शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: माजी मंत्री तानाजी सावंत यांचा बंगला पाण्याखाली; दोन-दोन टोयोटा फॉर्च्युनर पुरात बुडाल्या...
2
सुनेत्रा अजित पवार यांचे NCP कार्यकर्त्यांना आवाहन; म्हणाल्या, “अतिवृष्टी हातात नाही, पण...”
3
अभूतपूर्व परिस्थितीत तातडीच्या मदतीसह कायमस्वरुपी मदतीची गरज; अन्यथा शेती मोठ्या समस्येत - शरद पवार
4
PM मेलोनींच्या इटलीमध्ये हजारो आंदोलक रस्त्यावर, बस-रेल्वे गाड्यांची तोडफोड; 60 पोलीस जखमी
5
पेनी स्टॉक बनला मल्टीबॅगर, एका वर्षात केलं मालामाल; १ लाखांचे झाले ६८ लाखांपेक्षा अधिक
6
Accident Video: दोन बाईकचा थरकाप उडवणारा अपघात; हवेत उडाले, नंतर फूट दूर जाऊन पडले
7
फक्त डेटा डिलिट करणं पुरेसं नाही! जुना फोन विकण्यापूर्वी 'या' ५ सीक्रेट गोष्टी करायलाच हव्यात
8
"पाकिस्तानचे तुकडे तुकडे होतील, बॉम्बहल्ला ही तर सुरुवात..."; इस्लामाबादच्या शत्रूचा इशारा
9
Navratri 2025: वडापावची क्रेव्हिंग होतेय? झटपट करा 'हा' उपासाचा कुरकुरीत बटाटेवडा
10
काय सांगता? स्लिम होण्याचा ट्रेंड जीवघेणा; बारीक लोकांमध्ये अकाली मृत्यूचा धोका तिप्पट
11
नाना पाटेकर सरसावले, 'ऑपरेशन सिंदूर'नंतर Pakच्या गोळीबारात बाधित झालेल्या कुटुंबांना ४२ लाखांची मदत
12
जीएसटीने आणखी अवघड केले...! पार्ले-जी बिस्कीट पुडा ५ रुपयांचा आता ४.४५ ला, १ रुपयाचे चॉकलेट ८८ पैशांना...
13
Gold Silver Price Today: आजही सोन्या-चांदीचे भाव नव्या विक्रमी पातळीवर; सोन्याच्या दरात प्रति तोळा ₹१,३४३ तर चांदी ₹१,१८१ ने महागली
14
Mumbai Local: एसी लोकलच्या टपावर चढला तरूण; क्षणात होत्याचं नव्हत झालं; दिवा स्थानकावरील घटना!
15
...म्हणून डोंबिवलीत काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याला भाजपाच्या कार्यकर्त्यांनी नेसवली साडी, व्हिडीओ व्हायरल
16
नवरात्री २०२५: वातीभोवती काजळी धरली? १ सोपा उपाय; वात नीट राहील अन् दिवा अजिबात विझणार नाही
17
"निरपराध लोकांची काय चूक होती? आम्ही निषेध करणार"; हवाई हल्ल्यात ३० जणांचा मृत्यू, पाकिस्तानमधील जनता संतापली
18
GST कपातीनंतर सरकारची आणखी एक गुड न्यूज! २५ लाख महिलांना मिळणार मोफत गॅस कनेक्शन
19
ओला दुष्काळ जाहीर करणार का? देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'त्याकरिता जेवढ्या पद्धतीची..."
20
"...ही चांगली गोष्ट नाही!"; राहुल गांधी यांच्या 'मत चोरी' संदर्भातील आरोपांवरून शरद पवार यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?

