शहरं
Join us  
Trending Stories
1
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
2
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
3
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
4
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
5
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
6
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
7
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
8
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
9
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
10
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
11
Paetongtarn Shinawatra: कोण आहे 'ती' व्यक्ती; जिच्याशी फोन कॉल 'लीक' झाल्याने गेलं शिनावात्रा यांचं पंतप्रधानपद
12
“नाना पटोलेंना चर्चेत येण्यासाठी PM मोदी यांच्या नावाचा आधार लागतोय”; एकनाथ शिंदेंचा टोला
13
५०-१०० नव्हे, पाकिस्तानच्या तुरुंगात तब्बल 'इतके' भारतीय कैद! पहिल्यांदाच झाला मोठा खुलासा
14
"हार्डवेअर चांगलं होतं पण सॉफ्टवेअर खराब...", शेफाली जरीवालाच्या मृत्यूबाबत रामदेव बाबांचं वक्तव्य
15
धक्कादायक! प्रेमी युगुलाने ऑटोत घेतला गळफास; तरुणीचे लग्न ठरल्याने उचलले टोकाचे पाऊल
16
महाराष्ट्रात आजपासून वाहनांवरील नवीन करप्रणाली लागू; सीएनजी असो की पेट्रोल किंवा डिझेल... एवढा कर...
17
मंडीमध्ये ढगफुटीमुळे प्रचंड नुकसान; घरं, रस्ते, पूल गेले वाहून, ४ जणांचा मृत्यू, १६ बेपत्ता
18
Viral Video: इंदूरचा सुवर्ण महाल!! वॉश बेसिन ते इलेक्ट्रिक स्विच... सारं काही २४ कॅरेट सोन्यानं मढवलेलं...
19
बाजारात शांतता! गुंतवणूकदारांची 'वेट अँड वॉच'ची भूमिका; रिलायन्स-एचडीएफसीसह 'हे' शेअर्स वधारले
20
भारतापासून १४ हजार किलोमीटर दूर 'या' देशात राहतात असंख्य भारतीय! दरवर्षी साजरी होते दिवाळी

उपाशीपोटी मजुरांची ३०० किमीची पायपीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2020 20:42 IST

गावातही कोणी प्रवेश देत नव्हते : आंबे व धवली गावातील प्रत्येकी ६ कष्टकऱ्यांची आपबीती

सुनील साळुंखेशिरपूर : तालुक्यातील आंबे येथील सहा मजुर रोजगारानिमित्त नगर जिल्ह्यातील अरूणगाव येथे गेले होते. मात्र २४ मार्च रोजी देशात लॉकडाऊन झाल्याने, काम बंद झाले. अरूणगावहून गावी येण्यासाठी कुठलेही वाहन नसल्याने, त्यांनी चक्क दोन दिवस उपाशीपोटी जवळपास ३०० किलोमीटरचा पायी प्रवास करून गाव गाठले. एवढे करुनही गावातही त्यांना कोणी घुसू देत नव्हते़ त्यांना गाववेशीजवळच १४ दिवस थांबण्याचा सल्ला देण्यात आलेला आहे़ ही आपबिती कथन केली आहे आंबे येथील सहा मजुरांनी.शिरपूर तालुक्यातील आदिवासी नागरिक पोटाची खळगी भरण्यासाठी राज्यातील कानाकोपºयात व शेजारील गुजरात राज्यात देखील मजुरीसाठी निघून जातात. यावर्षीही कित्येक मजूर बाहेरगावी गेलेत. कोरोनाच्या प्रभावाने नगर जिल्ह्यातून तीनशे किमीची उपाशीपोटी पायपीट करून आंबे येथील सहा मजूर घरी परतले. प्राप्त माहितीनुसार तालुक्यातील आंबे येथील सहा मजूर विजेचे खांब गाडण्याच्या कामासाठी नगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील अरूणगाव येथे कामाला गेले होते. दरम्यान कोरोना महामारीच्या विळख्यात कामच बंद पडले. काम नसल्याने त्यांची उपासमार सुरू झाली. त्याचवेळी ठेकेदारानेही त्यांना वाºयावर सोडले. शेवटी आंबे येथील सहा व मध्य प्रदेशातील धवली येथील सहा अशा बारा मजुरांनी पायीच घरी येण्याचा निर्णय घेतला. आणि तेथूनच सुरू झाली त्यांची नरकयातना.पायी प्रवासा दरम्यान त्यांना कोणत्याही गावाने गावात येवू दिले नाही. त्यामुळे त्यांच्या जेवणाबरोबरच पाणी मिळणेही मुश्किल झाले. रात्री ओसाड शेतात तास - दोन तास आराम करून पायी प्रवास सुरूच ठेवला. केवळ बिस्कीटच्या सहाºयावर जवळपास तीनशे किमीची पायपीट करत अखेर सांगवी गाठले.या मजुरांनी व्यक्त केली आपबीतीभारसिंग सरदार पावरा, बन्सीलाल नाना पावरा, सुमाºया नंदलाल पावरा, राधेशाम धरमसिंग पावरा, सुनिल नानला पावरा, कुमाºया गीला पावरा या मजुरांचा समावेश आहे़ आठ दिवसांपूर्वीच ते विजेचे खांब गाडण्याच्या कामासाठी नगरजिल्ह्यातील अरूणगाव पोहचले होते. जावून फक्त तीनच दिवस काम केल्यानंतर लगेच संचारबंदी लागली़ रात्री फक्त तास दोन तास झोपून दिवस रात्र एक करत ४ ते ५ दिवसांत पायी चालून त्यांनी घर गाठले. मार्गावरील गावात लोकांनी साधे पाणी पिण्यासाठी घुसू दिले नाही, त्यामुळे मार्गावर लागणारी शेत, वा मिळेल तिथे थांबून पाणी पीत होते़ जेवणाचे हाल झाले़ जेवण कुठेच मिळाले नाही त्यामुळे सोबत घेतलेले बिस्कीट खाऊन दिवस काढलेत अशी आपबिती त्यांनी कथन केली़ सांगवी गावाजवळ आल्यानंतर सरपंच मुकेश पावरा यांनी वाहनातून घरी सोडले़

टॅग्स :Dhuleधुळे