शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

५२ गावांसाठी ६० विहिरी अधिग्रहित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2019 23:04 IST

पाणीटंचाई : शिंदखेडा तालुक्यातील ४० गावांसाठी ४७ विहिरींचे केले अधिग्रहण, साक्री तालुक्यात समाधानकारक स्थिती

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : जिल्ह्यात यावर्षी समाधानकारक पाऊस झाला नाही, त्याचबरोबर परतीच्या पावसानेही दडी मारली. परिणामी अनेक गावांमध्ये पाणी टंचाईचे सावट निर्माण झालेले आहे. जिल्ह्यातील पाणी टंचाई लक्षात घेता, जिल्हा प्रशासनातर्फे ५२ गावांसाठी ६० विहिरी अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत. दरम्यान पाणी टंचाईची सर्वाधिक झळ शिंदखेडा तालुक्याला बसत आहे. या तालुक्यातील ९ गावांना टॅँकरने पाणीपुरवठा करावा लागत असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातील पाणी टंचाई शाखेने दिलेली आहे.गेल्या दोन वर्षांपासून जिल्ह्यात पावसाचे प्रमाण खूपच कमी झालेले आहे. गेल्यावर्षी सुरवातीचा कालावधी वगळता मध्यंतरीच्या कालावधीत पावसाने दडी मारली. त्यातल्या त्यात परतीच्या पावसाने पाठ फिरविली. याचा परिणाम खरीपाच्या पिकांबरोबरच पाणी टंचाईवरही होवू लागला. कमी पावसाचा फटका धुळे, शिंदखेडा व शिरपूर तालुक्यातील गावांना बसू लागला आहे. दरवर्षी साधारणत: जानेवारी महिन्यानंतर पाणी टंचाई निवारणार्थ विहिरी अधिग्रहित केल्या जातात. मात्र पाणी टंचाईची स्थिती लक्षात घेता डिसेंबर १८ पासूनच विहिरी अधिग्रहित करण्यास सुरूवात झालेली आहे.५२ गावांसाठी६० विहिरी अधिग्रहितजिल्ह्यात ५२ गावांसाठी ६० विहिरी अधिग्रहित करण्यात आलेल्या आहेत. यात ५० विहिरी या पिण्याच्या पाण्यासाठी तर १० विहिरी या टॅँकर भरण्यासाठी अधिग्रहित करण्यात आलेल्या आहेत.सर्वाधिक गावेशिंदखेडा तालुक्यातीलविहिरी अधिग्रहित केलेल्या गावांमध्ये शिंदखेडा तालुक्यातील गावांची संख्या सर्वात जास्त आहे. या तालुक्यातील ४० गावांसाठी ३९ विहिरी तर टॅँकर भरण्यासाठी ८ अशा एकूण ४७ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आलेले आहे.तर धुळे तालुक्यातील ७ गावांसाठी ८ विहिरी अधिग्रहित केल्या असून, त्यातून ६ विहिरी या पिण्याच्या पाण्यासाठी व दोन विहिरी या टॅँकर भरण्यासाठी आहे. शिरपूर तालुक्यातील ५ गावांसाठी पाच विहिरी अधिग्रहित केलेल्या असल्याचे प्रशासनातर्फे कळविण्यात आलेले आहे.साक्री तालुक्यात विहिर अधिग्रहित नाही जिल्ह्यातील तीन तालुक्यांमध्ये पावसाचे प्रमाण खूपच कमी असल्याने, त्या तालुक्यांमध्ये प्रशासनाला आतापासून विहिरी अधिग्रहित कराव्या लागलेल्या आहेत. त्यामानाने साक्री तालुक्याची स्थिती समाधानकारक आहे. या तालुक्यात डिसेंबर १८ अखेरपर्यंत एकाही गावासाठी विहिर अधिग्रहित केलेली नाही, किंवा एकाही गावात टॅँकरने पाणी पुरवठा सुरू नाही.पाणीसाठा कमी जिल्ह्यात १२ मध्यम प्रकल्प असून, त्यात पाणीसाठा खूपच कमी आहे. या मध्यम प्रकल्पात १५१.६६ दशलक्ष घनफूट पाणी असून, त्याची टक्केवारी ४०.६७ टक्के आहे. मध्यम प्रकल्पातील पाण्याची ही स्थिती ४ जानेवारी १९ रोजीची आहे. वाडीशेवाडी, अमरावती, सोनवद, कनोली या मध्यम प्रकल्पात पाण्याचासाठा शुन्य आहे. त्यामुळे या मध्यम प्रकल्पाच्या जवळ असलेल्या गावांना पाणी टंचाई भेडसावण्याची भीती आहे.

टॅग्स :Dhuleधुळे