५२ गावांसाठी ६० विहिरी अधिग्रहित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2019 23:04 IST

पाणीटंचाई : शिंदखेडा तालुक्यातील ४० गावांसाठी ४७ विहिरींचे केले अधिग्रहण, साक्री तालुक्यात समाधानकारक स्थिती

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : जिल्ह्यात यावर्षी समाधानकारक पाऊस झाला नाही, त्याचबरोबर परतीच्या पावसानेही दडी मारली. परिणामी अनेक गावांमध्ये पाणी टंचाईचे सावट निर्माण झालेले आहे. जिल्ह्यातील पाणी टंचाई लक्षात घेता, जिल्हा प्रशासनातर्फे ५२ गावांसाठी ६० विहिरी अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत. दरम्यान पाणी टंचाईची सर्वाधिक झळ शिंदखेडा तालुक्याला बसत आहे. या तालुक्यातील ९ गावांना टॅँकरने पाणीपुरवठा करावा लागत असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातील पाणी टंचाई शाखेने दिलेली आहे.गेल्या दोन वर्षांपासून जिल्ह्यात पावसाचे प्रमाण खूपच कमी झालेले आहे. गेल्यावर्षी सुरवातीचा कालावधी वगळता मध्यंतरीच्या कालावधीत पावसाने दडी मारली. त्यातल्या त्यात परतीच्या पावसाने पाठ फिरविली. याचा परिणाम खरीपाच्या पिकांबरोबरच पाणी टंचाईवरही होवू लागला. कमी पावसाचा फटका धुळे, शिंदखेडा व शिरपूर तालुक्यातील गावांना बसू लागला आहे. दरवर्षी साधारणत: जानेवारी महिन्यानंतर पाणी टंचाई निवारणार्थ विहिरी अधिग्रहित केल्या जातात. मात्र पाणी टंचाईची स्थिती लक्षात घेता डिसेंबर १८ पासूनच विहिरी अधिग्रहित करण्यास सुरूवात झालेली आहे.५२ गावांसाठी६० विहिरी अधिग्रहितजिल्ह्यात ५२ गावांसाठी ६० विहिरी अधिग्रहित करण्यात आलेल्या आहेत. यात ५० विहिरी या पिण्याच्या पाण्यासाठी तर १० विहिरी या टॅँकर भरण्यासाठी अधिग्रहित करण्यात आलेल्या आहेत.सर्वाधिक गावेशिंदखेडा तालुक्यातीलविहिरी अधिग्रहित केलेल्या गावांमध्ये शिंदखेडा तालुक्यातील गावांची संख्या सर्वात जास्त आहे. या तालुक्यातील ४० गावांसाठी ३९ विहिरी तर टॅँकर भरण्यासाठी ८ अशा एकूण ४७ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आलेले आहे.तर धुळे तालुक्यातील ७ गावांसाठी ८ विहिरी अधिग्रहित केल्या असून, त्यातून ६ विहिरी या पिण्याच्या पाण्यासाठी व दोन विहिरी या टॅँकर भरण्यासाठी आहे. शिरपूर तालुक्यातील ५ गावांसाठी पाच विहिरी अधिग्रहित केलेल्या असल्याचे प्रशासनातर्फे कळविण्यात आलेले आहे.साक्री तालुक्यात विहिर अधिग्रहित नाही जिल्ह्यातील तीन तालुक्यांमध्ये पावसाचे प्रमाण खूपच कमी असल्याने, त्या तालुक्यांमध्ये प्रशासनाला आतापासून विहिरी अधिग्रहित कराव्या लागलेल्या आहेत. त्यामानाने साक्री तालुक्याची स्थिती समाधानकारक आहे. या तालुक्यात डिसेंबर १८ अखेरपर्यंत एकाही गावासाठी विहिर अधिग्रहित केलेली नाही, किंवा एकाही गावात टॅँकरने पाणी पुरवठा सुरू नाही.पाणीसाठा कमी जिल्ह्यात १२ मध्यम प्रकल्प असून, त्यात पाणीसाठा खूपच कमी आहे. या मध्यम प्रकल्पात १५१.६६ दशलक्ष घनफूट पाणी असून, त्याची टक्केवारी ४०.६७ टक्के आहे. मध्यम प्रकल्पातील पाण्याची ही स्थिती ४ जानेवारी १९ रोजीची आहे. वाडीशेवाडी, अमरावती, सोनवद, कनोली या मध्यम प्रकल्पात पाण्याचासाठा शुन्य आहे. त्यामुळे या मध्यम प्रकल्पाच्या जवळ असलेल्या गावांना पाणी टंचाई भेडसावण्याची भीती आहे.

टॅग्स :Dhuleधुळे