शहरं
Join us  
Trending Stories
1
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
2
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
3
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
4
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
5
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
6
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
7
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
8
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!
9
महिला अधिकारी तुरुंगात गुंडाशी फोनवर अश्लील बोलायची, पत्रेही सापडली; धक्कादायक माहिती उघड
10
विधानसभेच्या नो पार्किंगमध्ये उभी होती मंत्र्यांची कार, वाहतूक पोलिसांनी क्रेन आणली आणि...
11
बेपत्ता अर्चनाला शोधण्यासाठी पोलिसांना नवा प्लॅन; ८ दिवसांपासून ती गायब, ६ टीम अलर्ट
12
'तारीख-वार तुम्ही ठरवा, मी यायला तयार...'; बागेश्वर बाबाने स्वीकारलं अखिलेश यादवंचे 'चॅलेंज'
13
Krishna Janmashtami 2025: टीव्हीवर बालकृष्णाची भूमिका साकारणारी चिमुरडी आता दिसते खूप वेगळी, सध्या ती काय करते?
14
भारताच्या स्वातंत्र्याने खलिस्तान्यांना होतोय त्रास; ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यांवर गोंधळ घातला
15
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
16
पाकिस्तानमध्ये हाहाकार! ढगफुटी, पूर आणि भूस्खलनात ४१ लोकांचा मृत्यू, असंख्य बेपत्ता; पाचशे पर्यटक अडकले
17
प्रियकराची ओढ, पत्नीचं संसाराकडे दुर्लक्ष; त्यानंतर पतीने जे केले..., सासरचे जावयावरच उलटले
18
सुदर्शन चक्र, दहा वर्षात तयार होणार भारताचं स्वदेशी सुरक्षा कवच, सर्व शस्त्रास्त्रे ठरणार निष्प्रभ, अशी आहे योजना
19
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
20
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव

जिल्ह्यात ८३ टक्के पेरण्या पूर्ण

By admin | Updated: July 16, 2017 00:23 IST

पिकांना जीवदान, ‘दुबार’चे संकट टळले! : आता मका, तूर, बाजरीवर भर; जोरदार पावसाची प्रतीक्षा कायम

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : जिल्ह्यात गेल्या दोन-तीन दिवसांत झालेल्या पावसामुळे पिकांना जीवदान मिळाले असून दुबार पेरणीचे संकटही टळले आहे, अशी माहिती कृृषी विभागाच्या सूत्रांनी दिली. आजअखेर जिल्ह्यात ८३ टक्के पेरण्या झाल्या असून जुलै महिन्याअखेर पेरण्या पूर्ण होतील, अशी अपेक्षाही व्यक्त होत आहे. पेरणी आटोपणाºया शेतकºयांकडून आता मका, तूर, बाजरी आदी पिकांवर भर दिला जात असल्याचे सूत्र म्हणाले. जून महिन्यात मृग, आर्द्रा नक्षत्रात पेरणी झालेल पिके पावसाअभावी वाळून चालली होती, पिके ऊन धरत होती. अशा पिकांना या पावसामुळे एकप्रकारे जीवदान मिळाले आहे. त्यामुळे दुबार पेरणीचे संकट टळल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु अद्याप पुरेसा पाऊस बरसलेला नाही. परंतु पिकांना काहीअंशी दिलासा मिळाला आहे. मका, तूर, बाजरीचाच पर्यायखरीप हंगामास प्रारंभ होऊन महिन्याचा कालावधी उलटल्याने मूग, उडीद तसेच कपाशी लागवडीचा कालावधी संपत आला आहे. त्यामुळे आता मका, तूर, बाजरी, एरंडी या पिकांकडे शेतकरी वळले आहेत. मूग, उडीद ही अल्प कालावधीची पिके असून त्यांची पेरणी जून महिन्यातच होते. १५ जुलैनंतर त्याची लागवड केल्यास उत्पादनावर विपरित परिणाम होत असल्याचे सूत्रांनी सांगितले.१ लाख ९८ हजार हेक्टर क्षेत्रात कपाशीची लागवड पूर्ण पावसामुळे कपाशीच्या लागवडीसही गती मिळाली असून आतापर्यंत १ लाख ९८ हजार ८८८ हेक्टर क्षेत्रात कपाशीची लागवड पूर्ण झाली आहे. कृषी विभागाने या पिकासाठी १ लाख ८७ हजार ६०० हेक्टरचे उद्दिष्ट ठेवले होते. पण त्यापेक्षा जास्त लागवड झाली आहे. सर्वाधिक ६९ हजार ७२ हेक्टर क्षेत्रात लागवड शिरपूर तालुक्यात झाली आहे. त्यानंतर धुळे तालुका ६४ हजार ७१५ हेक्टर, शिंदखेडा तालुका ५३ हजार ७९० व साक्री तालुका ११ हजार ३११ हेक्टर क्षेत्रात लागवड झाली आहे. कपाशीखालोखाल बाजरी ५२ हजार ९२८ हेक्टर क्षेत्रात मक्याची ४७ हजार ९०४ हेक्टरमध्ये लागवड झाली आहे.शेतकºयांनी यंदा सोयाबीन पिकालाही पसंती दिली असून त्याची २१ हजार ५२४ हेक्टर क्षेत्रात लागवड झाली आहे. त्यानंतर मूग १८ हजार ८१४, भुईमूग ११ हजार ६१७, ज्वारी १० हजार २१३, उडीद ६ हजार ८५, तूर ५ हजार ६४६, भात ५ हजार ५७६, नागली १ हजार १३२ तर तीळ पिकाची ३८० हेक्टर क्षेत्रात लागवड झाली आहे. जिल्ह्यात आजपर्यंत एकंदर विचार करता कपाशी १ लाख ९८ हजार ८८८ हेक्टर, तृणधान्य १ लाख १८ हजार १२५ हेक्टर, गळीत धान्य ३३ हजार ५२४ हेक्टर व कडधान्याची ३१ हजार २३५ हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली आहे.