शहरं
Join us  
Trending Stories
1
आशिया चषक जिंकल्यावर मध्यरात्रीच बीसीसीआयची मोठी घोषणा; खजिना रिता केला..., पाकिस्तानींना काय मिळाले...
2
"राहुल गांधींच्या छातीत गोळ्या घालू", भाजप प्रवक्त्याचे टीव्हीवरील चर्चेत विधान, काँग्रेसचे अमित शाहांना पत्र
3
नेपाळचे माजी पंतप्रधान ओली यांना काठमांडू सोडण्यास मनाई, पासपोर्ट निलंबित, देखरेखीखाली ठेवले
4
पाकिस्तानचा कर्णधार दहशतवाद्यांना, मसूद अझहरला मॅच फी दान करणार; तशी घोषणाच केली...
5
भारतीय सैन्य अन् पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबांना सर्व मॅचची फी देणार; सूर्यकुमार यादवची घोषणा
6
या नालायकांबरोबर युती करणार नाही; शिंदेसेनेच्या आमदाराची अजितदादांच्या राष्ट्रवादीवर बोचरी टीका
7
शेअर बाजाराची मजबूत सुरुवात: सेन्सेक्स १३६ अंकांनी वधारला, निफ्टी २४,७०० च्या जवळ; हे स्टॉक्स तेजीत
8
"वडिलांची जागा मी कधीच घेऊ शकत नाही, पण..."; ठाकरेंच्या आमदाराने घेतले श्वेताचे पालकत्व 
9
Tata Capital IPO: गुंतवणूकीसाठी अवघे काही दिवस शिल्लक, टाटा कॅपिटलनं सेट केला प्राईज बँड; GMP पण सुस्साट, पाहा डिटेल्स
10
मुंब्रा अपघात काळ्या बॅगेमुळेच! तीन महिन्यांच्या चौकशी अहवालात कारण स्पष्ट
11
कोण आहेत मोहसिन नकवी? जे टीम इंडियाची ट्रॉफी घेऊन पळून गेले; 'ऑपरेशन सिंदूर'वेळी भारताविरोधात...
12
तुमची मुलगी म्हणेल Thank You! या ६ बेस्ट स्कीम्स देतील जबरदस्त नफा, ५ नंबरच्या स्कीमनं तर पक्कं होईल तिचं भविष्य सुरक्षित
13
संतापजनक! आधी मारहाण, नंतर शाळेच्या खिडकीला उलटे टांगले; ७ वर्षाच्या मुलावर क्रूरता
14
'४ वर्षांपूर्वीपासून...', सोनम वांगचुकच्या पाकिस्तान कनेक्शनवर त्याची पत्नी गीतांजली वांगचुक काय म्हणाल्या?
15
सोशल मीडियावरील ती पोस्ट! ...अन् टीम इंडियानं अख्ख्या जगासमोर घेतला पाक मंत्र्याचा बदला
16
IND vs Pak: "अभिषेक बच्चन चांगला खेळलास", भारताने आशिया कप जिंकल्यानंतर बिग बींचा शोएब अख्तरला टोला
17
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
18
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
19
"आता प्रायश्चित्त घेण्याची वेळ, दसरा मेळावा रद्द करून..."; भाजपाची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
20
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान

धुळे तालुक्यातील १२०० शेतकऱ्यांची होणार पीक प्रात्यक्षिकासाठी निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:27 IST

धुळे : कृषी विभागाच्या विविध योजनांतर्गत पीक प्रात्यक्षिकांसाठी धुळे तालुक्यातील १२०० शेतकऱ्यांची निवड करण्यात येणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी ६ ...

धुळे : कृषी विभागाच्या विविध योजनांतर्गत पीक प्रात्यक्षिकांसाठी धुळे तालुक्यातील १२०० शेतकऱ्यांची निवड करण्यात येणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी ६ जूनपर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी जी. के. चौधरी यांनी केले आहे.

कृषी विभागाच्या माध्यमातून सन २०२१-२२ या वर्षासाठी पीक प्रात्यक्षिक राबविण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज मागविण्यात आले होते. त्यासाठी २४ मेपर्यंत मुदत देण्यात आली होती. आता ही मुदत वाढविण्यात आली आहे. पीक प्रात्यक्षिकांसाठी समूह पद्धतीने अंमलबजावणी अपेक्षित असल्याने एका गावातून १० हेक्टर क्षेत्रासाठी प्रति प्रात्यक्षिक ०.४० हेक्टर क्षेत्राचे म्हणजेच २५ लाभार्थी प्रति समूह शेतकरी निवड करण्यात येईल.

या वर्षासाठी पीक प्रात्यक्षिक राबविण्याकरिता राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान व गळीत धान्य अंतर्गत पीकनिहाय अर्ज अपेक्षित आहेत. योजनानिहाय पीक प्रात्यक्षिकाचे प्रकार असे (अनुक्रमे योजनेचे नाव, पीक प्रात्यक्षिक प्रकार, पिकाचे नाव, लक्ष्यांक (हेक्टरमध्ये), अपेक्षित शेतकरी संख्या) : राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान (कडधान्य), अ- सलग गट प्रात्यक्षिके, तूर, १०, २५, मूग, ३० (हेक्टर), २५ (शेतकरी), उडीद, १० (हेक्टर), २५ (शेतकरी). ब- पीक पद्धतीवर आधारित प्रात्यक्षिके, मूगनंतर गहू, १०, २५.

राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान (पौष्टिक तृणधान्य), सलग गट प्रात्यक्षिके, खरीप ज्वारी, १०, २५, खरीप बाजरी, ३००, ७५०. राष्ट्रीय अन्नसुरक्षा (भरड धान्य), सलग पीक प्रात्यक्षिक, मका, १००, २५०. राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानांतर्गत कापूस विकास कार्यक्रम, आद्य रेषीय प्रात्यक्षिके (कापूस पिकात आंतरपीक मूग, उडीद), कापूस-मूग-उडीद, १०, २५.

वरीलप्रमाणे ज्या गावांतून १० हेक्टर क्षेत्रासाठी अर्ज प्राप्त होतील, त्या गावांना प्राधान्य राहील. धुळे तालुक्यातील जे शेतकरी पीक प्रात्यक्षिकात भागात घेऊ इच्छितात त्यांनी तालुक्यातील कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षक किंवा मंडळ कृषी अधिकारी यांच्याकडे ६ जूनपर्यंत अर्ज सादर करावेत. त्यानंतर प्राप्त अर्जांमधून ७ जून रोजी लॉटरी पद्धतीने शेतकऱ्यांची निवड करण्यात येईल. निवड झालेल्या शेतकऱ्यांना निविष्ठा वितरणाची कार्यवाही करण्यात येईल, अशी माहिती तालुका कृषी अधिकारी चौधरी यांनी दिली.