शहरं
Join us  
Trending Stories
1
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
2
Pahalgam Terror Attack : दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
3
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
4
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
5
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
6
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
7
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
8
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
9
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
10
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
11
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
12
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
13
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
14
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
15
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
16
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
17
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
18
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
19
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...
20
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता

६०० कोटीतून महानगरात विकास कामे सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2020 12:38 IST

धुळे : शहराला दररोज पाणी देण्याचे आश्वासन दिले होते. तांत्रिक अडचणीमुळे जरी पाणी पुरवठा करता आलेला नाही. तरी शहरातील ...

धुळे : शहराला दररोज पाणी देण्याचे आश्वासन दिले होते. तांत्रिक अडचणीमुळे जरी पाणी पुरवठा करता आलेला नाही. तरी शहरातील प्रत्येक भागात पाणीपुरवठा होण्यासाठी १३६ कोटीची अक्कलपाडा पाणीपुरवठा योजनेचे काम प्रगती पथावर आहे. नवीन वर्षात काम पुर्णत्वास आल्यानंतर नक्की दिवसाआड का होईना पाणी मिळले असा विश्वास महापौर चंद्रकांत सोनार यांनी व्यक्त केला आहे.भाजपाकडून बहूसंख्य आश्वासन पुर्ण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यात मुख्य पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी अक्कलपाडा धरणातून जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. तसेच तापी योजनेतून शहरातील जलकुंभ करण्याचे नियोजन केलेले आहे. तांत्रिक अडचणी, पाणी पुरवठ्याचे नियोजनासाठी विजेची समस्या सोडविण्यासाठी टाटा कन्सलटींग कंपनीला ठेका दिला आहे. त्यामुळे कंपनीच्या अधिपत्याखाली सुरळीत पाणीपुरवठा होईल.उद्यानाचा विकासपांझरा नदी किनारी मनपाकडून पाच कोटी रूपयातून उद्यानाचे काम प्रगतीपथावर आहे. तसेच ७० लाखांच्या निधीतून महाराणा प्रताप पुतळा परिसर सुशोभिकरण, जुन्या मनपाजवळ खाऊ गल्लीचे काम सुरु आहेत. तर निधी अभावी बंद पडलेले टॉवर बगीचा सुशोभिकरणाचे काम आता महापालिका फंडातून करण्यात येणार आहे.उद्योग व विकास कामांना चालना-शहरातील बेरोजगार तरूणांना रोजगार व मनपाच्या उत्पन्नात वाढ होण्यासाठी मनपा शाळा क्रंं. ५, १७, नवरंग जलकुंभ, देवपूर सव्हे् क्रं.७३ तसेच शाळा क्रं. २८ तसेच गुजराथी शाळा अशा विविध ठिकाणी व्यापारी संकुल उभारण्यात येणार आहे.ड्रेनेज लाईनकाम सुरू-शहरातील सांडपाण्याचा निचरा होण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. त्यासाठी भुमिगत गटारी कामे केली जात आहे. सध्या देवपूर भागात ड्रेनेज लाईनचे काम प्रगतीपथावर आहे. त्यानंतर टप्या-टप्यात केली जातील. हद्दवाढीतही कामे होण्यासाठी सव्हेक्षण केले जात आहे. त्याठिकाणी येणाऱ्या काळात कामे मार्गी लागतील.संपुर्ण शहरात एल. ए. डी-नव्याने समाविष्ठ व नवीन कॉलनी भागात पथदिवे नसल्याने नागरिकांनी गैरसोय होते. जुन्या पथदिव्यांमुळे मनपाला मोठ्या प्रमाणात वीज बिल भरावे लागते. वीजेचा खर्च व नागरिकांची समस्या सोडविण्यासाठी शहरात एलएडी पथदिवे बसविण्यात येणार आहे.संरक्षण भिंतीचे काम सुरू-समाजात तेढ निर्माण होऊ नये, यासाठी गजानन कॉलनी भागात संरक्षण भिंत बांधण्यात येत आहे. सध्या ते काम प्रगतीपथावर आहे. तसेच मनपा कर्जमुक्त होण्यासाठी मालमत्ता धारकांनी नव्याने मॅपींग केली जाणार आहे. त्यामुळे उत्पन्नात वाढ होईल, असे महापौर चंद्रकांत सोनार यांनी सांगितले.