शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
5
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
6
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
7
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
9
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
10
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
11
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
12
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
13
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
14
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
16
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
18
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
19
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर

‘अवकाळी’चा ३ हजार हेक्टरला फटका; सर्वाधिक नुकसान शिंदखेडा तालुक्यात

By अतुल जोशी | Updated: March 15, 2023 18:23 IST

अवकाळी पाऊस, वादळीवारा, गारपीटीमुळे झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्याचा अंतिम अहवाल तयार करण्यात आला आहे.  

धुळे - जिल्ह्यात ४ ते ८ मार्च २०२३ दरम्यान झालेल्या अवकाळी पाऊस, वादळीवारा, गारपीटीमुळे झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्याचा अंतिम अहवाल तयार करण्यात आला आहे.  यात जिल्ह्यात रब्बी हंगामाचे २ हजार ८५९.५८ व फळपिकाचे ९०.३९ असे एकूण २ हजार ९४९.९७ हेक्टर क्षेत्रावरील पिकांना फटका बसला असून, बाधित शेतकऱ्यांची संख्या ६२८१ असल्याचे नमूद केले आहे. दरम्यान नुकसान भरपाईसाठी ४ कोटी २ लाख ३१ हजार रूपयांच्या निधीची मागणी करण्यात आलेली आहे.

४ ते ८ मार्च दरम्यान जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस व गारपीट झाली होती. या अवकाळीमुळे गहू, हरभरा, मका, बाजरी या रब्बी तसेच  केळी, पपई, डाळींब, आंबा या फळ पिकांचे  पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. अवकाळी व गारपीटीमुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला होता.

अवकाळीचा सर्वात जास्त फटका शिंदखेडा तालुक्याला बसलेला आहे. या तालुक्यात ६४ गावांमध्ये २९३२ शेतकऱ्यांचे १ हजार ५५५६.१५ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झालेले आहे. त्या खालोखाल साक्री तालुक्यात ३० गावातील १८२३ शेतकऱ्यांचे  ८१५ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झालेले आहे. शिरपूर तालुक्यात ७३ गावांमध्ये १५२४ शेतकऱ्यांचे ५७७ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आलेले आहे. तर सर्वात कमी अर्थात नगण्य नुकसान धुळे तालुक्यात झालेले आहे. या तालुक्यात केवळ दोन गावांमध्ये दोन शेतकऱ्यांचे १.२० हेक्टर क्षेत्रावरील फक्त पपई पिकाचे नुकसान झाल्याचे नमूद करण्यात आलेले आहे.

 

टॅग्स :Dhuleधुळे