शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा आरक्षण सुनावणी होणार जलद; हायकोर्टात विशेष पूर्णपीठ स्थापन; SCच्या आदेशानंतर पाऊल
2
अफगाणिस्तानला भारताचा मदतीचा हात! अटारी मार्गे केली विशेष मदत; पाकिस्तानला दाखवून दिले
3
आजचे राशीभविष्य १७ मे २०२५ : नोकरदारांना नोकरीत लाभ होईल, जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस
4
भारताला हवेत हाफिज सईद, मसूद अझहर, दाऊद इब्राहिम; मोस्ट वाँटेडची यादी पाकला सोपवणार
5
‘सेलेबी’ला काम नको; आयबीचा होता इशारा, सुरक्षेविषयी नवीन प्रश्न निर्माण होण्याची भीती
6
भारत आता पाकिस्तानवर ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ करणार; ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती जगात पोहोचवणार
7
आगळीक करू नका, ‘ऑपरेशन सिंदूर’ हा फक्त ट्रेलर, गरज पडल्यास पूर्ण ‘पिक्चर’ दाखवू: राजनाथ सिंह
8
अफगाणिस्तानातून पाकची जलकोंडी होण्याची शक्यता; शाहतूत धरणास भारताचे आर्थिक, तांत्रिक सहकार्य
9
‘८६४७’ म्हणजे थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा संदेश? जेम्स कॉमी यांच्या पोस्टमुळे खळबळ
10
मध्य प्रदेशच्या मंत्र्यानंतर आता उपमुख्यमंत्र्यांचेही विधान चर्चेत; काँग्रेसची भाजपावर टीका
11
पाक समर्थक तुर्की, अझरबैजानशी  कोणताही व्यापार, पर्यटन नाही; भारतीय व्यापाऱ्यांचा बहिष्कार
12
“तणावाच्या पार्श्वभूमीवर तुर्की, अझरबैजानसोबत करार करू नका”; याआधीचे करार रद्द करायचा निर्णय
13
मुंबईत तळ ठोकून असणाऱ्या २५० बांगलादेशींना घरचा रस्ता; २ दिवसांत पोलिसांची मोठी धडक कारवाई
14
राजकीय नेत्यांना चढला महापालिका निवडणुकीचा ज्वर! स्थानिक प्रश्नांकडे लक्ष, भेटीगाठी सुरू
15
...आता सहपोलिस आयुक्त गुप्तवार्ता; आयपीएस डॉ. आरती सिंह यांच्याकडे जबाबदारी
16
तिन्ही मार्गावर मुंबईत उद्या ‘मेगा ब्लॉक डे’; पश्चिम, मध्य, हार्बरवरील वेळापत्रक कसे असेल?
17
मुंबई सेंट्रल स्थानकावर पहिले डिजिटल लाउंज; केवळ प्रवासी नाही तर नागरिकांनाही लाभ मिळणार
18
दारूच्या नशेत बेभान कंटेनर चालकाने वाहनांसह २० नागरिकांना उडविले; बीडमधील थरार, महिला ठार
19
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर
20
पाकला आणखी एक दणका! अफगाणिस्तानातून मिळणारे पाणीही थांबणार? भारताची पावले उचलण्यास सुरुवात

शेतकरी अपघात विमा योजनेचेे ४१ प्रस्ताव आठ महिन्यांपासून प्रलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 04:34 IST

. नवीन याेजना सुरू हाेऊन चार महिने झाले तरी अद्यापही नवीन विमा कंपनीची नियुक्ती नसल्याने या प्रकरणाबाबत काेणताही निर्णय ...

. नवीन याेजना सुरू हाेऊन चार महिने झाले तरी अद्यापही नवीन विमा कंपनीची नियुक्ती नसल्याने या प्रकरणाबाबत काेणताही निर्णय हाेऊ शकलेला नाही. प्रस्तावावर काेणताही निर्णय न झाल्याने संबंधित शेतकरी, त्यांचा परिवार या याेजनेच्या लाभापासून वंचित आहेत.

