शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

शेतकऱ्यांना १३५ कोटींचे कर्जवाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2020 01:01 IST

नाशिक : राज्य शासनाने महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेतून जिल्हा बँकेला दिलेल्या निधीतून बँकेने चालू वर्षासाठी खातेदार शेतकऱ्यांना पीककर्ज वाटप करण्याचा निर्णय घेतला असून, त्यासाठी शासनाने ४३७ कोटी रुपयांचा लक्ष्यांक दिला आहे. आजपर्यंत बँकेने १३५ कोटी रुपयांचे कर्जवाटप केले आहे. दरम्यान, पीककर्जासाठी शेतकºयांनी सहकारी सोसायट्यांशी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा बँकेने केले आहे.

ठळक मुद्दे४३७ कोटींचा लक्ष्यांक : जिल्हा मध्यवर्ती बॅँकेची वसुलीसाठी परतफेड योजना

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : राज्य शासनाने महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेतून जिल्हा बँकेला दिलेल्या निधीतून बँकेने चालू वर्षासाठी खातेदार शेतकऱ्यांना पीककर्ज वाटप करण्याचा निर्णय घेतला असून, त्यासाठी शासनाने ४३७ कोटी रुपयांचा लक्ष्यांक दिला आहे. आजपर्यंत बँकेने १३५ कोटी रुपयांचे कर्जवाटप केले आहे. दरम्यान, पीककर्जासाठी शेतकºयांनी सहकारी सोसायट्यांशी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा बँकेने केले आहे.नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची पीककर्ज आढावा बैठक नुकतीच झाली. राज्य शासनाने महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेतून बँकेला प्राप्त झालेल्या निधीतून जिल्हा बँकेच्या एक लाख तीन हजार थकबाकीदार शेतकºयांच्या कर्जखात्यात जमा केली आहे.शासनाने जिल्हा बँकेला खरीप पीककर्ज वाटपासाठी ४३७ कोटी रुपयांचा लक्ष्यांक दिला असून, त्यानुसार बँकेने खरीप पीककर्ज वाटपास सुरुवात केली आहे. जे शेतकरी सभासद पीककर्जासाठी पात्र आहेत, त्यांनी विविध कार्यकारी सेवा सोसायटीत संपर्क साधावा व आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करण्याचे आवाहन केले आहे.तसेच जिल्हा बँकेकडे नियमित कर्ज परतफेड करणाºया व पात्र शेतकºयांना पुरेशा निधीअभावी मागील काळात कर्जवाटप करता आलेले नाही. त्या पात्र शेतकरी सभासदांना कर्ज वितरण करण्याचे आदेश जिल्हा बँकेचे अध्यक्ष केदा आहेर यांनी दिले.जुनी थकबाकी वसुलीसाठी बँकेने नवीन सामोपचार कर्ज परतफेड योजना-२०२० जाहीर केली असून, सदर योजनेत थकबाकीदारांसाठी भरघोस सवलत देऊ केलेली असल्याने जास्तीत जास्त थकबाकीदारांनी सदर योजनेचा लाभ घेऊन बँकेस सहकार्य करण्याचे आवाहन बँकेने केले आहे. या योजनेतून प्राप्त होणारी वसुलीची रक्कमदेखील बँक कर्जवाटपासाठी करणार असल्याचे म्हटले आहे.सहकारी संस्थांकडून कागदपत्रांची पूर्तताबँकेला महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेच्या माध्यमातून निधी प्राप्त झाले असून, खरीप कर्जवाटपाला गती येत आहे. राज्य सरकारने सांगितल्याप्रमाणे पीककर्जासाठी पात्र ठरलेल्या शेतकºयांना कर्ज देण्यास सुरुवात झाली असून, आजपर्यंत बँकेने १३५ कोटी रुपयांचे कर्जवाटप केले आहे. बँकेस खरीप पीककर्जासाठी शासनाने ठरवून दिलेला लक्ष्यांक पूर्ण करायचा असल्याने पात्र शेतकरी सभासदांनी संबंधित विविध कार्यकारी सहकारी संस्थेमार्फत आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करण्याचे आवाहन आहेर यांनी केले आहे.पात्र कर्जदारांना कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी बँकेच्या विभागीय अधिकाºयांच्या अध्यक्षतेखाली तालुकानिहाय कर्मचाºयांची नियुक्ती केली आहे. कर्जवाटपास पात्र व नियमित कर्ज भरणाºया शेतकºयांना कर्ज उपलब्ध करून दिले जाईल.- केदा आहेर, अध्यक्ष, जिल्हा बँक

टॅग्स :Farmerशेतकरीbankबँक