शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: रशियाच्या समुद्राखाली शक्तीशाली भूकंप! कुरील आयलंडवर त्सुनामी; अमेरिका, जपान, न्यूझीलंडसह जगाला धोका
2
मुख्यमंत्री अतिशय उद्विग्न, मंत्र्यांना सज्जड दम; बेशिस्त खपवून घेणार नाही, २० मिनिटे खडेबोल
3
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
4
भारताने लवकर व्यापार करार करावा, अन्यथा २५% टॅरिफ लादू! डोनाल्ड ट्रम्प यांची पुन्हा धमकी
5
लाडकी बहीण योजनेत पुरुष कसे काय घुसले?: मुख्यमंत्री, ‘लोकमत’च्या वृत्ताचे मंत्रिमंडळ बैठकीत पडसाद
6
एकही चूक न करायच्या अटीवर कोकाटेंना अभय, मंत्रिपद टेम्पररी, दर १५ दिवसांनी आढावा: अजित पवार
7
‘ऑपरेशन सिंदूर’ थांबवा, असे जगातील कोणत्याही नेत्याने सांगितले नाही: पंतप्रधान नरेंद्र मोदी
8
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका टप्प्याटप्प्याने घेणार; आधी जिल्हा परिषद, नंतर मनपा होणार
9
ठाकरे बंधुंना सलामी दिली, प्रो-गोविंदा स्पर्धेतून बाहेर; जय जवान पथक व्यवस्थापकांचा आरोप
10
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याविरूद्ध अनिल परबांनी दिले पुरावे; CM फडणवीसांकडे सादर
11
आजी-माजी खासदार आमने-सामने; विचारेंना मानसोपचार तज्ज्ञांची गरज; तर म्हस्के ‘वाचाळ रत्न’!
12
गणेशोत्सवासाठी ST सज्ज; ५,२०० जादा बस उपलब्ध करून देण्याचे नियोजन सुरू, मुंबईतून ६०० बस
13
उंचीच्या सक्तीमुळे उडणार मंडळांची धांदल; दोन विसर्जनस्थळे गाठण्यासाठी कसरत
14
वसई-विरार पालिकेचे माजी आयुक्त ईडीच्या कचाट्यात; सोमवारी निरोपाचा सत्कार, मंगळवारी धाड
15
लोकलमध्ये बसल्यावर मिळते तिकीट; UTSचा गैरवापर, QR कोड सुविधा बंद करण्यासाठी रेल्वेला पत्र
16
AI, कॉम्प्युटर इंजिनीअरिंगच्या साडेचार हजार जागा वाढल्या; प्रवेशासाठी १ लाख ७६ हजार जागा
17
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
18
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
19
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
20
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी

धुळ्यातील भुयारी गटारींसाठी महापालिकेवर पडणार ४३ कोटींचा भार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2017 17:18 IST

जीवन प्राधिकरणाकडून १० कोटी अंमलबजावणी शुल्क, मंगळवारी ठराव होणार

ठळक मुद्देभुयारी गटारींसाठी १३१ कोटी ५४ लाख रूपयांचा निधी मंजूरमहासभेत भुयारी गटार योजना जीवन प्राधिकरणाकडे पूर्ण ठेव तत्वावर वर्ग करण्याचा ठराव केला जाईल मनपा प्रशासनाकडून  नियोजन सुरू 

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे :  केंद्र शासनाच्या अमृत योजनेंतर्गत शहरातील भुयारी गटारींसाठी १३१ कोटी ५४ लाख रूपयांचा निधी मंजूर झाला आहे़ मात्र ही योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत राबविण्याचे आदेश शासनाने दिल्यामुळे ३३ कोटी रूपयांच्या स्वहिश्श्यासह १० कोटी रूपयांचे मजीप्रा इटीपी चार्जेस भरावे लागणार आहेत़ एकूण ४३ कोटी रूपयांची तजवीज मनपाला करावी लागणार आहे़केंद्र शासन पुरस्कृत अमृत योजनेंतर्गत शहरात मलनिस्सारण अर्थात भुयारी गटार योजना राबविण्यासाठी राज्य शासनाने पहिल्या टप्प्यात १३१ कोटी ५४ लाख रूपयांच्या निधीला मंजूरी दिली आहे़ योजना अचानक वर्गभुयारी गटार योजनेसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या सल्ल्याने महापालिकेने काढलेली ई-निविदा स्विकारण्याची मुदत २७ नोव्हेंबर होती़ मुदत आठ दिवसांवर आली असतांनाच अचानक राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने ही योजना पूर्ण ठेव तत्वावर जीवन प्राधिकरणाकडे सोपविण्याचा निर्णय घेतला आहे़ तसे आदेश महापालिकेला प्राप्त झाले आहेत़ शासनाचे पत्र आल्यानंतर आयुक्तांनी तत्काळ ई-निविदा प्रक्रिया रद्द केली असून योजना मजीप्राकडे वर्ग करण्याची कार्यवाही सुरू आहे़ मंगळवारी होणार ठरावशासनाच्या पत्रात महासभेचा ठराव सादर करण्याचेही आदेश असल्याने मंगळवारी २८ नोव्हेंबरला आयोजित महासभेत भुयारी गटार योजना जीवन प्राधिकरणाकडे पूर्ण ठेव तत्वावर वर्ग करण्याचा ठराव केला जाणार आहे़ सदर योजना मनपातर्फे राबविण्यात आली असती तर तांत्रिक सल्लागार म्हणून प्रकल्प किमतीच्या ३ टक्केप्रमाणे मजीप्राला शुल्क द्यावे लागणार होते़ मात्र, आता योजना मजीप्राकडे पूर्ण ठेव तत्वावर वर्ग होत असल्याने त्यासाठी मजीप्राला इटीपी चार्जेससाठी एकूण प्रकल्प किमतीच्या ७़५ टक्के रक्कम द्यावी लागणार आहे़ ही रक्कम ९ कोटी ८६ लाख रुपयांपर्यंत जाते़ मनपा हिस्सा व इतर अनुषंगिक शुल्काची आकारणी झाल्यास योजनेपोटी मनपाला सुमारे ४३ कोटींपेक्षा अधिक रक्कमेचा भार उचलावा लागणार आहे़ मनपा प्रशासनाकडून त्याबाबतचे नियोजन सुरू असले तरी सलग दुसरी योजना मजीप्राकडे वर्ग होत असल्याने महासभेत वादळी चर्चा होण्याची शक्यता आहे़निधीचे विभाजन असेभुयारी गटार योजनेसाठी केंद्र शासनाकडून प्रकल्प किमतीच्या ५० टक्के म्हणजे ६५ कोटी ७७ लाख रूपये व राज्य शासनाकडून २५ टक्के अर्थात ३२ कोटी ८८ लाख ५० हजार रूपयांचा निधी मिळणार आहे़ तर प्रकल्प किमतीच्या २५ टक्के सहभाग महापालिकेचा असणार असून ती रक्कम ३२ कोटी ८८ लाख ५० हजार इतकी आहे़ तर मजीप्राला द्यावे लागणारे शुल्क ९ कोटी ८६ लाख इतके  आहे़