शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

५२ गावांसाठी ६० विहिरी अधिग्रहित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2019 23:04 IST

पाणीटंचाई : शिंदखेडा तालुक्यातील ४० गावांसाठी ४७ विहिरींचे केले अधिग्रहण, साक्री तालुक्यात समाधानकारक स्थिती

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : जिल्ह्यात यावर्षी समाधानकारक पाऊस झाला नाही, त्याचबरोबर परतीच्या पावसानेही दडी मारली. परिणामी अनेक गावांमध्ये पाणी टंचाईचे सावट निर्माण झालेले आहे. जिल्ह्यातील पाणी टंचाई लक्षात घेता, जिल्हा प्रशासनातर्फे ५२ गावांसाठी ६० विहिरी अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत. दरम्यान पाणी टंचाईची सर्वाधिक झळ शिंदखेडा तालुक्याला बसत आहे. या तालुक्यातील ९ गावांना टॅँकरने पाणीपुरवठा करावा लागत असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातील पाणी टंचाई शाखेने दिलेली आहे.गेल्या दोन वर्षांपासून जिल्ह्यात पावसाचे प्रमाण खूपच कमी झालेले आहे. गेल्यावर्षी सुरवातीचा कालावधी वगळता मध्यंतरीच्या कालावधीत पावसाने दडी मारली. त्यातल्या त्यात परतीच्या पावसाने पाठ फिरविली. याचा परिणाम खरीपाच्या पिकांबरोबरच पाणी टंचाईवरही होवू लागला. कमी पावसाचा फटका धुळे, शिंदखेडा व शिरपूर तालुक्यातील गावांना बसू लागला आहे. दरवर्षी साधारणत: जानेवारी महिन्यानंतर पाणी टंचाई निवारणार्थ विहिरी अधिग्रहित केल्या जातात. मात्र पाणी टंचाईची स्थिती लक्षात घेता डिसेंबर १८ पासूनच विहिरी अधिग्रहित करण्यास सुरूवात झालेली आहे.५२ गावांसाठी६० विहिरी अधिग्रहितजिल्ह्यात ५२ गावांसाठी ६० विहिरी अधिग्रहित करण्यात आलेल्या आहेत. यात ५० विहिरी या पिण्याच्या पाण्यासाठी तर १० विहिरी या टॅँकर भरण्यासाठी अधिग्रहित करण्यात आलेल्या आहेत.सर्वाधिक गावेशिंदखेडा तालुक्यातीलविहिरी अधिग्रहित केलेल्या गावांमध्ये शिंदखेडा तालुक्यातील गावांची संख्या सर्वात जास्त आहे. या तालुक्यातील ४० गावांसाठी ३९ विहिरी तर टॅँकर भरण्यासाठी ८ अशा एकूण ४७ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आलेले आहे.तर धुळे तालुक्यातील ७ गावांसाठी ८ विहिरी अधिग्रहित केल्या असून, त्यातून ६ विहिरी या पिण्याच्या पाण्यासाठी व दोन विहिरी या टॅँकर भरण्यासाठी आहे. शिरपूर तालुक्यातील ५ गावांसाठी पाच विहिरी अधिग्रहित केलेल्या असल्याचे प्रशासनातर्फे कळविण्यात आलेले आहे.साक्री तालुक्यात विहिर अधिग्रहित नाही जिल्ह्यातील तीन तालुक्यांमध्ये पावसाचे प्रमाण खूपच कमी असल्याने, त्या तालुक्यांमध्ये प्रशासनाला आतापासून विहिरी अधिग्रहित कराव्या लागलेल्या आहेत. त्यामानाने साक्री तालुक्याची स्थिती समाधानकारक आहे. या तालुक्यात डिसेंबर १८ अखेरपर्यंत एकाही गावासाठी विहिर अधिग्रहित केलेली नाही, किंवा एकाही गावात टॅँकरने पाणी पुरवठा सुरू नाही.पाणीसाठा कमी जिल्ह्यात १२ मध्यम प्रकल्प असून, त्यात पाणीसाठा खूपच कमी आहे. या मध्यम प्रकल्पात १५१.६६ दशलक्ष घनफूट पाणी असून, त्याची टक्केवारी ४०.६७ टक्के आहे. मध्यम प्रकल्पातील पाण्याची ही स्थिती ४ जानेवारी १९ रोजीची आहे. वाडीशेवाडी, अमरावती, सोनवद, कनोली या मध्यम प्रकल्पात पाण्याचासाठा शुन्य आहे. त्यामुळे या मध्यम प्रकल्पाच्या जवळ असलेल्या गावांना पाणी टंचाई भेडसावण्याची भीती आहे.

टॅग्स :Dhuleधुळे