शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं, आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
2
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
3
शुबमन गिलच्या फोटोपेक्षा हातातल्या घड्याळ्याची रंगली चर्चा, किंमत ऐकाल तर अवाक् व्हाल...
4
क्रूरतेचा कळस! मिठाई ताजी नाही हे ऐकताच दुकानदार संतापला; १० वर्षांच्या मुलाला बेदम मारहाण
5
२, ३, ४BHK घर बांधायचेय? जीएसटीचा किती फायदा होणार? सिमेंट, सळ्या, टाईल्स कितीने स्वस्त झाल्या
6
गर्लफ्रेंडने ब्लॉक केलं, प्रेमभंग जीवावर बेतला, तरुणाने उचलले टोकाचे पाऊल; उपचारादरम्यान मृत्यू
7
१०% नं घसरलाय हा शेअर, पण अजूनही IPO च्या किंमतीपेक्षा ६०% नं अधिक; काय म्हणाले एक्सपर्ट?
8
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
9
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
10
ऑपरेशन मध्यातच सोडून पाकिस्तानी डॉक्टर झाला गायब! नर्सने दुसऱ्या रूमचा दरवाजा उघडताच दिसला धक्कादायक प्रकार
11
अंकिता लोखंडेचा नवरा रुग्णालयात दाखल; हाताला ४५ टाके अन्... मित्राने शेअर केली पोस्ट
12
प्रेम कहाणीचा दुर्दैवी अंत! ६ महिन्यापूर्वी प्रियकरासोबत लग्न केलेल्या युवतीने उचललं टोकाचं पाऊल
13
BAN vs SL Head to Head Record : 'टायगर वर्सेस शेर' भिडणार! 'नागिन डान्स'सह कोण कुणावर काढणार खुन्नस?
14
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?
15
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
16
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
17
Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!
18
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
19
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
20
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक

साक्री तालुक्यातून 66 हजार टन ऊस गाळप

By admin | Updated: February 4, 2017 00:02 IST

साक्री तालुक्यात गेल्या हंगामात पुरेसा पाऊस न झाल्यामुळे ऊस लागवडीचे उत्पादन निम्म्यावर आले आहे.

पिंपळनेर : साक्री तालुक्यात गेल्या हंगामात पुरेसा पाऊस न झाल्यामुळे ऊस लागवडीचे उत्पादन निम्म्यावर आले आहे. वास्तविक, तालुक्यात उत्पादित होणारा ऊस हा शेजारी असलेल्या नाशिक जिल्ह्यातील कारखान्यात पाठविला जातो. मात्र, उत्पादन घटल्यामुळे यावर्षी फक्त 66 हजार टन उसाचेच गाळप झाले आहे. दरम्यान, तालुक्यातील बेरोजगारांना रोजगार मिळावा, यासाठी पांझरा कान साखर कारखाना सुरू करावा, अशी मागणी शेतकरी व ग्रामस्थांकडून जोर धरू लागली आहे. साक्री तालुक्यातील मोठय़ा प्रमाणातील ऊस हा शेजारील नाशिक जिल्ह्यातील द्वारकाधीश साखर कारखान्याला पाठविण्यात येत असतो. त्या उद्देशाने एका एकरात 80 टन उसाचे उत्पादन घेणा:या शेतक:याला यावर्षी केवळ 40 टन उसाचे उत्पादन मिळाले आहे. त्यामुळे  50 टक्के उसाच्या उत्पादनात घट झाली आहे. शेतक:यांचे उत्पन्न घटले  पिंपळनेर, दहिवेल, कासारे, साक्री या ऊस उत्पादक मंडळामध्ये यंदा वर्षी मोठय़ा प्रमाणात दुष्काळ असल्याने त्याचा शेतक:यांना मोठा फटका बसला आहे. पाणी टंचाईमुळे अपेक्षित असलेले उत्पादन  न मिळाल्याने शेतक:यांपुढे अडचणी उभ्या राहिल्या आहेत. 25 टक्के उसाचा पुरवठासाक्री तालुक्यात उत्पादित होणारा 25 टक्के ऊस दरवर्षी नाशिक जिल्ह्यातील ऊस कारखान्यांना पाठविला जातो. गेल्यावर्षी द्वारकाधीश साखर कारखान्याचे 4 लाख 86 हजार टन ऐवढा ऊस गाळप करण्यात आला होता. पण यंदा दुष्काळाचा फटका बसल्यामुळे या कारखान्याचे ऊस गाळप 2 लाख 58 हजार टन एवढेच झाले आहे. रब्बी हंगामात शेतक:यांचा ऊस लागवडीवर भर गेल्या 3 वर्षापासून अवकाळी पावसामुळे शेतक:यांच्या हाताशी आलेले पीक वाया जात आहे. मात्र, यंदाच्या हंगामाच्या अखेरीस झालेल्या पावसामुळे पिंपळनेरसह परिसरातील धरणांमध्ये ब:यापैकी पाणीसाठा शिल्लक आहे. या सर्व धरणातील पाणी  पाटचा:यातून सोडण्यात आल्यामुळे रब्बी हंगामात शेतक:यांनी पुन्हा ऊस लागवडीवर भर दिल्याचे चित्र दिसून येत आहे.  गेल्या तीन वर्षापासून सतत दुष्काळ, गारपीट यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाल्याने आर्थिक फटका बसला. हे सावरण्यासाठी यंदा उस लागवड केली आहे. तालुक्यात मोठय़ा प्रमाणात ऊस असल्याने तो नाशिक जिल्ह्यात निर्यात होतो. तालुक्यातील पांझरा कान साखर कारखाना सुरू व्हावा, ही शेतक:यांची ब:याच वर्षापासूनची मागणी आहे. साखर कारखाना सुरू करण्यासाठी लोकप्रतिनिधींना लक्ष देण्याची गरज आहे.     - भूषण बोरसे, शेतकरी, देशशिरवाडे