शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
2
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
3
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
4
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
5
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
6
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
7
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
8
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
9
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
10
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
11
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
12
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
13
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
14
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
15
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
16
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
17
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
18
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
19
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
20
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."

शेतकऱ्यांना १३५ कोटींचे कर्जवाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2020 01:01 IST

नाशिक : राज्य शासनाने महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेतून जिल्हा बँकेला दिलेल्या निधीतून बँकेने चालू वर्षासाठी खातेदार शेतकऱ्यांना पीककर्ज वाटप करण्याचा निर्णय घेतला असून, त्यासाठी शासनाने ४३७ कोटी रुपयांचा लक्ष्यांक दिला आहे. आजपर्यंत बँकेने १३५ कोटी रुपयांचे कर्जवाटप केले आहे. दरम्यान, पीककर्जासाठी शेतकºयांनी सहकारी सोसायट्यांशी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा बँकेने केले आहे.

ठळक मुद्दे४३७ कोटींचा लक्ष्यांक : जिल्हा मध्यवर्ती बॅँकेची वसुलीसाठी परतफेड योजना

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : राज्य शासनाने महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेतून जिल्हा बँकेला दिलेल्या निधीतून बँकेने चालू वर्षासाठी खातेदार शेतकऱ्यांना पीककर्ज वाटप करण्याचा निर्णय घेतला असून, त्यासाठी शासनाने ४३७ कोटी रुपयांचा लक्ष्यांक दिला आहे. आजपर्यंत बँकेने १३५ कोटी रुपयांचे कर्जवाटप केले आहे. दरम्यान, पीककर्जासाठी शेतकºयांनी सहकारी सोसायट्यांशी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा बँकेने केले आहे.नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची पीककर्ज आढावा बैठक नुकतीच झाली. राज्य शासनाने महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेतून बँकेला प्राप्त झालेल्या निधीतून जिल्हा बँकेच्या एक लाख तीन हजार थकबाकीदार शेतकºयांच्या कर्जखात्यात जमा केली आहे.शासनाने जिल्हा बँकेला खरीप पीककर्ज वाटपासाठी ४३७ कोटी रुपयांचा लक्ष्यांक दिला असून, त्यानुसार बँकेने खरीप पीककर्ज वाटपास सुरुवात केली आहे. जे शेतकरी सभासद पीककर्जासाठी पात्र आहेत, त्यांनी विविध कार्यकारी सेवा सोसायटीत संपर्क साधावा व आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करण्याचे आवाहन केले आहे.तसेच जिल्हा बँकेकडे नियमित कर्ज परतफेड करणाºया व पात्र शेतकºयांना पुरेशा निधीअभावी मागील काळात कर्जवाटप करता आलेले नाही. त्या पात्र शेतकरी सभासदांना कर्ज वितरण करण्याचे आदेश जिल्हा बँकेचे अध्यक्ष केदा आहेर यांनी दिले.जुनी थकबाकी वसुलीसाठी बँकेने नवीन सामोपचार कर्ज परतफेड योजना-२०२० जाहीर केली असून, सदर योजनेत थकबाकीदारांसाठी भरघोस सवलत देऊ केलेली असल्याने जास्तीत जास्त थकबाकीदारांनी सदर योजनेचा लाभ घेऊन बँकेस सहकार्य करण्याचे आवाहन बँकेने केले आहे. या योजनेतून प्राप्त होणारी वसुलीची रक्कमदेखील बँक कर्जवाटपासाठी करणार असल्याचे म्हटले आहे.सहकारी संस्थांकडून कागदपत्रांची पूर्तताबँकेला महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेच्या माध्यमातून निधी प्राप्त झाले असून, खरीप कर्जवाटपाला गती येत आहे. राज्य सरकारने सांगितल्याप्रमाणे पीककर्जासाठी पात्र ठरलेल्या शेतकºयांना कर्ज देण्यास सुरुवात झाली असून, आजपर्यंत बँकेने १३५ कोटी रुपयांचे कर्जवाटप केले आहे. बँकेस खरीप पीककर्जासाठी शासनाने ठरवून दिलेला लक्ष्यांक पूर्ण करायचा असल्याने पात्र शेतकरी सभासदांनी संबंधित विविध कार्यकारी सहकारी संस्थेमार्फत आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करण्याचे आवाहन आहेर यांनी केले आहे.पात्र कर्जदारांना कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी बँकेच्या विभागीय अधिकाºयांच्या अध्यक्षतेखाली तालुकानिहाय कर्मचाºयांची नियुक्ती केली आहे. कर्जवाटपास पात्र व नियमित कर्ज भरणाºया शेतकºयांना कर्ज उपलब्ध करून दिले जाईल.- केदा आहेर, अध्यक्ष, जिल्हा बँक

टॅग्स :Farmerशेतकरीbankबँक