शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Blast: २ वर्षांपासून सुरू होता स्फोटकं जमवण्याचा जीवघेणा खेळ; डॉ शाहीन शाहिदची कबुली
2
प्रशांत किशोर यांची भविष्यवाणी खरी होणार? बिहार निवडणुकीच्या एक्झिट पोलने केले शिक्कामोर्तब!
3
Tata घराण्यात मोठा बदल, नोएल टाटांच्या मुलाला मिळाली मोठी जबाबदारी; परदेशातून घेतलंय शिक्षण
4
एके-47 ठेवणाऱ्या डॉ. शाहीनचे थेट महाराष्ट्राशी कनेक्शन; जैशच्या महिला विंगची निघाली मास्टरमाईंड
5
“जनतेची काम करतो म्हणून प्रत्येक समाज घटक ८-८ लाखाच्या फरकाने निवडून देतात”: अजित पवार
6
एकही रुपया न गुंतवता दरवर्षी कमावू शकता ₹२.८८ लाख; पाहा PPF च सीक्रेट, लोकही विचारतील कसं केलं?
7
धर्मेंद्र यांना रुग्णालयातून डिस्चार्ज; सनी देओलच्या टीमने दिलं स्टेटमेंट, 'त्यांचं तुमच्यावर..."
8
Govinda Hospitalised : ६१ वर्षीय गोविंदाची अचानक तब्येत बिघडली, झाला बेशुद्ध, जुहूच्या रुग्णालयात दाखल
9
ATP Finals 2025: खेळ पाहण्यासाठी आलेल्या दोन चाहत्यांचा मृत्यू, क्रीडाविश्वात शोक!
10
इंजिनीअरिंग, फार्मसी, एमबीएची सीईटी वर्षातून दोनदा, यंदा एप्रिलमध्ये पहिली, तर मेमध्ये दुसरी सीईटी परीक्षा
11
महायुतीच्या त्सुनामीमुळे विरोधकांत भीती, आशिष शेलार यांचा टोला
12
आजचे राशीभविष्य, १२ नोव्हेंबर २०२५: आजचा दिवस आनंदी; पण 'या' राशीला स्त्रीमुळे अडचणीचा धोका
13
पोस्टरमुळे समोर आला डॉक्टरांचा दहशतवादी कट; स्फोटकांचा तपास यशस्वी, पण दिल्लीत कशी झाली चूक?
14
Delhi Blast: दिल्ली बॉम्बस्फोटावर पाकिस्ताननं काय म्हटलं? तुर्कीनं तर हद्द ओलांडली!
15
Dharmendra Health Update: धर्मेंद्र यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज, डॉक्टरांनी दिले हेल्थ अपडेट
16
‘व्हाइट कॉलर’ दहशतवादाचा दिल्ली बॉम्बस्फोटामागे हात, एनआयए करणार तपास; कार चालवणारा पुलवामाचा डॉक्टर
17
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
18
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
19
एक्झिट पोलमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत; बिहारमध्ये पुन्हा नितीश, महाआघाडी सत्तेपासून दूरच; १४ नाेव्हेंबरला प्रत्यक्ष निकाल
20
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त

१६ केंद्रांवर हरभरा खरेदी शून्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:32 IST

लोकमत न्यूज नेटवर्क उस्मानाबाद : केंद्र शासनाच्या आधारभूत किमतीनुसार २०२०-२१ या वर्षासाठी जिल्ह्यातील दि महाराष्ट्र को-ऑप मार्केटिंग फेडरेशनच्यावतीने २१ ...

लोकमत न्यूज नेटवर्क

उस्मानाबाद : केंद्र शासनाच्या आधारभूत किमतीनुसार २०२०-२१ या वर्षासाठी जिल्ह्यातील दि महाराष्ट्र को-ऑप मार्केटिंग फेडरेशनच्यावतीने २१ हरभरा नोंदणी व खरेदी केंद्र निश्चित केली आहेत. मात्र, या केंद्रांपैकी १६ केंद्रांवर अद्यापही खरेदीला सुरुवात झालेली नाही तर ५ केंद्रांवर १ हजार ८०० क्विंटल हरभऱ्याची खरेदी झाली आहे.

जिल्ह्यात यावर्षी ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात परतीचा दमदार पाऊस झाला होता. या पावसामुळे खरिपातील पिके शेतकऱ्यांच्या हातची गेली होती. मात्र, दुसरीकडे प्रकल्पात पाणीसाठा वाढल्याने रब्बी हंगामातील पाण्याचा प्रश्न मिटला. मुबलक पाणी व पोषक वातावरण असल्याने अनेक शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील पेरणी उरकून घेतल्या. ज्वारी, गव्हासोबतच हरभऱ्याचाही पेरा केला. निसर्गाच्या कृपेने हरभरा पीक चांगले आले. कष्टाने पिकवलेल्या मालाला चांगला भाव मिळेल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना असते. केंद्र शासनाने आधारभूत किमतीनुसार हरभऱ्याला ५ हजार १०० रुपये दर निश्चित केला. शेतकऱ्यांना हरभरा विक्रीसाठी २१ केंद्र कार्यान्वितही केली आहेत. या केंद्रांवर १५ फेब्रुवारीपासून नोंदणीला सुरुवात झाली असून, आतापर्यंत ६ हजार ५६४ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. यापैकी ३ हजार ३३२ शेतकऱ्यांना संदेश प्राप्त झाले आहेत. २१ केंद्रांपैकी १६ केंद्रांवर अद्याप खरेदी झालेली नाही तर ५ केंद्रांवर १ हजार ८०० क्विंटल हरभऱ्याची खरेदी झाली आहे.

चौकट...

केंद्र शासनाने हरभऱ्याला ५ हजार १०० रुपये हमीभाव निश्चित केला आहे. आडतीवर ४ हजार ७०० ते ४ हजार ८०० रुपये भाव मिळत आहे. मात्र, अनेक शेतकरी केंद्रावर पैसे मिळण्यास विलंब होत असल्याने शिवाय चाळणी व हमालीसाठी अधिक पैसे मोजावे लागत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. आडतीवर क्विंटलला तीनशे ते चारशे रुपयाने कमी भाव मिळत असला, तरी लवकर पैसे मिळत असल्याचे सांगण्यात आले.

तक्रारी असतील तर संपर्क साधावा

जिल्ह्यातील खरेदी केंद्रांवर चाळणीसाठी अधिकचे शुल्क, हमालीचे जादा पैसे मागितल्यास जिल्हा मार्केटिंग अधिकारी कार्यालयाशी शेतकऱ्यांनी संपर्क साधून तक्रार देण्याचे आवाहन या कार्यालयाकडून करण्यात आले आहे.

कोट...

जिल्ह्यात २१ हरभरा खरेदी केंद्र सुरु करण्यात आली आहेत. १५ फेब्रुवारीपासून ऑनलाईन नोंदणीला प्रारंभ झाला आहे. शासनाने हरभऱ्याला ५ हजार १०० रुपये दर निश्चित केला आहे. शेतकऱ्यांनी त्वरित नावनोंदणी करुन घ्यावी, संदेश प्राप्त झाल्यानंतर नजीकच्या केंद्रावर हरभरा विक्रीसाठी घेऊन यावा.

- व्ही. एच. वाचपेयी, जिल्हा मार्केटिंग अधिकारी