शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

लसींचा स्टाॅक नसल्याने ६६ केंद्रे बंद; १ मेपासून काय होणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:36 IST

धुळे : जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधक लसींचा स्टाॅक नसल्याने १४६ पैकी ६६ लसीकरण केंद्रे बंद करण्याची वेळ आरोग्य विभागावर आली ...

धुळे : जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधक लसींचा स्टाॅक नसल्याने १४६ पैकी ६६ लसीकरण केंद्रे बंद करण्याची वेळ आरोग्य विभागावर आली आहे. त्यामुळे १ मेपासून काय होणार, असा प्रश्न प्रशासनाला पडला आहे. परंतु, शासनाकडून पुरेशा प्रमाणात लसींचा पुरवठा होत नसल्याने प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा तरी काय करणार, असे म्हणण्याची वेळ सर्वसामान्यांवर आली आहे.

जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासह प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या प्रभावी अंमलबजावणीत प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा गेल्या वर्षभरापासून गुरफटली आहे. कोरोनाच्या महामारीतून एकदाची सुटका व्हावी म्हणून लसीकरणातही यंत्रणेने स्वत:ला झोकून दिले आहे. शहरासह जिल्ह्यात एकूण १४६ लसीकरण केंद्रे सुरू केली होते. पंरतु, शासनाकडून पुरेशा प्रमाणात लस न मिळाल्यामुळे ६६ लसीकरण केंद्रे बंद करावी लागली. त्यामुळे जिल्ह्याचा लसीकरणाचा वेग कमालीचा मंदावला आहे.

जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण व्हावे यासाठी प्रशासनाचे प्रामाणिक प्रयत्न असून, त्यादृष्टीने तयारी देखील केली आहे. परंतु, लसींच्या बाबतीत जिल्ह्याच्या औषधालयात ठणठणाट असल्याने १ मेपासून काय होणार, असा प्रश्न आरोग्य विभागाला पडला आहे.

१ मे नंतरचे नियोजन काय?

४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण गेल्या तीन महिन्यांत केवळ २० टक्के झाले आहे. शासनाकडून आवश्यकतेप्रमाणे लसींचा पुरवठा होत नसल्याने जिल्ह्यात लसीकरणाचे नियोजन कोलमडले आहे.

सध्या लसीकरण सुरू असलेल्या वयोगटासह १८ ते ४५ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण करण्याचे नियोजन आरोग्य विभागासह प्रशासनाने केले आहे. लसीकरण केंद्रांची संख्या वाढविली जाणार आहे. आवश्यकतेप्रमाणे कर्मचारीवर्ग देखील उपलब्ध आहे.

परंतु, लसींची उपलब्धता होत नसल्याची प्रशासनापुढे सर्वांत मोठी अडचण आहे. लसींचा साठा संपल्याने सध्या अनेक केंद्रे बंद करावी लागली आहेत. त्यात प्रशासन, आरोग्य विभागाचा दोष नाही.

धुळे जिल्ह्याचा लसीकरणाचा वेग अतिशय मंद आहे. गेल्या तीन महिन्यांपासून लसीकरण सुरू असले तरी केवळ २० टक्के नागरिकांचे लसीकरण झाले आहे. २० ते २२ लाख लोकसंख्येला लसीकरण कधी होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

प्रशासनाने लसींची मागणी नोंदवली आहे. वेळोवेळी पाठपुरवा देखील केला जात आहे. परंतु, शासनाकडून लसींचा पुरवठा थांबल्याने लसीकरणाचा वेगदेखील मंदावला आहे. यात आरोग्य विभाग किंवा प्रशासनाला दोष देण्यात अर्थ नाही.

४५ वर्षांवरील जवळपास ८० टक्के नागरिकांचे लसीकरण राहिले आहे. १ मेपासून १८ ते ४५ च्या आतील नागरिकांचे लसीकरण सुरू होणार असल्याने पुरेशा प्रमाणात लस मिळाव्यात यासाठी लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करण्याची गरज आहे.

१ मेपासून १८ ते ४५ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण सुरू होणार आहे. यासंदर्भात मंगळवारी शासनासोबत होणाऱ्या व्हीसीमध्ये मार्गदर्शक सूचना दिल्या जातील. त्यानुसार लसीकरणाचे सुयोग्य धोरण आखले जाईल. लसींचा पुरवठा कमी असला तरी धुळे जिल्ह्याला किती लसींची गरज आहे याची संपूर्ण माहिती शासनाला आधीच दिली आहे. जास्तीत जास्त लसींची मागणी नोंदविली आहे. गरजेनुसार लसीकरण केंद्रांची संख्या वाढविली जाईल. लसीकरणासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत.

- संजय यादव, जिल्हाधिकारी