शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी अपघात विमा योजनेचेे ४१ प्रस्ताव आठ महिन्यांपासून प्रलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 04:34 IST

. नवीन याेजना सुरू हाेऊन चार महिने झाले तरी अद्यापही नवीन विमा कंपनीची नियुक्ती नसल्याने या प्रकरणाबाबत काेणताही निर्णय ...

. नवीन याेजना सुरू हाेऊन चार महिने झाले तरी अद्यापही नवीन विमा कंपनीची नियुक्ती नसल्याने या प्रकरणाबाबत काेणताही निर्णय हाेऊ शकलेला नाही. प्रस्तावावर काेणताही निर्णय न झाल्याने संबंधित शेतकरी, त्यांचा परिवार या याेजनेच्या लाभापासून वंचित आहेत.

शेतकऱ्यांना काम करताना हाेणारे अपघात आणि शेतात सर्पदंश, शाॅक लागणे आदी विविध कारणांमुळे अपघात अथवा मृत्यू झाल्यास त्याच्या परिवाराला मदत मिळावी या उद्देशाने शासनाकडून गाेपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा याेजना राबवण्यात येते. संबंधित याेजनेचा लाभ विमा कंपनीमार्फत शेतकरी व त्याच्या परिवाराला दिला जाताे. या याेजनेत अपघाती मृत्यू अथवा पूर्णत: अपंगत्व आल्यास दाेन लाख रुपये तर एक हात, एक पाय अथवा अर्ध अंगास अपंगत्व आल्यास एक लाखापर्यंतची मदत केली जाते. गेल्या वर्षी त्याची मुदत डिसेंबरमध्ये संपली. त्यानंतर काेराेना व इतर कारणामुळे नवीन याेजना सुरू हाेऊ शकली नाही. मात्र एप्रिलपासून नवीन याेजना सुरू झाली आहे..

२०१९-२०२०ची शेतकरी अपघात विमा प्रस्ताव व मंजुरीची आकडेवारी

विमा कंपनीकडे १२२ प्रस्ताव दाखल, विभागाकडे प्रलंबित ४१ प्रस्ताव, विमा कंपनीकडून ५६ मंजूर प्रस्ताव, नामंजूर केलेले १५ प्रस्ताव आहेत.

योजनेचा काेणाला मिळताे फायदा

राज्यातील सर्व वहितीधारक खातेदार शेतकरी व शेतकऱ्यांच्या कुटुंबातील वहितीधारक खातेदार म्हणून नाेंद नसलेले काेणतेही एक सदस्य (आई-वडील), शेतकऱ्यांची पती,पत्नी, मुलगा व अविवाहित मुलगी यापैकी काेणतेही एका व्यक्ती असे १० ते ७५ वयाेगटातील एकूण २ जणांना अपघाती विमा संरक्षण एक शेतकरी व एक शेतकऱ्याच्या कुटुंबातील व्यक्तींना दिला जाताे, अशी माहिती कृषी अधीक्षक कार्यालयाने दिली.

१२२ पैकी ५६ प्रस्ताव मंजूर; १० प्रकरणे प्रलंबित

शेतकरी अपघात विमा याेजनेसाठी २०१९-२०२० या काळात ॲानलाइन १२४ जणांकडून नाेंदणी केली हाेती. त्यापैकी १२२ प्रस्ताव कृषी विभागाला प्राप्त झाले. त्यातील ५६ प्रकरणे विमा कंपनीकडून मंजूर झाले हाेते. तर १५ प्रस्ताव विविध कारणामुळे विमा कंपनीकडून नाकारले हाेते. तर १० प्रकरणे अद्यापही विमा कंपनीकडे प्रलंबित आहेत.

शेतकरी याेजनेत समाविष्ट अपघाताचे प्रकार असे

रस्ता, रेल्वे अपघात, पाण्यात बुडून मृत्यू, विषबाधा, विजेचा धक्का, वीज पडून मृत्यू,सर्पदंश, खून, उंचावरून पडून मृत्यू, नक्षलवाद्यांकडून हत्या, जनावरांचा हल्ला अथवा चावा घेतल्याने येणारा मृत्यू, दंगल आदी अपघाती घटनांमुळे शेतकऱ्यास मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास विमाद्वारे आर्थिक लाभ मिळू शकताे.

नवीन याेजना ७ एप्रिल २०२१ ते ६ एप्रिल २०२२ या काळासाठी राबवण्यात येत आहे. मात्र आताच हंगामाला सुरुवात झाली आहे. आता त्यासंदर्भातील प्रस्ताव येतील, त्याबाबत पडताळणी करून व कागदपत्रांची पूर्तता असणाऱ्या प्रस्तावांना याेजनेचा लाभ विमा कंपनीकडून मिळवून दिला जाईल असेही कृषी कार्यालयातून सांगण्यात आले.