शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर प्रदेशमध्ये मतदार यादीतून तब्बल २.८९ कोटी लोकांची नावं वगळणार, SIRबाबत धक्कादायक माहिती समोर 
2
‘सर्व भारतीयांना अमेरिकेतून बाहेर काढा, अन्यथा…’, अमेरिकन पत्रकाराचं वादग्रस्त विधान   
3
पळवा पळवी! पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमानंतर लोकांनी कुंड्या, होर्डिंग आणि पुतळे पळवले   
4
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
5
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
6
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
7
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
8
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
9
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
10
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
11
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
12
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
13
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
14
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
15
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
16
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
17
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
18
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
19
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
20
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

योग्य व्यवस्थापनातून घेतले हेक्टरी ६५ क्विंटल उत्पादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:21 IST

पाथरूड : पारंपरिक शेतीला फाटा देत आधुनिक पद्धतीने नियोजनबद्ध शेती केल्यास थोड्याबहुत पाण्यातही ऊस पिकाइतके पैसे ज्वारीसारख्या अवघ्या ...

पाथरूड : पारंपरिक शेतीला फाटा देत आधुनिक पद्धतीने नियोजनबद्ध शेती केल्यास थोड्याबहुत पाण्यातही ऊस पिकाइतके पैसे ज्वारीसारख्या अवघ्या चार महिन्यांच्या पिकातून मिळू शकतात, हेच भूम तालुक्यातील आनंदवाडी येथील शेतकरी नीलेश खामकर यांनी दाखवून दिले आहे. ठिंबक सिंचनाचा वापर करून त्यांनी एकरी २६ क्विंटल म्हणजेच हेक्टरी ६५.५० क्विंटल उत्पादन रब्बी हंगामातील ज्वारी पिकातून घेतलेले असून, त्यामुळे कृषी विभागाच्या पीक स्पर्धेतही त्यांची जिल्ह्यातून प्रथम क्रमांकाने निवड झाली आहे.

भूम तालुका ज्वारीचे कोठार म्हणून ओळखला जातो. तालुक्यात मोठ्या प्रमाणावर दुग्ध व्यवसाय केला जात असल्याने लाखोंच्या संख्येने पशुधन आहे. या पशुंना वर्षभर लागणारा वाळला चारा हा ज्वारी पिकातूनच मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होतो. त्यामुळे पूर्वी वैरणीसाठी प्राधान्याने ज्वारीचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जायचे. परंतु, अलीकडील काही वर्षांत या पिकातून योग्य मेहनत व व्यवस्थापनातून भरघोस ज्वारीचे उत्पादनही शेतकरी घेऊ लागले असून, उसासारख्या मोठ्या प्रमाणात पाणी लागणाऱ्या व वर्षभर सांभाळ कराव्या लागणाऱ्या पिकाइतके पैसे अवघ्या चार महिन्यांच्या ज्वारी पिकातूनदेखील मिळू शकतात, हेच येथील शेतकरी दाखवून देत आहेत.

आनंदवाडी येथील नीलेश यादव खामकर हे दरवर्षी उपलब्ध क्षेत्रापैकी काही क्षेत्रावर ठिंबक सिंचनाचा वापर करीत ज्वारीचे पीक घेतात. याहीवर्षीही त्यांनी एक एकर क्षेत्रावर ट्रॅक्टरच्या साह्याने १८ इंचांवर ‘सफेद गंगा’ या वाणाच्या ज्वारीची पेरणी केली. पेरणी करतेवेळेस ५० किलो डीएपी खतमात्रा दिली व त्यानंतर अर्धा ते एक फुटापर्यंत ज्वारीची वाढ होताच दोन ओळीतील अंतर ४ फुट ठेवून ठिंबक टाकले. यानंतर गरजेनुसार पाणी दिले. ठिंबक सिंचन पद्धतीमुळे सर्व ज्वारीच्या रोपांना सारखेच पाणी मिळाल्याने व कायम वाफसा स्थिती राहिल्याने पिकाची समान वाढ होऊन उत्पादनात भरघोस वाढ होण्यास मदत झाली. यामुळे एका एकरात २६ क्विंटल म्हणजे हेक्टरी ६५.५० क्विंटल ऐवढे भरघोस उत्पादन मिळाले. त्यामुळे त्यांनी सहभाग घेतलेल्या कृषी विभागाच्या पीक स्पर्धेत जिल्ह्यातून प्रथम क्रमांकाने प्रयोगशील शेतकरी खामकर यांची निवड झाली आहे.

अशी केली जाते निवड

या स्पर्धेत भाग घेतलेल्या शेतकऱ्यांच्या फ्लाॅटची पाहणी कृषीविभागाच्या अधिकाऱ्यांकडून केली जाते. पिकाची काढणी व मळणी अधिकाऱ्यांच्या साक्षीने फोटो घेऊन केली जाते. त्यानंतर हा सर्व अहवाल वरिष्ठ स्तरावर पाठविला जातो व सदरचे निकाल हे राज्यस्तरावरून घोषित केले जातात. एकंदरीत शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी ही स्पर्धा पारदर्शकपणे राबविली जाते.

कृषीविभागाकडून केलेल्या सूचनांचे शेतकऱ्यांनी पालन करणे आवश्यक आहे. ज्वारी पिकाच्या यशस्वी उत्पादनासाठी मंडळ कृषी अधिकारी निखिल रायकर, कृषीसहायक बी. जी. शिंदे यांचे मार्गदर्शन मिळाले. एकंदरीतच ज्वारीसारख्या पिकासही ठिबक सिंचनाचा वापर केल्यास थोडक्या पाण्यातही भरघोस उत्पादन मिळू शकते, हे यातून सिद्ध झाले. त्यामुळे येणाऱ्या हंगामात सर्व क्षेत्रावर ठिंबक सिंचनावर ज्वारीचे पीक घेण्याचा विचार आहे.

- नीलेश यादव खामकर, आनंदवाडी, ता.भूम