शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

धुळे जिल्ह्यातील १० हजार दुधाळ जनावरांना मिळाले ‘आधार’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2017 12:04 IST

पशुसंवर्धन विभागाचा उपक्रम, पहिल्या टप्यात ३७ हजार जनावरांना बिल्ला देणार

ठळक मुद्देजिल्ह्यात दुधाळ गायी-म्हशींची संख्या ८९ हजार ४४पहिल्या टप्यात ३७ हजार जनावरांना टॅगिंग केले जाणारपशुसंवर्धन विभागाचा उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : जनावरांची ओळख होण्यासाठी केंद्र शासनाने पशुसंजीवनी योजना सुरू केलेली आहे. आधारप्रमाणेच जनावरांनाही बारा अंकी युनिक कोड देण्यात येत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १० हजार ११४ दूधाळ गायी-म्हशींना टॅग (बिल्ला) लावण्यात आल्याची माहिती पशुसंवर्धन विभागातर्फे देण्यात आली. देशभरातील जनावरांना स्वत:ची ओळख मिळवून देण्याचे काम केंद्र सरकारच्या ‘नॅशनल मिशन आॅफ बोव्हाईन प्रॉडक्टीव्हिटी’ या योजनेंतर्गत करण्यात येत आहे. यानुसार जनावरांना युनिक आयडेंटीफिकेशन कोड असलेला फायबरचा टॅग लावण्यात येत आहे. यामाध्यमातून जनावरांची सर्व माहिती शासनाला एक क्लिकवर उपलब्ध होऊ शकणार आहे.२०१२च्या १९ व्या पशुगणणेनुसार जिल्ह्यात दुधाळ गायी-म्हशींची एकूण  संख्या ८९ हजार ०४४ आहे. यात दूधाळ गायींची संख्या ५४ हजार ९१५ तर  म्हशींची संख्या ३४ हजार १२९ एवढी आहे.  पहिल्या टप्यात ३७ हजार गायी-म्हशींना टॅगिंग केले जाणार आहे.  त्यापैकी आतापर्यंत १० हजार ११४ जनावरांना बिल्ला लावण्यात आलेला आहे. यात ६ हजार ४८४ गायी तर ३ हजार ६३० म्हशींचा समावेश आहे. उर्वरित जनावरांना बिल्ला लावण्याचे काम सुरू असल्याचे सांगण्यात आले.इत्यंभूत माहिती मिळणारया नवीन योजनेनुसार जनावरांनाही आधारकार्डाप्रमाणेच १२ अंकी युनिक आयडी कोड मिळणार आहे. संगणकावर हा आकडा टाकल्यास, जनावराच्या मालकाचे नाव, गाव, ते जनावर कुठल्या जातीचे आहे, दूध किती देते, लसीकरण कधी झाले आदींची इत्यंभूत माहिती मिळण्यास मदत होणार आहे. जनावरांची खरेदी-विक्री करतांना, शासकीय योजना देतांनाही याचा लाभ होणार आहे.