शेतकऱ्यांना काम करताना हाेणारे अपघात आणि शेतात सर्पदंश, शाॅक लागणे आदी विविध कारणांमुळे अपघात अथवा मृत्यू झाल्यास त्याच्या परिवाराला मदत मिळावी या उद्देशाने शासनाकडून गाेपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा याेजना राबवण्यात येते. संबंधित याेजनेचा लाभ विमा कंपनीमार्फत शेतकरी व त्याच्या परिवाराला दिला जाताे. या याेजनेत अपघाती मृत्यू अथवा पूर्णत: अपंगत्व आल्यास दाेन लाख रुपये तर एक हात, एक पाय अथवा अर्ध अंगास अपंगत्व आल्यास एक लाखापर्यंतची मदत केली जाते. गेल्या वर्षी त्याची मुदत डिसेंबरमध्ये संपली. त्यानंतर काेराेना व इतर कारणामुळे नवीन याेजना सुरू हाेऊ शकली नाही. मात्र एप्रिलपासून नवीन याेजना सुरू झाली आहे..

२०१९-२०२०ची शेतकरी अपघात विमा प्रस्ताव व मंजुरीची आकडेवारी

विमा कंपनीकडे १२२ प्रस्ताव दाखल, विभागाकडे प्रलंबित ४१ प्रस्ताव, विमा कंपनीकडून ५६ मंजूर प्रस्ताव, नामंजूर केलेले १५ प्रस्ताव आहेत.

योजनेचा काेणाला मिळताे फायदा

राज्यातील सर्व वहितीधारक खातेदार शेतकरी व शेतकऱ्यांच्या कुटुंबातील वहितीधारक खातेदार म्हणून नाेंद नसलेले काेणतेही एक सदस्य (आई-वडील), शेतकऱ्यांची पती,पत्नी, मुलगा व अविवाहित मुलगी यापैकी काेणतेही एका व्यक्ती असे १० ते ७५ वयाेगटातील एकूण २ जणांना अपघाती विमा संरक्षण एक शेतकरी व एक शेतकऱ्याच्या कुटुंबातील व्यक्तींना दिला जाताे, अशी माहिती कृषी अधीक्षक कार्यालयाने दिली.

१२२ पैकी ५६ प्रस्ताव मंजूर; १० प्रकरणे प्रलंबित

शेतकरी अपघात विमा याेजनेसाठी २०१९-२०२० या काळात ॲानलाइन १२४ जणांकडून नाेंदणी केली हाेती. त्यापैकी १२२ प्रस्ताव कृषी विभागाला प्राप्त झाले. त्यातील ५६ प्रकरणे विमा कंपनीकडून मंजूर झाले हाेते. तर १५ प्रस्ताव विविध कारणामुळे विमा कंपनीकडून नाकारले हाेते. तर १० प्रकरणे अद्यापही विमा कंपनीकडे प्रलंबित आहेत.

शेतकरी याेजनेत समाविष्ट अपघाताचे प्रकार असे

रस्ता, रेल्वे अपघात, पाण्यात बुडून मृत्यू, विषबाधा, विजेचा धक्का, वीज पडून मृत्यू,सर्पदंश, खून, उंचावरून पडून मृत्यू, नक्षलवाद्यांकडून हत्या, जनावरांचा हल्ला अथवा चावा घेतल्याने येणारा मृत्यू, दंगल आदी अपघाती घटनांमुळे शेतकऱ्यास मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास विमाद्वारे आर्थिक लाभ मिळू शकताे.

नवीन याेजना ७ एप्रिल २०२१ ते ६ एप्रिल २०२२ या काळासाठी राबवण्यात येत आहे. मात्र आताच हंगामाला सुरुवात झाली आहे. आता त्यासंदर्भातील प्रस्ताव येतील, त्याबाबत पडताळणी करून व कागदपत्रांची पूर्तता असणाऱ्या प्रस्तावांना याेजनेचा लाभ विमा कंपनीकडून मिळवून दिला जाईल असेही कृषी कार्यालयातून सांगण्यात आले.