शहरं
Join us  
Trending Stories
1
Congress: ठाकरेंना मोठा धक्का! काँग्रेसची 'एकला चलो'ची घोषणा; मुंबई महानगरपालिका स्वबळावर लढणार
2
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
3
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
4
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
5
एका वर्षात तिसरी वेळ! भारताच्या शेजारी देशात सापडली तब्बल १००० टन सोन्याची खाण, कोणता आहे देश?
6
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज कराडात! सातारा जिल्ह्यामधील महाविकास आघाडी बाबत होणार निर्णय?
7
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
8
दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
9
IPL 2026 : अय्यरसह मसल पॉवर रसेल OUT! मिनी लिलावासाठी शाहरुखच्या KKR च्या पर्समध्ये सर्वाधिक पैसा
10
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
11
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
12
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
13
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
14
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
15
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
16
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
17
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
18
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
19
Ravindra Jadeja : जड्डूनं केली विक्रमांची 'बरसात'! WTC मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना बाधित रूग्ण आढळल्याने ५ दिवस जनता कर्फ्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2020 11:59 IST

नेर : सर्वपक्षीय बैठकीत घेण्यात आला निर्णय, अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार राहणार बंद

लोकमत न्यूज नेटवर्कनेर : धुळे तालुक्यातील नेर येथे ५ कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्यामुळे गावात खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय बैठकीत १२ ते १६ आॅगस्टपर्यंत जनता कर्फ्यूचा निर्णय घेण्यात आला आहे. या काळात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद राहणार आहे.मंगळवारी पॉझिटिव्ह आलेल्या पाच रुग्णांच्या संपर्कातील ३६ जणांचे स्वॅब घेतल्यानंतर त्यांना नेर येथे होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. शासकीय रुग्णालयात २० तर खाजगी लॅबला १६ जणांचे स्वॅब घेण्यात आले आहेत. सकाळी ग्रामपंचायत आवारात सर्वपक्षीय बैठकीत वाढत्या रुग्ण्संख्येवर चिंता व्यक्त करण्यात आली. तसेच पाच दिवस सर्व व्यवहार बंद करण्याचे आवाहन करण्यात आले.मंगळवारी रात्री उशिरा आलेल्या अहवालात नेर गावातील ५ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाल्याने गावात खळबळ उडाली आहे. यामुळे गावात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीने गावात पाच दिवासांसाठी जनता कर्फ्यू लागू केला आहे. यात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने, अस्थापना बंद राहणार असून नियमांचा भंग करणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा सरपंच शंकर खलाणे यांनी दिला आहे.नेर गाव हे धुळे-सुरत महामार्गावरील बाजारपेठेचे गाव आहे. यामुळे गावाची लोकसंख्याही अधिक आहे. सुरुवातीपासून कोरोनाबाबत खबरदारी घेण्यात येत असतानाच कोरोनाने गावात शिरकाव केला आहे. एका हॉटेल व्यवसायिकाच्या आईला कोरोना झाल्यानंतर गावात एक ते दोन कोरोना रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर गावाने कोरोनावर मात केली होती. त्यानंतर पुन्हा दोन ते तीन रुग्ण आढळून आले होते. तसेच एका खासगी डॉक्टरलाही कोरोनाची लागण झाली होती. तरीही अनेक नागरिक हे मास्क न लावणे, फिजिकल डिस्टन्सिंग न पाळणे, बाहेरगावी अनावश्यक प्रवास करीत आहेत. त्यामुळेच पुन्हा गावात कोरोनाने जोरदार शिरकाव केला आहे. आता पाच जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. यामुळे गावात खळबळ उडाली असून नागरिकांनी घाबरून न जाता स्वत: सह कुटुंबाची काळजी घेऊन घरातच सुरक्षित रहावे. तसेच कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.नेर गावात पाच जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने ग्रामपंचायतीने अधिकच खबरदारीच्या उपाययोजना राबविण्यास सुरुवात केली आहे. गावाची लोकसंख्या अधिक असल्याने कोरोनाचा संसर्ग अधिक फैलू नये म्हणून ग्रामपंचायतीने गाव पाच दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. १२ ते १६ आॅगस्टपर्यंत गाव बंद ठेवण्यात येणार आहे.यात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद करण्यात आले आहे. सकाळी ८ ते दुपारी १२ वाजेपर्यंत किराणा दुकान सुरू राहतील. ग्रामपंचायत सरपंच, सदस्य, पोलिस पाटील, पोलिस कर्मचारी, वैद्यकीय अधिकारी, आरोग्य विभाग आणि सामाजिक कार्यकर्ते हे गावात लक्ष ठेवून राहणार असून कोणी नियमांचे उल्लंघन केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांसह व्यावसायिकांनी नियमांचे पालन करावे. अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा ग्रामपंचायतीच्यावतीने देण्यात आला आहे.