शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

‘अवकाळी’चा ३ हजार हेक्टरला फटका; सर्वाधिक नुकसान शिंदखेडा तालुक्यात

By अतुल जोशी | Updated: March 15, 2023 18:23 IST

अवकाळी पाऊस, वादळीवारा, गारपीटीमुळे झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्याचा अंतिम अहवाल तयार करण्यात आला आहे.  

धुळे - जिल्ह्यात ४ ते ८ मार्च २०२३ दरम्यान झालेल्या अवकाळी पाऊस, वादळीवारा, गारपीटीमुळे झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्याचा अंतिम अहवाल तयार करण्यात आला आहे.  यात जिल्ह्यात रब्बी हंगामाचे २ हजार ८५९.५८ व फळपिकाचे ९०.३९ असे एकूण २ हजार ९४९.९७ हेक्टर क्षेत्रावरील पिकांना फटका बसला असून, बाधित शेतकऱ्यांची संख्या ६२८१ असल्याचे नमूद केले आहे. दरम्यान नुकसान भरपाईसाठी ४ कोटी २ लाख ३१ हजार रूपयांच्या निधीची मागणी करण्यात आलेली आहे.

४ ते ८ मार्च दरम्यान जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस व गारपीट झाली होती. या अवकाळीमुळे गहू, हरभरा, मका, बाजरी या रब्बी तसेच  केळी, पपई, डाळींब, आंबा या फळ पिकांचे  पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. अवकाळी व गारपीटीमुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला होता.

अवकाळीचा सर्वात जास्त फटका शिंदखेडा तालुक्याला बसलेला आहे. या तालुक्यात ६४ गावांमध्ये २९३२ शेतकऱ्यांचे १ हजार ५५५६.१५ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झालेले आहे. त्या खालोखाल साक्री तालुक्यात ३० गावातील १८२३ शेतकऱ्यांचे  ८१५ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झालेले आहे. शिरपूर तालुक्यात ७३ गावांमध्ये १५२४ शेतकऱ्यांचे ५७७ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आलेले आहे. तर सर्वात कमी अर्थात नगण्य नुकसान धुळे तालुक्यात झालेले आहे. या तालुक्यात केवळ दोन गावांमध्ये दोन शेतकऱ्यांचे १.२० हेक्टर क्षेत्रावरील फक्त पपई पिकाचे नुकसान झाल्याचे नमूद करण्यात आलेले आहे.

 

टॅग्स :Dhuleधुळे