले! : आता मका, तूर, बाजरीवर भर; जोरदार पावसाची प्रतीक्षा कायम

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : जिल्ह्यात गेल्या दोन-तीन दिवसांत झालेल्या पावसामुळे पिकांना जीवदान मिळाले असून दुबार पेरणीचे संकटही टळले आहे, अशी माहिती कृृषी विभागाच्या सूत्रांनी दिली. आजअखेर जिल्ह्यात ८३ टक्के पेरण्या झाल्या असून जुलै महिन्याअखेर पेरण्या पूर्ण होतील, अशी अपेक्षाही व्यक्त होत आहे. पेरणी आटोपणाºया शेतकºयांकडून आता मका, तूर, बाजरी आदी पिकांवर भर दिला जात असल्याचे सूत्र म्हणाले. जून महिन्यात मृग, आर्द्रा नक्षत्रात पेरणी झालेल पिके पावसाअभावी वाळून चालली होती, पिके ऊन धरत होती. अशा पिकांना या पावसामुळे एकप्रकारे जीवदान मिळाले आहे. त्यामुळे दुबार पेरणीचे संकट टळल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु अद्याप पुरेसा पाऊस बरसलेला नाही. परंतु पिकांना काहीअंशी दिलासा मिळाला आहे. मका, तूर, बाजरीचाच पर्यायखरीप हंगामास प्रारंभ होऊन महिन्याचा कालावधी उलटल्याने मूग, उडीद तसेच कपाशी लागवडीचा कालावधी संपत आला आहे. त्यामुळे आता मका, तूर, बाजरी, एरंडी या पिकांकडे शेतकरी वळले आहेत. मूग, उडीद ही अल्प कालावधीची पिके असून त्यांची पेरणी जून महिन्यातच होते. १५ जुलैनंतर त्याची लागवड केल्यास उत्पादनावर विपरित परिणाम होत असल्याचे सूत्रांनी सांगितले.१ लाख ९८ हजार हेक्टर क्षेत्रात कपाशीची लागवड पूर्ण पावसामुळे कपाशीच्या लागवडीसही गती मिळाली असून आतापर्यंत १ लाख ९८ हजार ८८८ हेक्टर क्षेत्रात कपाशीची लागवड पूर्ण झाली आहे. कृषी विभागाने या पिकासाठी १ लाख ८७ हजार ६०० हेक्टरचे उद्दिष्ट ठेवले होते. पण त्यापेक्षा जास्त लागवड झाली आहे. सर्वाधिक ६९ हजार ७२ हेक्टर क्षेत्रात लागवड शिरपूर तालुक्यात झाली आहे. त्यानंतर धुळे तालुका ६४ हजार ७१५ हेक्टर, शिंदखेडा तालुका ५३ हजार ७९० व साक्री तालुका ११ हजार ३११ हेक्टर क्षेत्रात लागवड झाली आहे. कपाशीखालोखाल बाजरी ५२ हजार ९२८ हेक्टर क्षेत्रात मक्याची ४७ हजार ९०४ हेक्टरमध्ये लागवड झाली आहे.शेतकºयांनी यंदा सोयाबीन पिकालाही पसंती दिली असून त्याची २१ हजार ५२४ हेक्टर क्षेत्रात लागवड झाली आहे. त्यानंतर मूग १८ हजार ८१४, भुईमूग ११ हजार ६१७, ज्वारी १० हजार २१३, उडीद ६ हजार ८५, तूर ५ हजार ६४६, भात ५ हजार ५७६, नागली १ हजार १३२ तर तीळ पिकाची ३८० हेक्टर क्षेत्रात लागवड झाली आहे. जिल्ह्यात आजपर्यंत एकंदर विचार करता कपाशी १ लाख ९८ हजार ८८८ हेक्टर, तृणधान्य १ लाख १८ हजार १२५ हेक्टर, गळीत धान्य ३३ हजार ५२४ हेक्टर व कडधान्याची ३१ हजार २३५ हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली आहे.