शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
१ रुपया द्या आणि एसी घ्या, नव्या GST दरांवर सुरू केलं बुकिंग; ग्राहकांना खेचण्यासाठी कंपन्यांमध्ये स्पर्धा
4
'स्पोर्टिंग क्लब'च्या निवडणुकीत शिंदेसेनेला शह देण्यासाठी झाली भाजपा-मनसे-उद्धवसेनेची युती
5
TVS Success Story: इंग्रजांसमोर हार मानली नाही, बँकेची नोकरी सोडून सायकल रिपेरिंगचं काम सुरू केलं; आज आहे ₹१,६६,२०० कोटींची कंपनी
6
पुतण्या तलावात बुडाला, वाचवण्यासाठी चुलतीसह भावाची पाण्यात उडी, शेवट भयंकर!
7
१२ वर्षांच्या संसाराची काडीमोड! लोकप्रिय टीव्ही अभिनेत्याचा घटस्फोट, बायकोशी असलेलं नातं मोडलं
8
Crime: ट्यूशनसाठी गेली, नंतर तुकड्या-तुकड्यांमध्ये मिळाला मुलीचा मृतदेह; आईवडिलांचा आक्रोश, शिक्षकानेच...
9
पितृपक्ष २०२५: स्वतःचे आणि कुटुंबाचे पिंडदान केल्यावरच नागा साधू बनता येते; सविस्तर वाचा
10
आईकडे संपत्ती नसली, तरीही मुलांच्या संगोपनाचा तिला हक्क; जम्मू-काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाचा निर्णय
11
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
12
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
13
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
14
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
15
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
16
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
17
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
18
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
19
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
20
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल

पहिली ते चौथीच्या विध्यार्थ्यांना मिळणार वर्गोन्नती; कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे परीक्षा झाल्या नाहीत, पुढच्या वर्गात प्रवेश मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:38 IST

कोरोनाची पहिली लाट ओसरल्यानंतर शाळा सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. त्यात सुरुवातीला महाविद्यालये सुरू करण्यात आली. त्यानंतर माध्यमिक ...

कोरोनाची पहिली लाट ओसरल्यानंतर शाळा सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. त्यात सुरुवातीला महाविद्यालये सुरू करण्यात आली. त्यानंतर माध्यमिक व त्यानंतर शेवटच्या टप्प्यात प्राथमिक शाळा सुरू करण्यात आल्या होत्या. शाळा सुरू झाल्यानंतर मात्र जिल्ह्यात व राज्यात सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला होता. अनेक शिक्षकांना कोरोनाची बाधा झाली होती. तसेच काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांनाही बाधा झाल्याच्या घटना घडल्या होत्या. तसेच कोरोनाची दुसरी लाट अतिशय तीव्र झाल्याने शाळा बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. शाळा बंद झाल्याने विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबले तसेच त्यांच्या परीक्षाही होऊ शकल्या नाहीत. त्यामुळे पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना थेट पुढच्या वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. मात्र, विद्यार्थ्यांच्या प्रगती पुस्तकावर वर्गोन्नती असा उल्लेख येणार का याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. विद्यार्थ्यांना वर्गोन्नती द्यावी असे पत्रात म्हटले आहे. मात्र, तसा उल्लेख प्रगती पुस्तकावर करण्याबाबतच्या सूचना प्राप्त झाल्या नसल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली. दरम्यान, वर्षभरापासून शाळा बंद असल्याने घरी राहून विद्यार्थीही कंटाळले आहेत. घरकामात तसेच शेतीच्या कामात विद्यार्थी मदत करत आहेत. कोरोनाचा संसर्ग लवकर संपून शाळा सुरू होण्याची अपेक्षा विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे.

प्रगती पुस्तकच बदलणार-

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने शाळा बंद होत्या तसेच यंदा परीक्षाच झाल्या नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांना थेट पुढच्या वर्गात प्रवेश देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना वर्गोन्नत करावे अशा आशयाचे पत्र शिक्षण विभागाला प्राप्त झाले आहे. दरवर्षी प्रगती पुस्तकावर येणारी श्रेणी यावेळी येणार नाही. त्यामुळे प्रगती पुस्तकच बदलणार आहे. प्रगती पुस्तकावर वर्गोन्नत उल्लेख करण्याबाबत सूचना नसल्याची माहिती मिळाली.

मुले घरात कंटाळली-

शाळा बंद असल्याने नुकसान होत आहे; पण काेरोना वाढल्याने शाळा बंद झाल्या आहेत. त्यामुळे सद्या घरीच अभ्यास करतो. कोरोना संपून शाळा लवकर सुरू झाल्या पाहिजेत.

- पूजा कोळी, वाडी

इयत्ता चौथी

यंदा परीक्षा झाल्या नाहीत; पण पुढील वर्गात प्रवेश मिळणार असल्याचे शिक्षकांनी सांगितले आहे. काेरोना संपून शाळा लवकर सुरू व्हायला पाहिजे.

-

वर्षभरापासून शाळा बंद असल्याने घरी राहून कंटाळा आला आहे. ऑनलाईन अभ्यासासोबतच घरी व शेतात मदत करत आहे.

- आरुषी धनगर, वाडी

इयत्ता तिसरी

शिक्षण अधिकारी :

पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना वर्गोन्नत करावे याबाबत शासनाने सूचना केल्या आहेत. मात्र, प्रगती पुस्तकावर वर्गोन्नत असा उल्लेख करण्याबाबत कोणत्याही सूचना मिळालेल्या नाहीत. त्याबाबतच्या सूचना मिळाल्यानंतर शिक्षकांना मार्गदर्शन केले जाईल.

मनीष पवार, शिक्षण अधिकारी