शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

गतवर्षापेक्षा 15 पट मिरचीची आवक वाढली

By admin | Updated: February 2, 2017 01:03 IST

दोंडाईचा बाजार समितीत गतवर्षापेक्षा सुमारे 15 पट मिरचीची आवक वाढली असून यंदा 59 हजार 786 क्विंटल मिरचीची आवक आहे.

दोंडाईचा :  नगदी पीक म्हणून  ओळखल्या जाणा:या  कापसाला अपेक्षेपेक्षा कमी भाव मिळाल्याने दोंडाईचा परिसरात मिरचीचे  क्षेत्र वाढले आहे. निसर्गाची कृपा व अन्य  बाजार समिती क्षेत्रातील शेतकरी दोंडाईचा बाजार समितीकडे वळल्याने दोंडाईचा बाजार समितीत गतवर्षापेक्षा  सुमारे 15 पट मिरचीची आवक वाढली असून यंदा 59 हजार 786 क्विंटल मिरचीची आवक आहे. गेल्यावर्षी  म्हणजे 2015-16 या आर्थिक वर्षात 3 हजार 888 क्विंटल  म्हणजे  एक कोटी 15 लाख 33 हजार 940 रुपयांची उलाढाल झाली आहे. तर या वर्षी 59 हजार 786 क्विंटल मिरचीची  आवक  झाली असून उलाढाल 12 कोटी 63 लाख 77 हजार 860 रुपयांची उलाढाल झाली आहे. येथील बाजारात मिरचीला सुरुवातीला 1700 ते 1800 रु. प्रतिक्विंटल भाव होता. नंतर आवक वाढली तर भाव सुद्धा वाढले असून सध्या 2966 रु. प्रतिक्विंटल भाव मिरचीला मिळत आहे.दोंडाईचा कृषी उत्पन्न बाजार समिती मिरचीच्या उलाढालीत आघाडीवर आहे. येथील मिरची उद्योग प्रसिद्ध आहे. दोंडाईचा परिसरात मिरचीचे उत्पादन मोठय़ा प्रमाणात घेतले जाते.           दोंडाईचा येथील मिरची भारतासह इराण, इराक, सौदी अरेबियाला पाठवली जात असे. परंतु मध्यंतरी मिरची उत्पादन व मिरची उद्योगालाही घरघर लागली होती. बाजार समितीत मोठय़ा प्रमाणात आवक वाढल्याने मिरची उद्योगातून शेकडो अकुशल  कामगारांना रोजगार मिळाला आहे. दोंडाईचा शहराच्या पूर्व दिशेला म्हणजे शिंदखेडा रस्त्यावर मिरचीच्या पथारी आहेत. या पथारीवर शेकडो कामगारांना रोजगार मिळाला आहे. काही वर्षापासून निसर्गाची अवकृपा, अवकाळी पाऊस यामुळे मिरचीवर रोगाचा प्रादुर्भाव झाला होता. बुरशीजन्य रोगामुळे  मिरचीचे उत्पादन घटले होते. बदलत्या हवामानामुळे शेतकरीही मिरची लागवड टाळत होता. बियाणे  महाग त्यामुळे उत्पादन खर्चही निघत नसल्याची तक्रार होती. त्यामुळे साहजिकच मिरची उत्पादन घटले होते. महत्त्वाचे म्हणजे दोंडाईचा परिसरातील शेतकरी कापूस लागवडीपासून लांब जात आहे. कापूस नगदी पीक म्हणून ओळखले जात असले तरी कापसाला अपेक्षित भाव न मिळाल्याचे शेतक:यांचे म्हणणे आहे. पैसेही रोख मिळाले नाहीत.   त्यामुळे शेतकरी साहजिकच कापसापासून दूर गेला. बागायतची सोय असलेला शेतकरी मिरची लागवडकडे वळला आहे.    वर्ष        आवक    2010-11      21 हजार 865 क्विंटल    2011-12      40 हजार 386 क्विंटल    2012-13      32 हजार 652 क्विंटल    2013-14      16 हजार 335 क्विंटल     2014-15      4 हजार 649 क्विंटल    2015-16      3 हजार 888 क्विंटल2016-17 यावर्षी आतापावेतो 59 हजार 786 क्विंटल मिरचीची आवक झाली आहे. गत वर्षापेक्षा तब्बल 15 पट मिरचीची आवक  वाढली असल्याची माहिती बाजार समिती चेअरमन नारायण पाटील, सचिव पंडित पाटील यांनी दिली आहे.