शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
2
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
3
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
4
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
5
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
6
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
7
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
8
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
9
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
10
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
11
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
12
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
13
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
14
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
15
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
16
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
17
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
18
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
19
मथुरा श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरण: हिंदू पक्षाला झटका, शाही ईदगाहला वादग्रस्त ढाचा घोषित करण्याची मागणी HC नं फेटाळली
20
ENG vs IND : जलद शतकी खेळीसह Jamie Smith चा पराक्रम! १४८ वर्षांत असं पहिल्यांदा घडलं

६०० कोटीतून महानगरात विकास कामे सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2020 12:38 IST

धुळे : शहराला दररोज पाणी देण्याचे आश्वासन दिले होते. तांत्रिक अडचणीमुळे जरी पाणी पुरवठा करता आलेला नाही. तरी शहरातील ...

धुळे : शहराला दररोज पाणी देण्याचे आश्वासन दिले होते. तांत्रिक अडचणीमुळे जरी पाणी पुरवठा करता आलेला नाही. तरी शहरातील प्रत्येक भागात पाणीपुरवठा होण्यासाठी १३६ कोटीची अक्कलपाडा पाणीपुरवठा योजनेचे काम प्रगती पथावर आहे. नवीन वर्षात काम पुर्णत्वास आल्यानंतर नक्की दिवसाआड का होईना पाणी मिळले असा विश्वास महापौर चंद्रकांत सोनार यांनी व्यक्त केला आहे.भाजपाकडून बहूसंख्य आश्वासन पुर्ण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यात मुख्य पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी अक्कलपाडा धरणातून जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. तसेच तापी योजनेतून शहरातील जलकुंभ करण्याचे नियोजन केलेले आहे. तांत्रिक अडचणी, पाणी पुरवठ्याचे नियोजनासाठी विजेची समस्या सोडविण्यासाठी टाटा कन्सलटींग कंपनीला ठेका दिला आहे. त्यामुळे कंपनीच्या अधिपत्याखाली सुरळीत पाणीपुरवठा होईल.उद्यानाचा विकासपांझरा नदी किनारी मनपाकडून पाच कोटी रूपयातून उद्यानाचे काम प्रगतीपथावर आहे. तसेच ७० लाखांच्या निधीतून महाराणा प्रताप पुतळा परिसर सुशोभिकरण, जुन्या मनपाजवळ खाऊ गल्लीचे काम सुरु आहेत. तर निधी अभावी बंद पडलेले टॉवर बगीचा सुशोभिकरणाचे काम आता महापालिका फंडातून करण्यात येणार आहे.उद्योग व विकास कामांना चालना-शहरातील बेरोजगार तरूणांना रोजगार व मनपाच्या उत्पन्नात वाढ होण्यासाठी मनपा शाळा क्रंं. ५, १७, नवरंग जलकुंभ, देवपूर सव्हे् क्रं.७३ तसेच शाळा क्रं. २८ तसेच गुजराथी शाळा अशा विविध ठिकाणी व्यापारी संकुल उभारण्यात येणार आहे.ड्रेनेज लाईनकाम सुरू-शहरातील सांडपाण्याचा निचरा होण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. त्यासाठी भुमिगत गटारी कामे केली जात आहे. सध्या देवपूर भागात ड्रेनेज लाईनचे काम प्रगतीपथावर आहे. त्यानंतर टप्या-टप्यात केली जातील. हद्दवाढीतही कामे होण्यासाठी सव्हेक्षण केले जात आहे. त्याठिकाणी येणाऱ्या काळात कामे मार्गी लागतील.संपुर्ण शहरात एल. ए. डी-नव्याने समाविष्ठ व नवीन कॉलनी भागात पथदिवे नसल्याने नागरिकांनी गैरसोय होते. जुन्या पथदिव्यांमुळे मनपाला मोठ्या प्रमाणात वीज बिल भरावे लागते. वीजेचा खर्च व नागरिकांची समस्या सोडविण्यासाठी शहरात एलएडी पथदिवे बसविण्यात येणार आहे.संरक्षण भिंतीचे काम सुरू-समाजात तेढ निर्माण होऊ नये, यासाठी गजानन कॉलनी भागात संरक्षण भिंत बांधण्यात येत आहे. सध्या ते काम प्रगतीपथावर आहे. तसेच मनपा कर्जमुक्त होण्यासाठी मालमत्ता धारकांनी नव्याने मॅपींग केली जाणार आहे. त्यामुळे उत्पन्नात वाढ होईल, असे महापौर चंद्रकांत सोनार यांनी सांगितले.