शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
8
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

१६४ शेतकरी आत्महत्या; ६९ जणांची सरकारी निकष न पाळताच अखेर,

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:35 IST

धुळे : पहिल्या शेतकरी आत्महत्येला आज ३५ वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने शेतकरी आत्महत्या आणि पीडित कुटुंबांना मिळणारी ...

धुळे : पहिल्या शेतकरी आत्महत्येला आज ३५ वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने शेतकरी आत्महत्या आणि पीडित कुटुंबांना मिळणारी मदत हे मुद्दे पुन्हा ऐरणीवर आले आहेत.

धुळे जिल्ह्यात शेतकरी आत्महत्यांचा आलेख चढता आहे तर मदतीचा आलेख मात्र उतरता आहे. सन २०१९ मध्ये ९९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या. त्यापैकी केवळ ६२ पीडित कुटुंबांना मदत मिळाली आणि ३७ कुटुंब मदतीसाठी अपात्र ठरली. तर गेल्या वर्षी ६५ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्यापैकी केवळ २४ पीडित कुटुंब मदतीसाठी पात्र ठरले आहेत. तब्बल ३२ कुटुंब मदतीसाठी अपात्र ठरली आहेत. ९ प्रकरणे फेर चाैकशीसाठी प्रलंबित असून लवकरच ही प्रकरणे निकाली निघणार आहेत. याचाच अर्थ जिल्ह्यात दोन वर्षांत ०० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असल्या तरी ०० शेतकऱ्यांच्या कुटुंबांना मदत न मिळाल्यामुळे या शेतकऱ्यांची सरकारी निकष न पाळताच अखेर झाली आहे असेच म्हणावे लागेल. पात्र ठरलेल्या प्रकरणांमध्ये एक लाखाची आर्थिक मदत मिळते.

शेतकरी आत्महत्येनंतर पीडित कुटुंबांना कोणतेही निकष न लावता सरसकट एक लाखाची मदत देण्याची घोषणा तत्कालीन युती शासनाने केली होती. परंतु ही घोषणा हवेतच विरली आहे. त्यामुळे अनेक कुटुंब मदतीपासून वंचित आहेत.

मदतीसाठीचे निकष

नापिकी, दुष्काळ, कर्जबाजारीपणा आणि कर्जवसुलीसाठी तगादा अशा कारणांमुळे शेतकऱ्याने आत्महत्या केली असेल, तरच त्याचे पीडित कुटुंब मदतीसाठी पात्र ठरते. महसूल, पोलीस आणि कृषी विभागाचा अहवाल त्यामध्ये महत्त्वाचा ठरतो. पोलिसांचा अभिप्राय, शवविच्छेदन अहवाल, नापिकीचे कारण असले तर कृषी खात्याचा अहवाल, कर्जबाजारीपणा असेल तर कर्जाचा तपशील आणि वसुलीसाठी तगादा लावल्याचे पुरावे.

चिंचखेडे ता. साक्री : येथे प्रकाश सुकदेव बेडसे वय ५० यांनी डिसेंबर २०१६ मध्ये त्यांच्या पाठोपाठ त्यांचा मुलगा सतीश वय २० याने २८ ऑगस्ट २०१७ रोजी आत्महत्या केली. नापिकी, लाल्या रोग, कांदा सडला तसेच सावकार व बँकांचे कर्ज असल्याने या पिता पुत्राने जीवनयात्रा संपवली. शवविच्छेदन अहवालासह धुळ्याला जाऊन कागदपत्रांची पूर्तता करण्याइतकेही पैसे या कुटुंबाकडे नसल्याने हे कुटुंब मदतीपासून वंचित आहे. मोठा मुलगा आणि आईचा तीन बिघे जमिनीवर उदरनिर्वाह सुरू आहे.

तऱ्हाडी, ता. शिरपूर : येथे गोविंदराव गुलाबराव भामरे यांनी २७ डिसेंबर २०१६ मध्ये आत्महत्या केली. केवळ २ एकर अल्प शेतजमिनीवर त्यांची पत्नी अतिशय संघर्षाने संसाराचा गाडा हाकते आहे. एका मुलाने फायर सेफ्टीचा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे तर एक मुलगा सध्या त्याच कोर्सला आहे. एका मुलीचे लग्न झाले. कर्जमाफी नाही, रेशनचे धान्य नाही, निराधार योजनेचा लाभ नाही. शासकीय योजना या पीडित कुटुंबापर्यंत पोहोचलीच नाही. तहसील कार्यालयाकडून केवळ शिवण यंत्र मिळाले आहे.