शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
2
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
3
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
4
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
5
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
6
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
7
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
8
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
9
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
10
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
11
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
12
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
13
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
14
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
15
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
16
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
17
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
18
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
19
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे

कामगारांचे थकीत १८ कोटी अद्याप मिळाले नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:34 IST

१९७० च्या दशकात पांझरा कान साखर कारखाना चालला. ऊस, पाणी, मनुष्यबळ याची मुबलकता असल्याने, काही काळातच हा कारखाना भरभराटीस ...

१९७० च्या दशकात पांझरा कान साखर कारखाना चालला. ऊस, पाणी, मनुष्यबळ याची मुबलकता असल्याने, काही काळातच हा कारखाना भरभराटीस आला होता. या कारखान्यामुळे अनेकांना रोजगार मिळाला होता. १९९६ पर्यंत हा कारखाना चांगल्या स्थितीत चालला. मात्र चुकीच्या व्यवस्थापनामुळे २६ जानेवारी २००१ला शेतकऱ्यांची सत्ता असलेला कारखाना बंद पडला. त्यामुळे शेतकऱ्यांसह कामगारही पोरके झाले. कारखाना बंद पडला, तेव्हा या कारखान्यात जवळपास ७५० कामगार कामावर होते. दरम्यान, १९९६ ते २००२ या कालावधीचा कामगारांना पगारच मिळालेला नाही. कामगारांचा हक्काचा पैसा मिळावा, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांपासून मुख्यमंत्र्यांपर्यंत हा प्रश्न मांडला गेला. मात्र कामगारांना अद्याप त्यांचा पगार मिळाला नाही. कारखान्याकडून कामगारांचे १८ कोटी रुपये अद्यापही मिळालेले नाहीत.

पगार मिळेल या आशेवर कामगार होते; मात्र ७५० पैकी सुमारे ४०० कामगार आतापर्यंत मृत झालेले आहेत, तर पाचजणांनी आत्महत्या केलेल्या आहेत. आज जे कामगार हयात आहेत, त्याची परिस्थिती अतिशय हलाकीची आहे. त्यामुळे या कामगारांना त्यांच्या हक्काचा पैसा मिळावा, अशी मागणी होत आहे. जाेपर्यंत कारखान्याची विक्री होत नाही, तापर्यंत कामगारांचे पगार मिळणे अवघडच आहे.

कारखाना विक्रीचे दोन प्रयत्न अयशस्वी

n हा कारखाना विक्रीचा आतापर्यंत दोनवेळा प्रयत्न झाला. कारखाना कार्यक्षेत्रातील उसाची उपलब्धता, ऊस उत्पादक व कामगार यांचे आग्रही भूमिका बघता मे. सित सन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, डोंबिवली या कंपनीने भाडेतत्त्वावर चालविण्याचा करार केला होता. परंतु शिखर बँकेने त्यावेळेस अडेलतट्टूची भूमिका घेतल्याने हा कारखाना सुरू होऊ शकला नाही. त्यावेळेस जर कारखाना सुरू झाला असता, तर शिखर बँकेचे कर्जही फिटले असते व तालुका सुजलाम सुफलाम झाला असता.

n त्यानंतर नाशिक जिल्ह्यातील द्वारकाधीश साखर कारखान्याने हा कारखाना १२ कोटी ५१ लाख रुपयांमध्ये विकत घेतला होता. परंतु अटी-शर्तीच्या विसंगतीमुळे साखर आयुक्त, पुणे यांनी हरकत घेतल्याने तोही प्रयत्न यशस्वी झाला.